शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

किती ही गरिबी?, अकोला जिल्हा राज्यात २३ वा

By atul.jaiswal | Updated: December 27, 2021 10:37 IST

Poverty in Akola : जिल्ह्यात ग्रामीण भागातील १७.०३ टक्के तर, शहरी भागातील ६.८३ टक्के लोक गरीब असल्याचे हा अहवाल म्हणतो.

ठळक मुद्दे नीती आयोगाचा अहवाल जिल्ह्यात १३.३८ टक्के नागरिक गरीब

- अतुल जयस्वाल

अकोला : नागरिकांची सर्वांगीण उन्नती होऊन ते दारिद्र्यातून बाहेर पडावे, यासाठी शासनाकडून विविध योजना, आराखडे आखले जात असले तरी आजही अनेक जण गरिबीत खितपत पडले असल्याचे नीती आयोगाने जाहीर केलेल्या अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार अकोला जिल्ह्यातील १३.२८ टक्के नागरिक गरीब असून, गरिबी निर्देशांकात अकोला जिल्हा राज्यात २३ व्या स्थानावर आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील १७.०३ टक्के तर, शहरी भागातील ६.८३ टक्के लोक गरीब असल्याचे हा अहवाल म्हणतो.

नीती आयोगाने अलीकडेच बहुआयामी गरिबी निर्देशांक अहवाल जाहीर केला असून, त्यामध्ये विविध निकषांवर आधारित पद्धतीने गरिबीचे मापन करण्यात आले आहे. या मापदंडावर १८ लाखावर लोकसंख्या असलेल्या अकोला जिल्ह्यातील १३.३८ टक्के लोक गरीब असल्याचे आढळून आले आहे. आरोग्य, शिक्षण, राहणीमान, मलनिस्सारण, पिण्याचे पाणी अशा विविध मापदंडावर जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास अजून बराच वाव असल्याचे या अहवालातून अधोरेखित झाले आहे.

 

 

आमचा गरिबी निर्देशांक किती?

नीती आयोगाने जारी केलेल्या अहवालात अकोला जिल्ह्याचा गरिबी निर्देशांक १३.३८ टक्के आहे. याचा अर्थ जिल्ह्यात १३.३८ टक्के नागरिक गरीब आहेत. राज्यात अकोला जिल्ह्याचा क्रम २३ वा आहे.

 

राज्यात पहिल्या दहामध्ये कोण?

नीती आयोगाच्या निर्देशांकानुसार नंदुरबार, धुळे, जालना, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, परभणी, बीड, वाशिम, गडचिरोली हे दहा जिल्हे राज्यात सर्वाधिक गरीब आहेत.

 

विभागात अकोला चौथ्या क्रमांकावर

पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या अमरावती विभागाच्या गरिबी निर्देशांकात अकोला जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. यवतमाळ जिल्हा (२३.५४ टक्के) विभागात सर्वाधिक गरीब जिल्हा ठरला आहे. ११ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या विदर्भात अकोला जिल्हा सातव्या क्रमांकावर आहे. विदर्भात नागपूर (६.७२ टक्के) तळाशी आहे.

 

 

म्हणून वाढली जिल्ह्यातील गरिबी

आहार - ३९.८२ टक्के

कौटुंबिक आरोग्य - १४.२६ टक्के

मृत्यूदर - १.४२ टक्के

मालमत्ता - १५.३२ टक्के

बँक खाते - ७.३६ टक्के

शालेय हजेरी - २.५८ टक्के

स्वयंपाक इंधन - ५४.७८ टक्के

शौचालय - ५०.५१ टक्के

घरे - ३५.१८ टक्के

पिण्याचे पाणी - ८.१२ टक्के

वीज - ४.८१ टक्के

 

कशी कमी होणार ही गरिबी?

 

जिल्ह्यात गरिबी, उपासमार आणि असमानता मोठ्या प्रमाणात आहे. याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

 

रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. अकोला जिल्ह्यात शेतीसाठी सिंचन व औद्योगिकीकरणात वाढ झाल्याशिवाय आर्थिक उन्नती व त्यासोबतच गरिबी निर्देशांकात सुधारणा शक्य नाही.

 

- प्रा. डॉ. संजय खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ

 

आर्थिक असमानता दूर करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहोचल्या पाहिजे. विशेषत: महिलांपर्यंत शिक्षण, आरोग्य या सुविधा पोहोचणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्यास, त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

 

- प्रा. डॉ. नीलिमा सरप-लखाडे, सदस्य, राज्य मागासवर्ग आयोग, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक