शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

कापसाला अग्रिम बोनस देण्यावर शासन अनुकूल

By admin | Updated: November 24, 2014 00:02 IST

कृषिमंत्री एकनाथ खडसे यांचा कापूस उत्पादकांना दिलासा; बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी कठोर पावले.

राजरत्न सिरसाट/अकोलायंदा कापसाचे उत्पादन घटले हे खरे असून, कापसाला मिळणारे हमीदर प्रतिक्विंटल ४0५0 रुपयांपर्यंतच आहेत. त्यामुळे कापसाला अग्रिम बोनस देण्यासाठी राज्य शासन अनुकूल असल्याची माहिती राज्याचे महसूल तथा कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी येथे दिली. ना. खडसे अकोला दौर्‍यावर आले असताना त्यांनी शेतकर्‍यांप्रती असलेली शासनाची भूमिका खास ह्यलोकमतह्णशी बोलताना स्पष्ट केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव पडले असल्याने देशांतर्गत कापसाच्या भावावर त्याचे परिणाम जाणवत आहेत. शेतकर्‍यांचा कापूस बाजारात कमी भावाने विकला जात आहे. याच पृष्ठभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेत, कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाद्वारे राज्यात हमी दराने कापूस खरेदी केंद्रं सुरू केली आहेत. या केंद्रांद्वारे हमी भावाने कापसाची खरेदी केली जात असली तरी शासन शेतकर्‍यांच्या बाजूने असल्यानेच कापूस उत्पादक शेतकर्‍यांना अग्रिम बोनस देण्याबाबत अनुकूल असून, याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याचे ना. खडसे यांनी सांगितले.सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गतवर्षीची अतवृष्टी आणि यावर्षी झालेला कमी पाऊस, यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. या शेतकर्‍यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारविनिमय केला जाणार असून, बोगस सोयाबीन बियाणे विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत असून, याबाबत कायदाच तयार केला जाणार आहे. शेतकर्‍यांना अशा पद्धतीने गंडविणार्‍यांची गय केली जाणार नसल्याचे सांगून, यापुढे बोगस बियाणे विकण्यावर फौजदारी स्वरू पाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापुढे शेतकर्‍यांवर आत्महत्येसारखा प्रसंग ओढवूच नये, यासाठी शासन प्रयत्नशील असून, शेतकर्‍यांसाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येतील. कृषी विभागाच्या योजना शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत नव्हे, तर शेतात कशा पोहोचतील, यावर जोर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.फोटो : २४ सीटीसीएल 0७