शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

पश्चिम व-हाडात मेघगर्जनेसह गारपीट, खरीप, रब्बी पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 14:19 IST

पश्चिम विदर्भात (व-हाड) रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह गारपीट झाल्याने खरीपातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा, भाजीपाला पिकासह फळपिकांचे नुकसान झाले.

अकोला : पश्चिम विदर्भात (व-हाड) रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह गारपीट झाल्याने खरीपातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा, भाजीपाला पिकासह फळपिकांचे नुकसान झाले. वाशिम जिल्ह्यात गारांच्या तडाख्यात सापडून वृद्धेचा मृत्यू झाला तर याच जिल्ह्यात वीज अंगावर पडून एक जनावर ठार झाले.अकोला जिल्ह्यात रविवारी सकाळी गारपीट झाल्याने हरभरा पिकासह रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळी 6 वाजतापासून तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, सौन्दला, सिरसोली, आडगाव परिसरात विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली, गारपीट झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. गत दोन- चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. रविवारी सकाळच्या सुमारास काही भागात अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतक-यांवर जणू आभाळच कोसळले.वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने उरलासुरला रब्बी हंगामही हातचा जाण्याची वेळ शेतक-यांवर येऊन ठेपली आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढल्याने फळबागा आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोट, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यातही काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस झाला, वादळी पाऊस झाला. पाऊस आणि गारपीट झालेल्या भागातील पिके जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसाचा सर्वधिक फटका सोंगणी करून ठेवलेल्या हरभरा पिकला बसला आहे.तसेच तूर, गहू, फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.वाशिम जिल्हयात रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यात वादळी पाऊस व गारपीट झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. रिसोड तालुक्यातील वाकद, केनवड, कोयाळी, गणेशपूर, बाळखेड, बोरखेडी, गौंढाळा यासह २५ गावांत अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचे नुकसान झाले. मालेगाव तालुक्यात शिरपूर, राजुरा, मेडशी परिसरातही अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, रिसोड तालुक्यातील महागाव येथील यमुनाबाई हुंबाड या वृद्ध महिलेचा गारांच्या तडाख्यात सापडून मृत्यू झाला तर चिंचाबा भर येथे वीज पडून एक जनावर ठार झाले. वाशिम व मंगरूळपीर तालुक्यातही विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले.बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर रविवारी सकाळी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात गारपीट झाली. यामुळ गहू, हरबरा, कांदा, द्राक्षबागा आणि आंब्याचे नुकसान झाले. दरम्यान, लोणार तालुक्यातील १८ गावात गारपीटीचे प्रमाण अधिक होते, असे सूत्रांनी सांगितले.- शेतक-यांची तारांबळसध्या हरभरा काढणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतक?्यांचा माल शेतात पडलेला आहे. अचानक गारपीट व अवकाळी पाऊस पडल्या मुळे शेतकºयांची तारांबळ उडाली होती.

टॅग्स :Akola cityअकोला शहर