शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

शाळेच्या दाखल्यांसाठी मुख्याध्यापकांनी अडवणूक करू नये

By admin | Updated: May 13, 2014 20:54 IST

मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी अडवणूक करीत असून, हा प्रकार थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अकोला : पटसंख्येअभावी जिल्ह्यातील अनेक शाळांच्या तुकड्या बंद पडत आहेत. याच कारणामुळे शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी अडवणूक करीत असून, मुख्याध्यापकांनी हा प्रकार थांबवावा, अशी मागणी काँग्रेस शिक्षक सेलच्यावतीने करण्यात आली आहे.शैक्षणिक सत्र २०१३-१४ चा समारोप झाला असून, पुढील शैक्षणिक सत्रातील प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे; मात्र राज्यात प्रत्येक ठिकाणी पटसंख्या अत्यल्प असल्याने तुकड्या बंद करण्याची वेळ शिक्षण संस्थाचालकांवर आली आहे. अशा परिस्थितीत मुख्याध्यापकही विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी टाळाटाळ करीत असून, यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची अडवणूक थांबवून त्यांना पाहिजे त्या शाळेत शिकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेस शिक्षक सेलचे राज्याध्यक्ष मनोज पाटील, अमरावती विभागीय अध्यक्ष प्रकाश तायडे व जिल्हाध्यक्ष प्रकाश डवले यांनी केली आहे. मुख्याध्यापकांनी हा प्रकार न थांबविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.