शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

अतिवृष्टीचा फटका: तेल्हारा तालुक्यात ५३ गावांत २,८७७ शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:23 IST

प्रशांत विखे तेल्हारा: तालुक्यातील खरीप हंगामातील पीक परिस्थिती सद्यस्थिती समाधानकारक आहे. तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ टक्के क्षेत्रावरील नुकसान ...

प्रशांत विखे

तेल्हारा: तालुक्यातील खरीप हंगामातील पीक परिस्थिती सद्यस्थिती समाधानकारक आहे. तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ टक्के क्षेत्रावरील नुकसान झाले असून, एकूण ५३ गावांत नुकसान झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, २ हजार ८७७ शेतकऱ्यांचे २ हजार ५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाचा खंड वाढत असल्याने शेतकऱ्यांनी सिंचनाची सुविधा असल्यास सिंचन सुरू करावे, असे कृषी विभागाने सुचविले आहे.

तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५८ हजार ५३१ हेक्टर असून, पेरणी योग्य खरीप हंगामाचे पेरणी क्षेत्र ५३ हजार ०१५ हेक्टर आहे. त्यापैकी १०० टक्के पेरणी झाली असून, सद्यस्थितीत पिके बहरली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मूग, उडीद पिकांवर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने यंदाही उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. मध्यंतरी तालुक्यात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळे नदीकाठच्या पिकांना फटका बसला. मुसळधार पावसामुळे २ हजार ५३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. यंदा तालुक्यात पिकांवर वाणीचे आक्रमण वाढल्याने शेतकरी चिंतित सापडला आहे.

-------------------

या पिकांचे झाले नुकसान

कापूस १,१७७.४३

सोयाबीन २८८.१९

तूर १७५.५९

मूग १४६.१७

उडीद १६५.३६

इतर १००.५०

-----------------

पेरणी झालेले क्षेत्र

कापूस २२,५४४ हेक्टर

सोयाबीन १६,८५२

तूर ५,६४९

मूग ३,२००

उडीद २,१०६

ज्वारी १,०९१

मका ७०

इतर १,५०२

----------------

शेतकऱ्यांनी सिंचनाची व्यवस्था असल्यास पावसाची वाट न बघता सिंचन सुरू करावे, हवामान खात्याने १५ ऑगस्टपासून पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव पाहता वेळीच फवारणी करावी. काही अडचण किंवा मार्गदर्शन लागल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.

-मिलिंद वानखडे,

तालुका कृषी अधिकारी.

----------------

अतिवृष्टी व पुराचा फटका बसलेल्या पिकांचे पंचनामे करून त्याबाबत अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. आजपर्यंत शासनाच्या नियमानुसार हेक्टरी ६,८०० रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे. निधी प्राप्त होताच तत्काळ वितरित करण्यात येईल.

-डॉ. संतोष येवलीकर, तहसीलदार, तेल्हारा.