शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

वान धरणातील निम्म्या पाण्याचाच होतो वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 15:38 IST

मागील दहा वर्षांची पाणी वापराची आकडेवारी बघितल्यास उपलब्ध जलसाठा पुर्ण वापरलाच नसल्याचे आकडेवारीवरू न समोर येत आहे.

- राजरत्न सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या वान सिंचन प्रकल्पातील पाण्याचा अर्धाही वापर होत नसल्याने दरवर्षी विसर्ग करावा लागत असून, यावर्षी जेवढे पाणी प्रकल्पात उपलब्ध आहे तेवढेच ८० दश लक्ष घनमीटर पाणी सोडावे लागल्याने पाण्याचा मोठा अपव्यय होत असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.अकोला, बुलडाणा व अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेला हा प्रकल्प २००१ मध्ये बांधून तयार झाला.या प्रकल्पाच्याची जलाशय पातळी ४११.६९ मीटर असून, यावर्षी ८०.४४ टक्के दश लक्ष घनमीटर (९८.१५ टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. पर्वताच्या कुशीत असल्याने या प्रकल्पाची रचना चहाच्या कपासारखी खोल असून, या भागात हमखास पाऊस पडत असल्याने प्रत्येक पावसाळ््यात हा प्रकल्प लवकरच ओव्हरफ्लो होत असल्याने दोन-चार वर्ष सोडले तर या प्रकल्पातून हमखास पाण्याचा विसर्ग करावा लागतो. परिणामी पाण्याचा अपव्यय होत असून, यावर्षीही ८० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.विशेष म्हणजे जूनमध्येया धरणाची पातळी शून्य ठेवण्याचे नियोजन आहे. या धरणातून आजमितीस शेगाव नगर परिषद, जळगाव जामोद, १४० खेडी संग्रामपूर , ८४ खेडी, अकोट व तेल्हारा पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करण्यात येतो. मागच्यावर्षी या प्रकल्पात पाणी संचयित झाले तेव्हापासून २०१९ च्या जूनपर्यंत पिण्याच्या पाण्यावर जवळपास ३० तर सिंचनाचाठी २७.२८७ दश लक्ष घनमीटर पाण्याचा वापर करण्यात आला. असे असूनही २१ दश लक्ष घनमीटरच्यावर पाणी या प्रकल्पात शिल्लक होते.मागील दहा वर्षांची पाणी वापराची आकडेवारी बघितल्यास उपलब्ध जलसाठा पुर्ण वापरलाच नसल्याचे आकडेवारीवरू न समोर येत आहे. २००१ मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर २००२-२००३ मध्ये ७१.५२६ दशलक्ष घनमीटर पाणी संचय झाला होता. त्यावर्षी ४,५९६ हेक्टरवर सिंचन करण्यात आले. त्यावेळी ४.६ दलघमी पाणी पिण्यासाठी वापरण्यात आले.

वान प्रकल्पात दरवर्षी५० टक्के जलसाठा शिल्लक राहत असून, पाणी शून्य ठेवण्याचे नियोजन आहे. यावर्षी प्रकल्पात जेवढे पाणी आहे तेवढ्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पाण्याचा वापर सिंचनासाठी करावा.- अनिकेत गुल्हाने,सहायक अभियंता श्रेणी-१वान प्रकल्प.

टॅग्स :AkolaअकोलाWan Projectवान प्रकल्प