शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी पोलिसांनी ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना उचलले; नाशिकमध्ये नजरकैदेत ठेवले
3
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
5
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
6
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
7
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
8
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
9
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
10
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
11
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
12
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
13
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
15
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
16
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
17
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
19
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
20
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत

भूजल पातळीत मोठी घट; ओलिताची शेती होतेय कोरडवाहू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 3:22 PM

घटती भूजल पातळी, वारेमाप वृक्षतोड या सर्वांचा परिणाम जमिनीवर होऊन ओलिताचे पीक फळबागा सिंचन शेतकऱ्यांना कठीण होत आहे.

- सत्यशील सावरकर लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : दरवर्षी होत असलेले कमी पर्जन्य, हवामानातील ओझोन व प्रखर उष्णतेने पाण्याच्या नैसर्गिक स्रोताचे विघटन, घटती भूजल पातळी, वारेमाप वृक्षतोड या सर्वांचा परिणाम जमिनीवर होऊन ओलिताचे पीक फळबागा सिंचन शेतकऱ्यांना कठीण होत आहे. त्यामुळे ओलिताखालील जमीन निम्म्यावर येऊन जमिनीचा पोत बंजर होत असल्याचे विदारक चित्र ड्रायझोनची चाहूल देत आहे.तालुका भौगोलिकदृष्ट्या चार भागात असून, कळासपट्टी सातपुडा पायथा, मध्यभाग, खारपाणपट्टा, दक्षिणेस नदी पठार भागात व्यापला आहे. यामध्ये लागवडीखालील ६५ हजार १२९ हे.आर., लागवडीलायक ५५ हजार ९११ हे.आर. जमीन आहे. यामध्ये ओलिताची व कोरडवाहू जमीन येते. खरीप व रब्बी अशी दोन्ही पिकासाठी सुपिक असलेला हा तालुका वान लाभ क्षेत्रातील ओलीत व सिंचन विहीर, कूपनलिकाद्वारे ओलिताखाली होता. आजही वान हनुमान सागर धरण लाभ क्षेत्रात २५हजार २८ हे.आर. पैकी १९ हजार १७७ हे.आर. सिंचन अपेक्षित असते, हे पाणी रब्बी पिकाला मिळते. उर्वरित शेतजमिनीवर कळासपट्टी व मध्यभागात जास्त सिंचन होऊन फळबाग लागवड करण्यात येते. खारपाणपट्टा व दक्षिण भागात सिंचन कमी होते. तालुक्यातील ओलिताखालील जमीन ही कूपनलिकाद्वारे सिंचनाखाली आहे; परंतु दिवसेंदिवस पाण्याची भूजल पातळी तळाला जात आहे. आज रोजी कळासपट्टी व मध्यभागातील पातळी तीनशे फुटाच्यावर गेली असल्याने या भागातील उभ्या केळी, संत्रा झाडे, पान पिंपरी, भाजीपाला पिके धोक्यात आले आहेत. कित्येक शेतकऱ्यांनी उभ्या बागा पाण्यामुळे तोडल्या आहेत. याच भागातील सातपुडा पर्वतरांगेतून तालुक्यातील नदीनाल्याचा उगम आहे; परंतु मुख्य नदी पूर्णा, आस, विदु्रपा, पोहरा, गौतमा या कमी पावसाने बंजर होत असल्याचे चित्र आहे. या नद्यांसह नाले पावसाळ्यातच कोरडे पडतात. त्यामुळे परिसरात ‘पाणी अडवा, जिरवा’ न होत असल्याने भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. तालुक्यातील चारही बाजूंनी पाणी पातळीने तळ गाठला असल्याने ओलिताखालील क्षेत्रात घट होऊन जमीन कोरडवाहू होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराagricultureशेती