शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पश्चिम व-हाडात मेघगर्जनेसह गारपीट, खरीप, रब्बी पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 14:19 IST

पश्चिम विदर्भात (व-हाड) रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह गारपीट झाल्याने खरीपातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा, भाजीपाला पिकासह फळपिकांचे नुकसान झाले.

अकोला : पश्चिम विदर्भात (व-हाड) रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह गारपीट झाल्याने खरीपातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा, भाजीपाला पिकासह फळपिकांचे नुकसान झाले. वाशिम जिल्ह्यात गारांच्या तडाख्यात सापडून वृद्धेचा मृत्यू झाला तर याच जिल्ह्यात वीज अंगावर पडून एक जनावर ठार झाले.अकोला जिल्ह्यात रविवारी सकाळी गारपीट झाल्याने हरभरा पिकासह रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळी 6 वाजतापासून तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, सौन्दला, सिरसोली, आडगाव परिसरात विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली, गारपीट झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. गत दोन- चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. रविवारी सकाळच्या सुमारास काही भागात अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतक-यांवर जणू आभाळच कोसळले.वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने उरलासुरला रब्बी हंगामही हातचा जाण्याची वेळ शेतक-यांवर येऊन ठेपली आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढल्याने फळबागा आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोट, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यातही काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस झाला, वादळी पाऊस झाला. पाऊस आणि गारपीट झालेल्या भागातील पिके जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसाचा सर्वधिक फटका सोंगणी करून ठेवलेल्या हरभरा पिकला बसला आहे.तसेच तूर, गहू, फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.वाशिम जिल्हयात रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यात वादळी पाऊस व गारपीट झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. रिसोड तालुक्यातील वाकद, केनवड, कोयाळी, गणेशपूर, बाळखेड, बोरखेडी, गौंढाळा यासह २५ गावांत अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचे नुकसान झाले. मालेगाव तालुक्यात शिरपूर, राजुरा, मेडशी परिसरातही अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, रिसोड तालुक्यातील महागाव येथील यमुनाबाई हुंबाड या वृद्ध महिलेचा गारांच्या तडाख्यात सापडून मृत्यू झाला तर चिंचाबा भर येथे वीज पडून एक जनावर ठार झाले. वाशिम व मंगरूळपीर तालुक्यातही विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले.बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर रविवारी सकाळी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात गारपीट झाली. यामुळ गहू, हरबरा, कांदा, द्राक्षबागा आणि आंब्याचे नुकसान झाले. दरम्यान, लोणार तालुक्यातील १८ गावात गारपीटीचे प्रमाण अधिक होते, असे सूत्रांनी सांगितले.- शेतक-यांची तारांबळसध्या हरभरा काढणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतक?्यांचा माल शेतात पडलेला आहे. अचानक गारपीट व अवकाळी पाऊस पडल्या मुळे शेतकºयांची तारांबळ उडाली होती.

टॅग्स :Akola cityअकोला शहर