शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पश्चिम व-हाडात मेघगर्जनेसह गारपीट, खरीप, रब्बी पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 14:19 IST

पश्चिम विदर्भात (व-हाड) रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह गारपीट झाल्याने खरीपातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा, भाजीपाला पिकासह फळपिकांचे नुकसान झाले.

अकोला : पश्चिम विदर्भात (व-हाड) रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह गारपीट झाल्याने खरीपातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा, भाजीपाला पिकासह फळपिकांचे नुकसान झाले. वाशिम जिल्ह्यात गारांच्या तडाख्यात सापडून वृद्धेचा मृत्यू झाला तर याच जिल्ह्यात वीज अंगावर पडून एक जनावर ठार झाले.अकोला जिल्ह्यात रविवारी सकाळी गारपीट झाल्याने हरभरा पिकासह रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळी 6 वाजतापासून तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, सौन्दला, सिरसोली, आडगाव परिसरात विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली, गारपीट झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. गत दोन- चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. रविवारी सकाळच्या सुमारास काही भागात अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतक-यांवर जणू आभाळच कोसळले.वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने उरलासुरला रब्बी हंगामही हातचा जाण्याची वेळ शेतक-यांवर येऊन ठेपली आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढल्याने फळबागा आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोट, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यातही काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस झाला, वादळी पाऊस झाला. पाऊस आणि गारपीट झालेल्या भागातील पिके जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसाचा सर्वधिक फटका सोंगणी करून ठेवलेल्या हरभरा पिकला बसला आहे.तसेच तूर, गहू, फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.वाशिम जिल्हयात रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यात वादळी पाऊस व गारपीट झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. रिसोड तालुक्यातील वाकद, केनवड, कोयाळी, गणेशपूर, बाळखेड, बोरखेडी, गौंढाळा यासह २५ गावांत अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचे नुकसान झाले. मालेगाव तालुक्यात शिरपूर, राजुरा, मेडशी परिसरातही अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, रिसोड तालुक्यातील महागाव येथील यमुनाबाई हुंबाड या वृद्ध महिलेचा गारांच्या तडाख्यात सापडून मृत्यू झाला तर चिंचाबा भर येथे वीज पडून एक जनावर ठार झाले. वाशिम व मंगरूळपीर तालुक्यातही विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले.बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर रविवारी सकाळी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात गारपीट झाली. यामुळ गहू, हरबरा, कांदा, द्राक्षबागा आणि आंब्याचे नुकसान झाले. दरम्यान, लोणार तालुक्यातील १८ गावात गारपीटीचे प्रमाण अधिक होते, असे सूत्रांनी सांगितले.- शेतक-यांची तारांबळसध्या हरभरा काढणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतक?्यांचा माल शेतात पडलेला आहे. अचानक गारपीट व अवकाळी पाऊस पडल्या मुळे शेतकºयांची तारांबळ उडाली होती.

टॅग्स :Akola cityअकोला शहर