शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ग्रासरूट इनोव्हेटर : ...आता हरभऱ्याचे टरफल काढा मशीनने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:52 IST

या यंत्राला ज्वॉइंट अ‍ॅग्रोस्कोचीे मान्यता प्राप्त झाली असल्याने शेतकऱ्यांना या यंत्राचा मोठा फायदा होत आहे.

- राजरत्न शिरसाट (अकोला)

हरभऱ्याचे टरफल आता यंत्राद्वारे काढता येईल, असे यंत्र अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे; या यंत्राला ज्वॉइंट अ‍ॅग्रोस्कोचीे मान्यता प्राप्त झाली असल्याने शेतकऱ्यांना या यंत्राचा मोठा फायदा होत आहे.

रब्बी हंगामात बाजारात मोठ्या प्रमाणात ओला हरभरा विक्रीस येतो. यात काबुलीसह गावरान हरभरा शेतकरी, व्यापारी आणणात. गावठी हरभरा खारवट, आंबट असल्याने झाडे धुवून विक्री करावी लागते. यावर  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पर्याय शोधला असून, हरभऱ्याचे घाटे सोलणारे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राने हरभऱ्याचे टरफल काढणे सोपे झाल्याने शेतकरी, छोट्या भाजीपाला विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात हिरवे दाणे विकता येतील. याच यंत्राने वाटाण्याच्या शेंगेतून दाणेदेखील काढता येतात.

हरभऱ्यासंदर्भात मागणी मोठी असल्याने कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी कापणीपश्चात तंत्रज्ञान विभागाने मागील एक वर्षापासून हरभरा टरफल काढणी यंत्र संशोधन हाती घेतले होते. संशोधनाचे काम मागील वर्षी पुर्ण झाले. राज्यस्तरीय संशोधन आढावा (ज्वाइंट अ‍ॅग्रोस्को )समितीसमोर या यंत्राचे सादरीकरण केल्यानंतर २०१७-१८ च्या सभेत या यंत्राला मान्यता प्राप्त झाली आहे.

विद्यापीठाच्या कापणी पश्चात तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर यांनी हे यंत्र विकसित केले आहे. यंत्राची तोडणी कार्यक्षमता ८५ टक्के असून, एका जागेवरू न दुसऱ्या जागेवर स्थलांतरीत करणे सोपे आहे. अकुशल मजूरही  यंत्र चालवू शकतो. यंत्राचीहिरव्या हरबऱ्याचे गाठी तोडणी  क्षमता ११ किलो प्रतितास आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यात रब्बी हंगामात हरभरा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागातील शेतकऱ्यांना हे यंत्र मोठे वरदान ठरत असून घाटे काढणे अगदी सोपे झाले आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी