शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

शासनाच्या अध्यादेशामुळे ९0 टक्के शाळा अनुदानापासून वंचित राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 15:01 IST

९0 टक्के शाळा अनुदानापासून वंचित राहणार असल्याचा आरोप शिक्षक संघटनांसह शिक्षण संस्थांचालकांनी केला आहे.

अकोला: राज्यातील मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान देण्याबाबतचा अध्यादेश शुक्रवारी शासनाने जारी केला; परंतु शासनाने या अध्यादेशामध्ये २३ जाचक अटी लादल्यामुळे ९0 टक्के शाळा अनुदानापासून वंचित राहणार असल्याचा आरोप शिक्षक संघटनांसह शिक्षण संस्थांचालकांनी केला आहे.शासनाने जारी केलेल्या अध्यादेशामध्ये अनुदान देण्यासाठी कोणत्याच निधीची तरतूद न करता, केवळ अटींची तरतूदच अध्यादेशात केली आहे. हा अध्यादेश शिक्षकांच्या भावनांवर आघात करणारा आहे. अनेक वर्षे विनावेतन काम करणाºया शिक्षकांची ही क्रूर थट्टा आहे. एवढी वर्षे विद्यादानाचे पवित्र कार्य करणाºया शिक्षकांना कोणत्याही अटींशिवाय अनुदान देणे हे शासनाचे कर्तव्य आहे; परंतु या कर्तव्यापासून शासन पळ काढीत आहे. अघोषित शाळा, नैसर्गिक वाढीच्या शाळांची शिक्षणाधिकारी यांच्याकडून तपासणी झाली. त्यानंतर उपसंचालकांनी योग्य शिफारशीसह आयुक्तांकडे अनुदानासाठी प्रस्ताव पाठवले. आता अशा शाळांना अनुदान देणे अपेक्षित असताना पुन्हा आयुक्त या शाळेची तपासणी करण्याचे आदेश कसे काय देऊ शकतात, असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. शिक्षक महासंघ, विजुक्टा, खासगी शिक्षक संघटना, शिक्षकांनी शासनाच्या जाचक अध्यादेशाची होळी करावी, असे आवाहन शिक्षक संघटनांनी केले आहे.

काय आहेत अटी?शासनाने अध्यादेश काढून अनुदानास पात्र होण्यासाठी तब्बल २३ अटी लादल्या आहेत. त्यात ४ जून व १४ आॅगस्ट २0१४ मधील सर्व निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. शाळेच्या मान्यतेपासून कार्योत्तर मान्यता, तुकडी किंवा अतिरिक्त शाखा मान्यता चार वर्ष, शाळा मान्यतेचे ठिकाण, स्थलांतर व हस्तांतर असल्यास त्याची मान्यता, जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने पात्र केले असावे, युडायस क्रमांकामध्ये भरलेली योग्य माहिती असावी, २0१७-१८ च्या संचमान्यतेनुसार मंजूर पदे अनुदानास पात्र ठरतील. शाळा, विद्यार्थी-शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने असावी, विद्यार्थ्यांची पटसंख्या किमान ३0 असावी, विद्यार्थी पटसंख्या व शाळा, तुकड्या व अतिरिक्त शाखांच्या वयाचा निकष पूर्ण होत नसल्यास, आरक्षण धोरणाचे पालन न केल्यास त्या शाळा अनुदानास पात्र राहणार नाहीत. सर्व कर्मचाºयांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट बंधनकारक राहील, अशा अटींचा समावेश आहे.

शासनाचे कॉस्ट आणि कास्ट आधारित शिक्षण पद्धती लागू करण्याचे षड्यंत्र आहे. त्यामुळेच शासनाने अनुदान देणाऱ्या अध्यादेशामध्ये जाचक अटी लादल्या आहे. या अध्यादेशामुळे शाळांना अनुदान मिळणार नाही. त्यासाठी शिक्षकांनी संघटित झाले पाहिजे.-डॉ. अविनाश बोर्डे, प्रांताध्यक्ष, विजुक्टा

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा