शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शहापूर सिंचन प्रकल्पात गोलेल्या सिताफळांच्या झाडांविषयी उच्च न्यायालयाची  विचारणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 20:39 IST

भुसंपादनात जमीन गेलेल्या त्या शेतकर्‍यांनी कोणत्या वर्षी सी ताफळांची किती झाडे लावली होती. त्या झाडांना आलेले सीताफळ कधी  आणि कुठे विकले याची संपूर्ण माहिती तीन आठवड्यात शपथपत्राव्दारे सादर  करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भूसंपादन  अधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हा कृषि  अधिकार्‍यांना २१ नोव्हेंबर रोजी दिले. 

ठळक मुद्देशहापूर सिंचन प्रकल्पाचे भूसंपादन शपथपत्राद्वारे माहिती सादर करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: भुसंपादनात जमीन गेलेल्या त्या शेतकर्‍यांनी कोणत्या वर्षी सी ताफळांची किती झाडे लावली होती. त्या झाडांना आलेले सीताफळ कधी  आणि कुठे विकले याची संपूर्ण माहिती तीन आठवड्यात शपथपत्राव्दारे सादर  करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भूसंपादन  अधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हा कृषि  अधिकार्‍यांना २१ नोव्हेंबर रोजी दिले. अकोला जिल्ह्यातील शहापूर सिंचन प्रकल्पासाठी वडाळी देशमुख  गावातील  जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमिनीची व जमिनीवरील  फळझाडांची भरपाई ठरवतांना शासकीय अधिकार्‍यांनी मोठय़ा प्रमाणात  गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करुन  दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अकोट येथील  मोहन पांडे यांनी दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य  न्यायमूर्ती  मंजुळा चेल्लूर आणि न्या.पी.बी.वराळे यांच्या खंडपीठात  मंगळवारी या  याचिकेवर सुनावणी झाली. २00९-१0 मध्ये प्रकल्पासाठी काही शेतकर्‍यांची  जमीन संपादित करण्यात आली. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकार्‍यांनी  जमिनीवरील फळझाडांचे मुल्यांकन करुन ११ मे २0१२ रोजी तर, भूसंपादन  अधिकार्‍याने जमिनीचे मुल्यांकन करुन १६ जुलै २0१४ रोजी अहवाल सादर  केला. या जमिनीवर सीताफळांची झाडे असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात  आले होते. त्यानुसार मुल्यांकन करुन संबंधित शेतकर्‍यांना ३ कोटी १८ लाख  १५ हजार ४८0 रुपयांचा मोबदला म्हणून देण्यात आला होता. मात्र सात  बाराच्या उतार्‍यात तूर, कापूस आणि केळीची झाडे असल्याचे स्पष्ट झाले होते.  याकडे खंडपीठाचे लक्ष वेधण्यात आले. यानंतर खंडपीठाने सिताफळाच्या  झाडा संदर्भात विचारणा करीत शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले.   याचिकेमध्ये जमीन संपादित करण्यात आलेल्या  शेतकर्‍यांमध्ये वडाळी  देशमुख गावातील अण्णापूर्णा डोरले, कमलाबाई बोडखे, पार्वताबाई बोडखे,  विजय देशमुख, अरुण आकोटकर, रामचंद्र आकोटकर, सुधीर आकोटकर व  विलास आकोटकर यांचा  समावेश असून या शेतकर्‍यांची जवळपास ११ हे क्टर जमीन संपादित करण्यात आली. याचिकेमध्ये गृह विभागाचे सचिव,  पोलीस महासंचालक , अकोला जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी  अभियंत्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अँड.उज्वल  देशपांडे तर प्रतिवादीतर्फे  शेतकर्‍यांतर्फे   अँड.खापरे, अधिकार्‍यांतर्फे  अँड.ए.आर.देशपांडे यांनी बाजू मांडल

टॅग्स :Telharaतेल्हाराWaterपाणी