शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

ग्रामसेवक युनियनचा ‘सीईओ हटाओ’चा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 12:37 IST

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद कार्यरत असेपर्यंत त्यांना कामकाजामध्ये कोणतेही सहकार्य केले जाणार नाही.

अकोला: जिल्ह्यातील ३२२ ग्रामसेवकांना कार्यमुक्त करून त्यांचे मुख्यालय पंचायत समिती स्तरावर केल्याने या प्रकाराचा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने निषेध नोंदवला. सोबतच जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद कार्यरत असेपर्यंत त्यांना कामकाजामध्ये कोणतेही सहकार्य केले जाणार नाही, असा निर्णय युनियनच्या जिल्हा शाखेच्या बैठकीत घेतल्याचे जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच येत्या दोन दिवसात आंदोलनाची दिशाही ठरवली जाणार आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील जनसामान्यांची कामे होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे ग्रामस्थांना दैनंदिन सुविधा तसेच योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्या सोडविण्यासाठी तसेच विकास कामे, नागरी सुविधा, प्रचलित अनुदान योजना राबविण्यासाठी सीमित कालावधी आहे. त्यामुळे अंमलबजावणी करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे ही कामे प्रभावित होऊ नयेत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यंत्रणा बदल करावी, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर ग्रामस्थांची कामे होण्यासाठी बदल करावे, असे निर्देश ग्रामविकास विभागाने ३१ आॅगस्ट रोजी दिले. त्यानुसार शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्ह्यातील ३२२ ग्रामसेवकांना कार्यमुक्त केले. त्यांचा प्रभार नव्यानेच नियुक्ती दिलेले ५० कंत्राटी ग्रामसेवक, पंचायत समिती स्तरावर असलेले ५६ विस्तार अधिकारी, तर उर्वरित २१६ पदांचा प्रभार संबंधित गावांतील शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्याचा आदेश दिला. या काळात ग्रामसेवकांचे मुख्यालय पंचायत समिती कार्यालय करण्यात आले आहे. त्यांना तेथे हजेरी नोंदवण्याचे बजावले. या आदेशानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्ह्यातील ग्रामसेवकांची बैठक रविवारी तातडीने बोलावण्यात आली. त्या बैठकीत सर्व ग्रामसेवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाचा निषेध केला. तसेच राज्य पदाधिकाºयांशी संपर्क साधून पुढील दिशा ठरवली. त्यामध्ये येत्या दोन दिवसात आंदोलन केले जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद कार्यरत असेपर्यंत त्यांना कोणत्याही कामात सहकार्य केले जाणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला. राज्य आणि जिल्हा शाखा पदाधिकाºयांच्या या पवित्र्यावर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या कामासाठी हा निर्णय घेतला. त्यामध्ये कोणावर अन्याय करण्याचा उद्देश नसल्याचे म्हटले आहे.

ग्रामपंचायतींची कामेही घेतली हातात..ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन असल्याने ग्रामपंचायतींना कामाची यंत्रणा म्हणून देण्यात आलेली विकास कामे आता जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांकडून केली जाणार आहेत. काम करणाºया यंत्रणेत बदल करून तसे प्रशासकीय मंजुरी आदेश काढण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यकारी अभियंत्यांना बजावले आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधींनी सुचवलेली कामे, तीर्थक्षेत्र विकास, अतिरिक्त विशेष अनुदानातील कामांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद