शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

सरकारने दुष्काळ घोषित करण्यातच धन्यता मानली - जयंत पाटील यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 12:46 IST

अकोला: राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडला असताना, सरकारने दुष्काळ घोषित करण्यातच धन्यता मानली असून, कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केला.

अकोला: राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडला असताना, सरकारने दुष्काळ घोषित करण्यातच धन्यता मानली असून, कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केला.अकोला दौऱ्यावर आले असता, पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारने दुष्काळ घोषित करण्यातच धन्यता मानली; परंतु कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने पीक नुकसान भरपाईपोटी सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा पुरेसा लाभ शेतकºयांना मिळाला नसून, तोकडी मदत दिली जात आहे, असे सांगत सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतरही राज्यात शेतकºयांच्या आत्महत्या थांबल्या नाही, असा आरोप पाटील यांनी केला. वाढत्या महागाईत सामान्य माणूस अडकला असून, बेरोजगारीत बेसुमार वाढ झाल्याने, सरकारप्रती समाजात अस्वस्थता आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, डॉ. संतोष कोरपे, डॉ. आशा मिरगे उपस्थित होत्या.सरकारने आश्वासने पूर्ण केली नाही!राज्यात वेगवेगळ्या समाजाला सरकारने दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम सरकारने हाती घेतला; मात्र या कार्यक्रमातर्गंत बेसुमार कामे झाल्याने, त्याचा उपयोग झाला नाही, असेही त्यांनी सांगितले.सर्वच प्रश्नांवर विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठविणार!‘मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र’ अशा घोषणा सरकारकडून करण्यात आल्या; मात्र राज्यात कोणतीही गुंतवणूक झाली नाही. यासह राज्यातील सर्वच प्रश्नांवर विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठविणार असल्याचा इशारा जयंत पाटील यांनी दिला.अधिवेशन गुडाळण्याचा सरकारचा डाव!राज्य विधिमंडळाचे दोन आठवड्याचे हिवाळी अधिवेशन एक आठवड्याने वाढविण्याची मागणी आम्ही सरकारकडे कली; मात्र अधिवेशन वाढविण्याची सरकारची भूमिका नसल्याने, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप पाटील यांनी केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारण