शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
2
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
3
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
4
Mumbai: बीएमसीने 'अभय' देऊनही मुंबईकरांनी केलं दुर्लक्ष, आता भरा दोन टक्के दंड 
5
चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ मोठी जलवाहिनी फुटली; 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद!
6
मोठी बातमी: संग्राम थोपटे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश
7
मुंबई: स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी पत्नीला पाठवला व्हिडीओ, म्हणाला, 'जगण्याची इच्छा नाही'
8
चीनकडून येणारा निकृष्ट दर्जाचा माल रोखण्याचा डाव भारतावरच उलटला! कोणाची समस्या वाढली?
9
आता इलॉन मस्क जगात वाटताहेत शुक्राणू, महिलांशी संपर्क, मुलांची ‘फौज’ तयार करणार
10
"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
11
फळं खावीत की ज्यूस प्यावा... आरोग्यासाठी काय फायदेशीर? डाएटीशियनने दूर केलं कन्फ्यूजन
12
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
13
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
14
"गारगाई धरणाला विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू", आमदार भातखळकरांचा ठाकरेंना इशारा
15
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
16
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
17
आयपीएलदरम्यान बीसीसीआयने मुंबई टी२० लीग संघाच्या मालकावर घातली आजीवन बंदी, कारण काय?
18
पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
19
बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी; तुळजापूर कनेक्शन?
20
Video - भलताच छंद! 'ती' डास मारते, जपून ठेवते अन् त्याला खास नाव देते; ठेवलाय अजब रेकॉर्ड

 पातूर, बार्शीटाकळीची भूजल पातळी एक मीटरने वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 10:50 IST

Groundwater level Akola बार्शीटाकळी, पातूर तालुक्यांच्या निरीक्षण विहिरीच्या भूजल पातळीत १ मीटरने वाढ झाल्याचे दिसून येते.

ठळक मुद्दे यंदा टंचाइग्रस्त गावांची संख्या कमी हाेण्याची चिन्हे आहेत.सर्वच तालुक्यातील भूजल पातळीत माेठी वाढ झाली आहे.

अकाेला : यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे भूजल पातळी वाढली आहे. जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत, तसेच सर्वच तालुक्यातील भूजल पातळीत माेठी वाढ झाली आहे, त्यामुळे यंदा टंचाइग्रस्त गावांची संख्या कमी हाेण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात एकूण ३८ पाणलोट क्षेत्र असून, त्यामधील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे ८१ निरीक्षण विहिरींच्या भूजल पातळीची वाचने वर्षातून चार वेळा घेण्यात येतात. यावर्षी ऑक्टोबर अखेर घेण्यात आलेल्या भूजल पातळीच्या नोंदीचा आणि मागील ५ वर्षाच्या ऑक्टोबर महिन्याच्या भूजल पातळीच्या सरासरीशी तुलनात्मक अभ्यास केला असता, अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी, पातूर तालुक्यांच्या निरीक्षण विहिरीच्या भूजल पातळीत १ मीटरने वाढ झाल्याचे दिसून येते. त्याचबरोबर अकोट, तेल्हारा व मूर्तिजापूर तालुक्यातील निरीक्षण विहिरींच्या भूजल पातळीत ०.२५ ते ०.७० मी. ने वाढ झालेली दिसून येते; परंतु असे असले तरी, सन २०१७ च्या भूजल मूल्यांकनानुसार जिल्ह्यातील ३८ पाणलोट क्षेत्रांपैकी ११ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा उपसा पुनर्भरणाच्या तुलनेत ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि एका पाणलोट क्षेत्रात (पीटीएमटी-१ पातूर तालुका) १०० टक्क्यापेक्षा जास्त आहे. या १२ पाणलोट क्षेत्रात सूक्ष्म सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणे व उपस्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.

या कारणांमुळे वाढली भूजल पातळी

गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मुबलक पाऊस झाला. पावसाच्या दिवसांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत झालेली वाढ भूजल पातळी वाढण्यासाठी कारणीभूत ठरली आहे तसेच या पावसामुळे शेतातील ओल कायम राहिल्याने खरिपाच्या सिंचनासाठी विहिरीद्वारे उपसा झाला नाही आणि यावर्षी दोन पावसातील खंड दिसून आला नाही.

या वर्षात झालेला मुबलक पाऊस व खरिपाच्या हंगामात न झालेला पाण्याचा उपसा यामुळे भूजल पातळीमध्ये माेठी वाढ दिसून येत आहे

- संजय कराड , वरिष्ठ भूवैज्ञानिक.

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी