शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 00:44 IST

जिल्ह्यात आता पावसाचा जोर वाढला असून गेल्या २४ तासात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा, अहेरी या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले.

ठळक मुद्देसंततधार पावसाने घरे कोसळली : तलाव व बोड्यांमधील जलसाठ्यांमध्ये वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आता पावसाचा जोर वाढला असून गेल्या २४ तासात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, सिरोंचा, अहेरी या पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले.एटापल्ली : तालुक्यातील वासामुंडी मार्गावरील मरकल नाल्यावरील पुलावर पाणी चढल्याने जीव धोक्यात घालून या मार्गाने जाणारे नागरिक, वाहन चालक पुलावरून प्रवास करीत होते. एटापल्लीपासून एक किमी अंतरावर डुम्मी नाला आहे. या नाल्यावरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे डुम्मी व जवेली या गावांचा तालुका मुख्यालयापासून संपर्क तुटू शकतो. या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुलाजवळील डांबरी रस्त्याचा काही भाग खचला आहे. सततच्या पावसामुळे दरवर्षी हा भाग खचण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सध्या कशीबशी एसटी जाते. पुन्हा डांबरी भाग खचल्यास वाहन जाणे कठीण होणार आहे.अहेरी : पावसामुळे अहेरी आगारातून सुटणाऱ्या एटापल्ली-जारावंडी, सिरोंचा-झिंगानूर, सिरोंचा-टेकडा या मार्गावरील बसफेऱ्या बंद ठेवण्यात आल्या होत्या.चामोर्शी : तालुक्यातील कानोली येथील मोहन मारोती देवतळे यांच्या घराची भिंत पावसामुळे ८ जुलै रोजी कोसळली. यावेळी देवतळे कुटुंब घरातच झोपले होते. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. यामुळे १० हजार रूपयांचे नुकसान झाले. मात्र अजूनपर्यंत पंचनामा केला नसल्याची माहिती देवतळे यांनी दिली.विजेअभावी भामरागडातील जनजीवन ठप्पभामरागड तालुक्यात मागील चार दिवसांपासून सतत अतिवृष्टी सुरू आहे. शनिवारी भामरागड येथील वीज पुरवठा खंडीत झाला तेव्हापासून मंगळवारी रात्रीपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता. तीन दिवसांपासून सातत्याने वीज पुरवठा खंडीत असल्याने सर्वच कार्यालयांमधील बॅटऱ्या पूर्णपणे डिस्चार्ज झाल्या. विजेअभावी बँक आॅफ महाराष्ट्रमधील आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प पडले होते. शासकीय कार्यालयातीलही संगणक बंद पडल्याने शासकीय कर्मचारी केवळ कार्यालय उघडून रिकामे बसले होते. विजेअभावी पेट्रोलपंप बंद आहे. शेतीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे काही वाहनधारक ६५ किमी अंतरावर असलेल्या आलापल्ली येथून पेट्रोल-डिेझेल आणत आहेत. बीएसएनएल सेवाही ठप्प पडली होती.भामरागडपासून चार किमी अंतरावर असलेल्या कुमरगुडा तसेच १२ किमी अंतरावर असलेल्या ताडगाव नाल्यावरील पुलावर मंगळवारी दुपारी पाणी चढले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांची मोठी रांग लागली होती. काही वाहनधारक मात्र पाणी असतानाही पुलावरून वाहन टाकत होते. पाऊस ओसरल्याने मंगळवारी रात्री उशीरापर्यंत पुलावरील पाणी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर