शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

महान येथे जलवाहिनीची संतप्त नागरिकांकडून तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:44 IST

महान: स्थानिक ग्रामपंचायतकडे नळ योजनेच्या विद्युत  बिलादाखल ६ लाख ५३ हजार २४0 रुपयांची रक्कम थकीत  असल्याने, नळ योजनेचा वीज प्रवाह दीड महिन्यापूर्वी  वीज कं पनीने खंडित केला होता. तेव्हापासून महानमधील वॉर्ड क्रमांक  ३, ४ व ५ मधील नागरिकांना पाणीपुरवठा बंद आहे. 

ठळक मुद्देतीन वॉर्डातील नागरिक दीड महिन्यांपासून पाण्याविना वीज कंपनीने नळ योजनेचा वीज प्रवाह केला होता खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कमहान: स्थानिक ग्रामपंचायतकडे नळ योजनेच्या विद्युत  बिलादाखल ६ लाख ५३ हजार २४0 रुपयांची रक्कम थकीत  असल्याने, नळ योजनेचा वीज प्रवाह दीड महिन्यापूर्वी  वीज कं पनीने खंडित केला होता. तेव्हापासून महानमधील वॉर्ड क्रमांक  ३, ४ व ५ मधील नागरिकांना पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी २२ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजता  महाजल योजनेच्या विहिरीवरील जलवाहिनीवरील व एअर  व्हॉल्व्हची तोडफोड केली. जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने महाजल योजनेंतर्गत  महान येथे १ कोटी ८0 लाख रुपये खचरून पाणीपुरवठा योजना  साकारण्यात आली आहे; परंतु या योजनेतील विहिरीचे हस्तां तरण ग्रामपंचायतला करण्यात आले  नाही. दरम्यान, नळ  योजनेच्या विद्युत बिलादाखल ६ लाख ५३ हजार २४0 रुपयांची  रक्कम थकीत असल्याने  महावितरणने नळयोजनेचा वीज प्रवाह  दीड महिन्यांपूर्वी खंडित केला. ग्रामपंचायत प्रशासनाने इंजिनिअर  चव्हाण यांना महाजलच्या विहिरीमधून पाणी घेण्याची तोंडी संम ती मिळवून दिली. गेल्या दीड महिन्यांपासून त्या विहिरीमधील पाणी ग्रामपंचायत  प्रशासन घेत आहे. महान ग्रामपंचायत प्रशासनाने वॉर्ड कॅ. १ व  वॉर्ड क्रमांक २ मधील बिहाडमाथा, चिंचखेड झोपडपट्टीमधील  नागरिकांना पिण्यास पाणीपुरवठा केला; परंतु वॉर्ड क्रमांक ३, ४  व ५ मधील नागरिकांना या पाण्याचे वाटप केले नाही. त्यामुळे  मागील दीड महिन्यांपासून पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या  महानमधील तीन वॉर्डामधील नागरिकांनी त्यांना पाणी मिळत  नसेल, तर ते कोणालाच मिळून देणार नाही, अशी भूमिका घेऊन  २२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता महाजल योजनेच्या  विहिरीवरील जल वाहिनी व एअर व्हॉल्व्हची तोडफोड केली.  यावेळी ग्रामपंचायतच सरपंच, उपसरपंच, एकही अधिकारी वा  कर्मचारी तेथे उपस्थित नव्हता. 

पाणी कर वसुलीत ग्रामपंचायत पिछाडीवरमहान ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्रमांक १ ते ५ मध्ये एकूण ५५0  नळजोडणीधारक असून, त्यांच्याकडे मार्च २0१७ पर्यंत एकूण  १२ लाख २३ हजार ८९५ रुपयांचा पाणीकर थकीत आहे. नळ  योजनेचे वीज प्रवाह खंडित होऊन दीड महिना झाले. या दीड  महिन्यांत ग्रामपंचायत प्रशासनाने एकूण ७ हजार २३0 रुपयांचा  पाणी कर वसूल केल्याने महान ग्रामपंचायत पाणी कर वसुलीत  पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. अशीच पाणी करवसुली सुरू  असली, तर किती वर्षानंतर महानवासीयांना पिण्यास पाणी  मिळणार?

आठवड्यातून दोन वेळा वसुलीग्रामपंचायतचे कर्मचारी पाणी करवसुलीकरिता आठवड्यातून  दोन वेळा घरोघरी जातात; परंतु त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळ त नसल्याचे संबंधित कर्मचार्‍यांनी सांगितले.

पाणी कर खात्यात पैसे नाहीत. त्यामुळे २000 रुपयांच्यावर   पाणी कर थकीत असणार्‍या नळजोडणीधारक खातेदारांना  नोटीस देऊन त्याबाबत दवंडीही देण्यात आली आहे.२१ महल भागातील ७0 टक्के पाणी कराची वसुली झालेली  आहे. वॉर्ड क्र. २ मधील बिहाडमाथा व चिंचखेड झोपडपट्टीत  नवीन नळ जोडण्या दिलेल्या आहेत.  महाजल योजनेच्या  विहिरीमधून पाणी घेण्यास इंजिनिअर चव्हाण यांची तोंडी संमती  घेऊन, वॉर्ड क्र. १ व २ मधील २१ महल, बिहाडमाथा व  चिंचखेड झोपडपट्टीत गेल्या दीड महिन्यांपासून पाणी पुरवठा  केला जात आहे.- यास्मीन मो. इरफान, सरपंच, महान.

टॅग्स :Waterपाणी