शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

सरकारचा कर्जमाफीचा निर्णय करदात्यांचा अपमान करणारा - अशोक डालमिया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 12:39 IST

अकोला : सरकारचा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय, देशातील समस्त करदात्यांचा अपमान करणारा होय. सरकारी तिजोरीचा हा गैरउपयोग आहे. देशातील शेतकºयांना दुष्काळाच्या चक्रातून काढण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी प्रयत्न झाले पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतांवर डोळा ठेवून कर्जमाफी करणे चुकीचे आहे, अशी खळबळजनक प्रतिक्रिया ‘कॅट’चे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया यांनी दिली आहे.

अकोला : सरकारचाशेतकरी कर्जमाफीचा निर्णय, देशातील समस्त करदात्यांचा अपमान करणारा होय. सरकारी तिजोरीचा हा गैरउपयोग आहे. देशातील शेतकºयांना दुष्काळाच्या चक्रातून काढण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी प्रयत्न झाले पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतांवर डोळा ठेवून कर्जमाफी करणे चुकीचे आहे, अशी खळबळजनक प्रतिक्रिया ‘कॅट’चे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया यांनी दिली आहे.अखिल भारतीय व्यापारी संघटनेची (कॅट) दिल्लीत बुधवारी बैठक झाली. शेतकºयांच्या कर्जमाफीचा सरकारने घेतलेला निर्णय करदात्यांचा अपमान करणारा आहे, असा सूर २६ राज्यांतील व्यापाºयांचा आहे. देशातील करोडो लोकांच्या भावना जाणून न घेता मनमानी निर्णय सरकार घेत असल्याचा आरोपही या बैठकीत करण्यात आला.आपल्या राजकीय फायद्यासाठी देशाची तिजोरी लुटविली जात आहे. शेतकºयांना कर्जमाफी हा उपाय असू शकत नाही. मूळ समस्यांचे निराकरण व्हायला हवे, असेही ते म्हणालेत. कॅट पदाधिकाºयांच्या बैठका ठिकठिकाणी होत असून, सरकारवर जहाल टीका नोंदविली जात आहे. जर शेतकºयांचे कर्ज माफ होत असेल, तर देशातील ७० दशलक्ष व्यापाºयांचे कर्जही सरकारने माफ करावेत, कर्ज माफ करणे म्हणजे देशाची व्यवस्था खिळखिळी करणे होय, असे मत ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनीही व्यक्त केले आहे, असेही डालमिया बोलले. शेतकरी कर्जमाफीची सवय लावणे चुकीचे आहे. कर्जमाफीमुळे देशाचा एनपीए वाढत आहे. २०१२ मध्ये बँकांच्या एनपीए २० हजार कोटी रुपये होता. २०१७ मध्ये ६० हजार कोटी झाला. कर्जाचा फायदा देशातील सर्व शेतकºयांना होत नाही. काही विशिष्ट वर्गालाच होतो. केवळ ४६ टक्के शेतकरी बँकांकडून कर्ज घेतात. उर्वरित शेतकरी इतर स्रोतांवर अवलंबून असतात. कर्जमाफी देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक आत्महत्येची पायरी आहे, ती थांबविणे आवश्यक आहे, असेही डालमिया यांनी मत नोंदविले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीGovernmentसरकार