शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश होणार कसे? सगळेच पास, मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:23 IST

अकाेला : काेराेनामुळे शतप्रतिशत निकाल लागल्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय जाहीर झाला हाेता त्या निर्णयाला ...

अकाेला : काेराेनामुळे शतप्रतिशत निकाल लागल्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय जाहीर झाला हाेता त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिल्याने आता सीईटी न्यायालयाने रद्द केली आहे. या प्रकारामुळे अकरावी प्रवेशाचा गुंता आणखीच वाढला आहे. निकालाची टक्केवारी वाढल्याने दहावीच्या गुणांवरच अकरावीचे प्रवेश देणे कसरतीचे ठरणार असल्याचे मानले जात आहे.

यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली असून, मूल्यमापनाच्या आधारे जिल्ह्यातील २५,६३३ पैकी २५,६३१ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित करण्यात आले. दहावीत केवळ दाेनच विद्यार्थी नापास झाले हाेते, तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीतील प्रवेशित जागा कमी असल्याने दहावी उत्तीर्ण सर्वांनाच अकरावीत प्रवेश कसा मिळेल हा प्रश्नच आहे, मनासारख्या कॉलेजला प्रवेश मिळावा याकरिता सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु, उच्च न्यायालयाने ही परीक्षा रद्द केली आहे. अकरावीचे प्रवेश नेमके कसे होणार, याबाबत शासनाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना अद्याप शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात अकरावीसाठी १८,२०० जागा उपलब्ध आहेत. मनासारखे कॉलेज मिळविताना विद्यार्थ्यांची कसरत होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

००००००००००००००००

विद्यार्थी स्थिती...

दहावीतील विद्यार्थी-२५,६३३

पास विद्यार्थी-२५,६३१

अकरावीची प्रवेशक्षमता १८,२००

शहरातील कनिष्ठ महाविद्यालये-५४

एकूण जागा-८,९५५

००००००००००००००००

विद्यार्थी चिंतित...

अकरावी प्रवेशासाठी सीईटीची तयारी केली हाेती मात्र ती रद्द झाल्याने आता प्रवेश काेणत्या आधारावर दिला जाईल याचीच चिंता आहे. मार्गदर्शक सूचना लवकर यायला हव्या.

- पार्थ भवाने

विद्यार्थी

....

अकरावीचे प्रवेश केव्हा आणि कसे होणार याबाबतही काेणतीही माहिती नाही, मनासारखे काॅलेज मिळेल की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. मार्गदर्शक सूचना आल्या तर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश लवकर घेता येईल.

- अर्चना काटे

विद्यार्थिनी

०००००००००००००

महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार !

अंतर्गत मूल्यमापनानुसार विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करण्यात आला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी तसेच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी यंदा वाढली आहे. त्यामुळे महाविद्यालयांचा कटऑफही वाढणार आहे. गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश झाले, तर ९० टक्क्यापेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्याला पसंतीचे कॉलेज मिळविताना कसरत होण्याची शक्यता आहे.

०००००००००००००००००