शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश होणार कसे? सगळेच पास, मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:23 IST

अकाेला : काेराेनामुळे शतप्रतिशत निकाल लागल्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय जाहीर झाला हाेता त्या निर्णयाला ...

अकाेला : काेराेनामुळे शतप्रतिशत निकाल लागल्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय जाहीर झाला हाेता त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिल्याने आता सीईटी न्यायालयाने रद्द केली आहे. या प्रकारामुळे अकरावी प्रवेशाचा गुंता आणखीच वाढला आहे. निकालाची टक्केवारी वाढल्याने दहावीच्या गुणांवरच अकरावीचे प्रवेश देणे कसरतीचे ठरणार असल्याचे मानले जात आहे.

यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली असून, मूल्यमापनाच्या आधारे जिल्ह्यातील २५,६३३ पैकी २५,६३१ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित करण्यात आले. दहावीत केवळ दाेनच विद्यार्थी नापास झाले हाेते, तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीतील प्रवेशित जागा कमी असल्याने दहावी उत्तीर्ण सर्वांनाच अकरावीत प्रवेश कसा मिळेल हा प्रश्नच आहे, मनासारख्या कॉलेजला प्रवेश मिळावा याकरिता सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु, उच्च न्यायालयाने ही परीक्षा रद्द केली आहे. अकरावीचे प्रवेश नेमके कसे होणार, याबाबत शासनाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना अद्याप शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात अकरावीसाठी १८,२०० जागा उपलब्ध आहेत. मनासारखे कॉलेज मिळविताना विद्यार्थ्यांची कसरत होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

००००००००००००००००

विद्यार्थी स्थिती...

दहावीतील विद्यार्थी-२५,६३३

पास विद्यार्थी-२५,६३१

अकरावीची प्रवेशक्षमता १८,२००

शहरातील कनिष्ठ महाविद्यालये-५४

एकूण जागा-८,९५५

००००००००००००००००

विद्यार्थी चिंतित...

अकरावी प्रवेशासाठी सीईटीची तयारी केली हाेती मात्र ती रद्द झाल्याने आता प्रवेश काेणत्या आधारावर दिला जाईल याचीच चिंता आहे. मार्गदर्शक सूचना लवकर यायला हव्या.

- पार्थ भवाने

विद्यार्थी

....

अकरावीचे प्रवेश केव्हा आणि कसे होणार याबाबतही काेणतीही माहिती नाही, मनासारखे काॅलेज मिळेल की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. मार्गदर्शक सूचना आल्या तर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश लवकर घेता येईल.

- अर्चना काटे

विद्यार्थिनी

०००००००००००००

महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार !

अंतर्गत मूल्यमापनानुसार विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करण्यात आला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी तसेच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी यंदा वाढली आहे. त्यामुळे महाविद्यालयांचा कटऑफही वाढणार आहे. गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश झाले, तर ९० टक्क्यापेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्याला पसंतीचे कॉलेज मिळविताना कसरत होण्याची शक्यता आहे.

०००००००००००००००००