शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

घोडा-गाडीचा थाट नाही; नवरदेव, नवरी चालत पोहोचले लग्नाला; ग्रामपंचायतमध्ये केला नोंदणी विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 19:00 IST

चार-पाच नातेवाइकांसह चक्क पायदळ जात नोंदणी विवाह करून कोरोना ‘सोशल डिस्टन्स’ व खबरदारी पाळत विवाह केला.

- सत्यशील सावरकर

तेल्हारा : राज्यात कोरोना कहर सुरूच आहे. त्यामुळे ‘लॉकडाउन’ वाढतच आहे. आधीच ठरलेले लग्न पुढे न ढकलता एकाच गावातील नवरदेव-नवरी असलेल्या जोडप्याने ग्रामपंचायत कार्यालयात घरापासून चार-पाच नातेवाइकांसह चक्क पायदळ जात नोंदणी विवाह करून कोरोना ‘सोशल डिस्टन्स’ व खबरदारी पाळत विवाह केला.लग्न म्हटले म्हणजे घोडा, गाडी, पाहुणे मंडळी, हौस, मजा आलीच. त्यात नवरदेव-नवरी एकाच गावातील असल्यास मित्र, नातेवाईक व दोन्हींकडील कार्यक्रमामध्ये उत्साह वाढतो. तालुक्यातील गाडेगाव येथील श्रीधर मनोहर मिरगे यांचे चिरंजीव अंकुश नवरदेव व गावातीलच अरुण रामराव वाकोडे यांची कन्या माधुरी नवरी यांचा विवाह कोरोना विषाणू संसर्ग खबरदारी व ‘लॉकडाउन’ काळात पाडावयाची सतर्कता पाळून अगदी ठरल्याप्रमाणे कुठलाही लवाजमा न करता मोजक्या मंडळीत ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी पद्धतीने करण्यात आला. सरपंच प्रमोद वाकोडे यांच्या हस्ते वर अंकुश श्रीधर मिरगे व वधू माधुरी अरुण वाकोडे यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी केशवराव ताथोड, संजय वडतकार, मुरलीधर सोनोने, विजय बोर्डे, गोकुळ हिंगणकार, काशीनाथ वाकोडे, नातेवाईक व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराmarriageलग्नgram panchayatग्राम पंचायत