शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

राज्यभरातील  ग्रामसेवक १ जानेवारीपासून सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप सोडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 14:16 IST

अकोला : शासकीय कामकाजाच्या नावाखाली व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे. शासकीय कामाचे आदेश, विविध उपक्रम, बैठकांचा निरोप ऐनवेळी दिल्याने ग्रामसेवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यातून अनेकांना विविध आजार बळावत आहेत, त्यामुळे राज्यातील सर्व ग्रामसेवक सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप येत्या १ जानेवारीपासून सोडणार असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना मंगळवारी पाठविले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयांकडून व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपची निर्मिती करण्यात आली. वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी रात्री-अपरात्री केव्हाही धमकीवजा आदेश देतात. ऐनवेळी कामाच्या आदेशामुळे ग्रामसेवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.

अकोला : शासकीय कामकाजाच्या नावाखाली व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे. शासकीय कामाचे आदेश, विविध उपक्रम, बैठकांचा निरोप ऐनवेळी दिल्याने ग्रामसेवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यातून अनेकांना विविध आजार बळावत आहेत, त्यामुळे राज्यातील सर्व ग्रामसेवक सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप येत्या १ जानेवारीपासून सोडणार असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना मंगळवारी पाठविले.जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयांकडून व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपची निर्मिती करण्यात आली. त्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी रात्री-अपरात्री केव्हाही धमकीवजा आदेश देतात. तत्काळ कामांसाठी आदेश सोडतात, त्यामुळे कायदे, नियम मोडीत काढले जात आहेत. ऐनवेळी कामाच्या आदेशामुळे ग्रामसेवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. हृदयरोग, रक्तदाबाच्या तक्रारी आहेत. ग्रामसेवकांना आधीच अतिरिक्त कामांचा ताण आहे, त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे. हे प्रकार टाळण्यासाठी सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय युनियनने घेतला आहे. त्याचवेळी इतर अधिकृत संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचेही ठरले. त्याबाबतचे निवेदन ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी प्रधान सचिवांसह सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पाठविले आहे.- सरकारी कामांसाठी स्मार्ट फोनचा वापर नाही!सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप सोडण्यासोबतच शासनाचे विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वत:च्या स्मार्ट फोनवर कोणतेही अ‍ॅप डाउनलोड न करण्याचेही ठरविण्यात आले. त्यामध्ये एसबीएम फोटो अपलोड करणे, पीक कापणी प्रयोग अ‍ॅप, जियो टॅगिंग कामाचा समावेश आहे. ग्रुप सोडण्यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

 आपले सरकार सेवा केंद्राला १२ हजाराची खिरापतसध्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालवणाºया कंपनीला दरमहा १२ हजार रुपये दिले जात आहेत. सरकारी कामे या ठिकाणी ग्रामसेवक डाटा एन्ट्री आॅपरेटरकडून करून घेतील. त्या ठिकाणी अडचणी असल्यास गटविकास अधिकारी यांच्यामार्फत कंपनीला माहिती दिली जाईल. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी संगणकीय माहिती देणे, ई-मेल करण्यासाठी इंटरनेट सुविधा नसणे, टेलिफोन सेवा नसणे, तांत्रिक अडचणी, डाटा एन्ट्री आॅपरेटर नसण्याच्या अडचणीही आहेत.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरWhatsAppव्हॉट्सअॅप