शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचा फटका: तेल्हारा तालुक्यात ५३ गावांत २,८७७ शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:23 IST

प्रशांत विखे तेल्हारा: तालुक्यातील खरीप हंगामातील पीक परिस्थिती सद्यस्थिती समाधानकारक आहे. तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ टक्के क्षेत्रावरील नुकसान ...

प्रशांत विखे

तेल्हारा: तालुक्यातील खरीप हंगामातील पीक परिस्थिती सद्यस्थिती समाधानकारक आहे. तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ टक्के क्षेत्रावरील नुकसान झाले असून, एकूण ५३ गावांत नुकसान झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, २ हजार ८७७ शेतकऱ्यांचे २ हजार ५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाचा खंड वाढत असल्याने शेतकऱ्यांनी सिंचनाची सुविधा असल्यास सिंचन सुरू करावे, असे कृषी विभागाने सुचविले आहे.

तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५८ हजार ५३१ हेक्टर असून, पेरणी योग्य खरीप हंगामाचे पेरणी क्षेत्र ५३ हजार ०१५ हेक्टर आहे. त्यापैकी १०० टक्के पेरणी झाली असून, सद्यस्थितीत पिके बहरली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मूग, उडीद पिकांवर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने यंदाही उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. मध्यंतरी तालुक्यात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळे नदीकाठच्या पिकांना फटका बसला. मुसळधार पावसामुळे २ हजार ५३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. यंदा तालुक्यात पिकांवर वाणीचे आक्रमण वाढल्याने शेतकरी चिंतित सापडला आहे.

-------------------

या पिकांचे झाले नुकसान

कापूस १,१७७.४३

सोयाबीन २८८.१९

तूर १७५.५९

मूग १४६.१७

उडीद १६५.३६

इतर १००.५०

-----------------

पेरणी झालेले क्षेत्र

कापूस २२,५४४ हेक्टर

सोयाबीन १६,८५२

तूर ५,६४९

मूग ३,२००

उडीद २,१०६

ज्वारी १,०९१

मका ७०

इतर १,५०२

----------------

शेतकऱ्यांनी सिंचनाची व्यवस्था असल्यास पावसाची वाट न बघता सिंचन सुरू करावे, हवामान खात्याने १५ ऑगस्टपासून पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव पाहता वेळीच फवारणी करावी. काही अडचण किंवा मार्गदर्शन लागल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.

-मिलिंद वानखडे,

तालुका कृषी अधिकारी.

----------------

अतिवृष्टी व पुराचा फटका बसलेल्या पिकांचे पंचनामे करून त्याबाबत अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. आजपर्यंत शासनाच्या नियमानुसार हेक्टरी ६,८०० रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे. निधी प्राप्त होताच तत्काळ वितरित करण्यात येईल.

-डॉ. संतोष येवलीकर, तहसीलदार, तेल्हारा.