शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

अकोला पोलीस मुख्यालयातील शेतकरी आंदोलन ऐतिहासिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 01:37 IST

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशभरात अनेक आंदोलनं, धरणे होतात; परंतु त्या आंदोलनांचे स्थळ हे नियोजित असतात. पोलीस ठाण्यांमध्येही अनेकदा आंदोलने, धरणे होतात; परंतु देशाच्या इतिहासात कधी पोलीस मुख्यालयात आंदोलन झालेले नाही;  परंतु माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर मंचाने पोलीस मुख्यालयातच शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू करून ...

ठळक मुद्देशेतकरी जागर मंचाने केलेल्या मागण्या मान्य सोने तारण कर्जमाफीचा ३७ हजार शेतकर्‍यांना लाभ मिळणार!

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशभरात अनेक आंदोलनं, धरणे होतात; परंतु त्या आंदोलनांचे स्थळ हे नियोजित असतात. पोलीस ठाण्यांमध्येही अनेकदा आंदोलने, धरणे होतात; परंतु देशाच्या इतिहासात कधी पोलीस मुख्यालयात आंदोलन झालेले नाही;  परंतु माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर मंचाने पोलीस मुख्यालयातच शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू करून इतिहास रचला. अनेकदा आंदोलनाचे स्थळ निश्‍चित केलेले असते. शेतकरी जागर मंचच्या शेतकरी आंदोलनाचे स्थळसुद्धा निश्‍चित होते. शेतकर्‍यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चातील सर्वच शेतकरी माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांना भेटायला जात असताना, पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आणि पोलीस मुख्यालयात आणले आणि आता आंदोलन संपेल, असा पोलिसांचा कयास होता; परंतु यशवंत सिन्हा, रवीकांत तुपकर यांनी आम्ही चालत येथे आलो नाही. आम्हा शेतकर्‍यांना कोणत्या कलमान्वये ताब्यात घेतले,  हे आधी पोलिसांनी स्पष्ट करावे, तरच आम्ही येथून जावू, असे ठणकावले. यावर पोलीस निरूत्तर झाले. त्यामुळे यशवंत सिन्हा यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत पोलीस मुख्यालयाच्या मैदानातच आंदोलन सुरू केले. चार दिवस पोलीस मुख्यालयात चाललेले आंदोलन देशपातळीवरील पहिलेच आहे. याचा उल्लेख यशवंत सिन्हा यांनीसुद्धा केला. 

चौथ्या दिवशीही आंदोलनात विविध संघटनांचा सहभागयशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात झालेल्या शेतकरी आंदोलनात चौथ्या दिवशीही जिल्हय़ातील विविध सामाजिक, राजकीय संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला. आंदोलनामध्ये बुधवारी सकाळी मुंबईवरून उद्योजक एकनाथ दुधे, भोकरदनचे जि.प. सदस्य केशव पाटील जवंजाळ सहभागी झाले. बुधवारी दुपारी शेकापचे प्रदीपभाई देशमुख,  छावाचे जिल्हा प्रमुख शंकरराव वाकोडे हे दीडशे कार्यकर्त्यांसह घोषणा देत, आंदोलनात सहभागी झाले. तसेच आ. बच्चू कडू यांच्या प्रहारचे प्रशांत भारसाकळ, सुहास साबे, अमोल खोबरखेडे, नम्रता ठोकळ, ज्ञानेश्‍वर देशमुख, शिवा सरप, श्रीकांत नकासकर, राधेश्याम कळस्कार, बॉबी पळसपगार, संदीप तंवर, विक्की कांबे, आकाश राजुस्कर, आदींचाही सहभाग होता. अकोला बार असोसिएशनचे ज्येष्ठ विधिज्ञ अँड. सुभाष काटे, अँड. नंदकुमार बोर्डे, अँड. डी.एल. म्हसाये, अँड. विनोद साकरकर, अँड. मो. परवेज, अँड. अनंत खेळकर, भीमकायदा संघटनेचे प्रशांत निघोट, अ.भा. छावाचे जिल्हा प्रमुख रणजित काळे, भाकपचे देवराव पाटील हागे, आपचे बडनेरा विधासभा निरीक्षक प्रमोद कुचे, रंजना मामर्डे, नरेंद्र पुनकर, देवानंद गहिले, मो. इरफान, रुस्तम शहा, आलिम पटेल, राहुल चव्हाण, गजानन गाडगे, किरण गुडधे यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

अरे भाई, मैं तो भाजपा का हूँ न !आंदोलनाला भाजपा वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, भारिप-बहुजन महासंघ, शेकाप, प्रहार संघटना सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. या सर्व पक्षांचे नेतेही आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले नाहीत, तरी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या भेटीला तर येऊ शकले असते, असा सूर आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये होता. त्यावर माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अरे भाई..कौन बोलता है की, भाजपा आंदोलन में सहभागी नहीं है..मैं तो भाजपा का हूँ न. असे म्हटले आणि शेतकर्‍यांमध्ये एकच हशा पिकला. 

आंदोलनानंतर केली मैदानाची साफसफाईशेतकर्‍यांच्या आंदोलनाची सांगता झाल्यानंतर मैदानाची साफसफाई करण्याची सूचना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी केली. त्याला प्रतिसाद देत शेतकर्‍यांनी पोलीस मुख्यालयाचे मैदान स्वच्छ करून दिले. स्वत: तुपकर यांनी हाती झाडु घेत पुढाकार घेतला. 

पोलीस ध्वजाला दिली सलामीपोलीस मुख्यालयात आंदोलन होण्याची पहिलीच वेळ होती. यशवंत सिन्हा यांचे भाषण सुरू असताना मुख्यालयातील पोलीस ध्वज सायंकाळी उतरविण्याची वेळ झाली, त्यावेळी बिगुल वाजला. बिगुलचा आवाज ऐकताच सिन्हा यांनी भाषण थांबविले व सर्व शेतकर्‍यांनी जागेवर उभे राहत ध्वजाला सलामी दिली. यानंतर सिन्हा यांनी अब किसान जवान की भाषा समझने लगे; असे सूचक वक्त व्य केले.

वर्‍हाडी कवी विठ्ठल वाघ दिवसभर आंदोलनातप्रसिद्ध वर्‍हाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ, सर्वोदयी नेते महादेवराव भुईभार, अँड. रामसिंग राजपूत यांनी शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. डॉ. विठ्ठल वाघ यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य नेते रविकांत तुपकर, शेतकर्‍यांसह मैदानावरच भोजनाचा आस्वाद घेतला.

टॅग्स :Akola cityअकोला शहरFarmerशेतकरीagitationआंदोलनYashwant Sinhaयशवंत सिन्हाRavikant Tupkarरविकांत तुपकर