शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

२५ कोटींचा मदतनिधी होणार शासनजमा!

By admin | Updated: March 6, 2015 01:52 IST

अकोला जिल्ह्यातील ६५ हजारांवर दुष्काळग्रस्त शेतकरी वंचित.

संतोष येलकर/ अकोला : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ८३ हजार ६0६ शेतकर्‍यांच्या मदतीसाठी शासनामार्फत उपलब्ध निधीतून गुरुवारपर्यंंत २ लाख १७ हजार ७१७ शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ११0 कोटी १२ लाखांची मदत महसूल विभागामार्फत बँकांमध्ये जमा करण्यात आली. मदतीचे वाटप ७ मार्चपर्यंंत करावयाचे असले तरी; ६५ हजार ८८९ शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक महसूल विभागाकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे खाते क्रमांकाविना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ६५ हजारांवर शेतकर्‍यांच्या मदतीची २५ कोटींची रक्कम शनिवारी शासनाकडे परत पाठविण्यात येणार आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यात नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी शासनाकडून जाहीर झालेल्या मदतीमध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ८३ हजार ६0६ शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात ९ जानेवारी रोजी ७५ कोटी ७ लाख आणि दुसर्‍या टप्प्यात ४ फेब्रुवारी रोजी ७५ कोटी ११ लाखांचा निधी प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून १४५ कोटी ९ लाख ६९ हजार ३६ रुपयांचा मदतनिधी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तहसील कार्यालय स्तरावर वितरित करण्यात आला. मदतीची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्याचे काम गत १४ जानेवारीपासून तहसील कार्यालयांकडून सुरू करण्यात आले. गुरुवार, ५ मार्चपर्यंंत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ८३ हजार ६0६ शेतकर्‍यांपैकी २ लाख १७ हजार ७१७ शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ११0 कोटी १२ लाख ८ हजार ५३९ रुपयांची मदत बँकांमध्ये जमा करण्यात आली. ७ मार्चपर्यंंत मदतीच्या रकमेचे धनादेश बँकांमध्ये जमा करण्याचा आकडा १२0 कोटींवर जाण्याची शक्यता गृहित धरली तरी, ६५ हजार ८८९ शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांकच महसूल विभागाकडे उपलब्ध नाहीत. शासनाच्या आदेशानुसार दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची मदत ७ मार्चपर्यंंत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करावयाची आहे; मात्र दुष्काळग्रस्त ६५ हजारांवर शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांक महसूल विभागाकडे उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. बँक खाते क्रमांकाविना ६५ हजारांवर दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचा २५ कोटींवर मदतनिधी ७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे जमा करण्यात येणार आहे. मदतीचा निधी उपलब्ध असूनही बँक खाते क्रमांक उपलब्ध नसल्याने, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांचा कोट्यवधीचा मदतनिधी शासनजमा करण्याची वेळ महसूल विभागावर आली आहे.