शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

वान धरणातील निम्म्या पाण्याचाच होतो वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 15:38 IST

मागील दहा वर्षांची पाणी वापराची आकडेवारी बघितल्यास उपलब्ध जलसाठा पुर्ण वापरलाच नसल्याचे आकडेवारीवरू न समोर येत आहे.

- राजरत्न सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या वान सिंचन प्रकल्पातील पाण्याचा अर्धाही वापर होत नसल्याने दरवर्षी विसर्ग करावा लागत असून, यावर्षी जेवढे पाणी प्रकल्पात उपलब्ध आहे तेवढेच ८० दश लक्ष घनमीटर पाणी सोडावे लागल्याने पाण्याचा मोठा अपव्यय होत असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.अकोला, बुलडाणा व अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेला हा प्रकल्प २००१ मध्ये बांधून तयार झाला.या प्रकल्पाच्याची जलाशय पातळी ४११.६९ मीटर असून, यावर्षी ८०.४४ टक्के दश लक्ष घनमीटर (९८.१५ टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. पर्वताच्या कुशीत असल्याने या प्रकल्पाची रचना चहाच्या कपासारखी खोल असून, या भागात हमखास पाऊस पडत असल्याने प्रत्येक पावसाळ््यात हा प्रकल्प लवकरच ओव्हरफ्लो होत असल्याने दोन-चार वर्ष सोडले तर या प्रकल्पातून हमखास पाण्याचा विसर्ग करावा लागतो. परिणामी पाण्याचा अपव्यय होत असून, यावर्षीही ८० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.विशेष म्हणजे जूनमध्येया धरणाची पातळी शून्य ठेवण्याचे नियोजन आहे. या धरणातून आजमितीस शेगाव नगर परिषद, जळगाव जामोद, १४० खेडी संग्रामपूर , ८४ खेडी, अकोट व तेल्हारा पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करण्यात येतो. मागच्यावर्षी या प्रकल्पात पाणी संचयित झाले तेव्हापासून २०१९ च्या जूनपर्यंत पिण्याच्या पाण्यावर जवळपास ३० तर सिंचनाचाठी २७.२८७ दश लक्ष घनमीटर पाण्याचा वापर करण्यात आला. असे असूनही २१ दश लक्ष घनमीटरच्यावर पाणी या प्रकल्पात शिल्लक होते.मागील दहा वर्षांची पाणी वापराची आकडेवारी बघितल्यास उपलब्ध जलसाठा पुर्ण वापरलाच नसल्याचे आकडेवारीवरू न समोर येत आहे. २००१ मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर २००२-२००३ मध्ये ७१.५२६ दशलक्ष घनमीटर पाणी संचय झाला होता. त्यावर्षी ४,५९६ हेक्टरवर सिंचन करण्यात आले. त्यावेळी ४.६ दलघमी पाणी पिण्यासाठी वापरण्यात आले.

वान प्रकल्पात दरवर्षी५० टक्के जलसाठा शिल्लक राहत असून, पाणी शून्य ठेवण्याचे नियोजन आहे. यावर्षी प्रकल्पात जेवढे पाणी आहे तेवढ्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पाण्याचा वापर सिंचनासाठी करावा.- अनिकेत गुल्हाने,सहायक अभियंता श्रेणी-१वान प्रकल्प.

टॅग्स :AkolaअकोलाWan Projectवान प्रकल्प