शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

वान धरणातील निम्म्या पाण्याचाच होतो वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 15:38 IST

मागील दहा वर्षांची पाणी वापराची आकडेवारी बघितल्यास उपलब्ध जलसाठा पुर्ण वापरलाच नसल्याचे आकडेवारीवरू न समोर येत आहे.

- राजरत्न सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या वान सिंचन प्रकल्पातील पाण्याचा अर्धाही वापर होत नसल्याने दरवर्षी विसर्ग करावा लागत असून, यावर्षी जेवढे पाणी प्रकल्पात उपलब्ध आहे तेवढेच ८० दश लक्ष घनमीटर पाणी सोडावे लागल्याने पाण्याचा मोठा अपव्यय होत असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.अकोला, बुलडाणा व अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेला हा प्रकल्प २००१ मध्ये बांधून तयार झाला.या प्रकल्पाच्याची जलाशय पातळी ४११.६९ मीटर असून, यावर्षी ८०.४४ टक्के दश लक्ष घनमीटर (९८.१५ टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. पर्वताच्या कुशीत असल्याने या प्रकल्पाची रचना चहाच्या कपासारखी खोल असून, या भागात हमखास पाऊस पडत असल्याने प्रत्येक पावसाळ््यात हा प्रकल्प लवकरच ओव्हरफ्लो होत असल्याने दोन-चार वर्ष सोडले तर या प्रकल्पातून हमखास पाण्याचा विसर्ग करावा लागतो. परिणामी पाण्याचा अपव्यय होत असून, यावर्षीही ८० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.विशेष म्हणजे जूनमध्येया धरणाची पातळी शून्य ठेवण्याचे नियोजन आहे. या धरणातून आजमितीस शेगाव नगर परिषद, जळगाव जामोद, १४० खेडी संग्रामपूर , ८४ खेडी, अकोट व तेल्हारा पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करण्यात येतो. मागच्यावर्षी या प्रकल्पात पाणी संचयित झाले तेव्हापासून २०१९ च्या जूनपर्यंत पिण्याच्या पाण्यावर जवळपास ३० तर सिंचनाचाठी २७.२८७ दश लक्ष घनमीटर पाण्याचा वापर करण्यात आला. असे असूनही २१ दश लक्ष घनमीटरच्यावर पाणी या प्रकल्पात शिल्लक होते.मागील दहा वर्षांची पाणी वापराची आकडेवारी बघितल्यास उपलब्ध जलसाठा पुर्ण वापरलाच नसल्याचे आकडेवारीवरू न समोर येत आहे. २००१ मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर २००२-२००३ मध्ये ७१.५२६ दशलक्ष घनमीटर पाणी संचय झाला होता. त्यावर्षी ४,५९६ हेक्टरवर सिंचन करण्यात आले. त्यावेळी ४.६ दलघमी पाणी पिण्यासाठी वापरण्यात आले.

वान प्रकल्पात दरवर्षी५० टक्के जलसाठा शिल्लक राहत असून, पाणी शून्य ठेवण्याचे नियोजन आहे. यावर्षी प्रकल्पात जेवढे पाणी आहे तेवढ्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पाण्याचा वापर सिंचनासाठी करावा.- अनिकेत गुल्हाने,सहायक अभियंता श्रेणी-१वान प्रकल्प.

टॅग्स :AkolaअकोलाWan Projectवान प्रकल्प