शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान;  पंचनामे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 13:14 IST

गत २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात सतत परतीचा पाऊस हजेरी लावत आहे.

अकोला: जिल्ह्यात गत सहा दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत मात्र पीक नुकसानाचे पंचनामे रखडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे केव्हा होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पावसाळा संपला असला तरी परतीचा पाऊस बरसत आहे. गत २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात सतत परतीचा पाऊस हजेरी लावत आहे. शनिवार, २६ आॅक्टोबर रोजीदेखील जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला असून, दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाचे वातावरण होते. सतत बरसणाऱ्या परतीच्या पावसाने, काढणीला आलेले सोयाबीन, ज्वारी आणि वेचणीला आलेल्या कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रशासन व्यस्त असल्याच्या परिस्थितीत, परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम मात्र रखडले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे केव्हा होणार आणि पीक नुकसान भरपाईची मदत शेतकºयांना केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सोयाबीन, ज्वारीला फुटले कोंब; कापूसही भिजला!सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेले शेतातील सोयाबीन पावसात भिजले असून, अनेक ठिकाणी सोयाबीला तसेच ज्वारीला कोंब फुटले आहेत. पावसामुळे भिजलेला कापूसही गळून पडला आहे. त्यासोबतच गळून पडलेल्या कपाशीच्या पात्या-फुलं व बोंड्या मातीत मिसळल्या असून, पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.पीक वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड!कापणी झालेल्या सोयाबीनच्या गंज्या शेतात लावण्यात आल्या आहेत. परतीच्या पावसात सोयाबीनच्या गंजीवर ताडपत्री टाकून पीक वाचविण्याची धडपड शेतकºयांकडून केली जात आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीRevenue Departmentमहसूल विभाग