शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अकोला जिल्ह्यात ५ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 13:44 IST

अकोला: विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत ५ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा नागपूरच्या भारतीय हवामानशास्त्र केंद्राने दिला आहे.

अकोला: विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत ५ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा नागपूरच्या भारतीय हवामानशास्त्र केंद्राने दिला आहे. उष्माघाताच्या अनुषंगाने योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले असून, मे महिन्यात सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.भारतीय हवामानशास्त्र विभाग व उपसचिव राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील कालावधीत उष्णतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसच्यावर पोहोचलेला असून, त्याचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडत आहे. त्यानुसार उष्माघातापासून बचाव करण्याकरिता तातडीच्या उपाययोजना करणे अधिक गरजेचे आहे.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अकोला जितेंद्र पापळकर हे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या विविध कलमांनुसार येणाऱ्या अधिक तापमानाच्या कालावधीत विशेषत: मे महिन्यात सर्व शासकीय अशासकीय, खासगी शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद ठेवावीत, असा आदेश निर्गमित करीत आहेत. यादरम्यान, शाळा व महाविद्यालयाच्या परीक्षेच्या नियोजनावर परिणाम होणार नाही, यांची दक्षता घ्यावी. अतिरिक्त वर्ग किंवा शालेय परीक्षा घेण्याची आवश्यकता असल्यास सकाळच्या सत्रात सकाळी ११ वाजतापर्यंत शाळा विद्यालये, महाविद्यालये सुरू राहतील, याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद अकोला, शिक्षणाधिकारी, महानगरपालिका अकोला व सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी खासगी विशेषकरून सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या शाळा व महाविद्यालये मे महिन्यात बंद ठेवण्याबाबत आदेश देण्यात येत आहे, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाHeat Strokeउष्माघात