शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने दुष्काळ घोषित करण्यातच धन्यता मानली - जयंत पाटील यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 12:46 IST

अकोला: राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडला असताना, सरकारने दुष्काळ घोषित करण्यातच धन्यता मानली असून, कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केला.

अकोला: राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडला असताना, सरकारने दुष्काळ घोषित करण्यातच धन्यता मानली असून, कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केला.अकोला दौऱ्यावर आले असता, पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारने दुष्काळ घोषित करण्यातच धन्यता मानली; परंतु कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने पीक नुकसान भरपाईपोटी सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा पुरेसा लाभ शेतकºयांना मिळाला नसून, तोकडी मदत दिली जात आहे, असे सांगत सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतरही राज्यात शेतकºयांच्या आत्महत्या थांबल्या नाही, असा आरोप पाटील यांनी केला. वाढत्या महागाईत सामान्य माणूस अडकला असून, बेरोजगारीत बेसुमार वाढ झाल्याने, सरकारप्रती समाजात अस्वस्थता आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, डॉ. संतोष कोरपे, डॉ. आशा मिरगे उपस्थित होत्या.सरकारने आश्वासने पूर्ण केली नाही!राज्यात वेगवेगळ्या समाजाला सरकारने दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम सरकारने हाती घेतला; मात्र या कार्यक्रमातर्गंत बेसुमार कामे झाल्याने, त्याचा उपयोग झाला नाही, असेही त्यांनी सांगितले.सर्वच प्रश्नांवर विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठविणार!‘मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र’ अशा घोषणा सरकारकडून करण्यात आल्या; मात्र राज्यात कोणतीही गुंतवणूक झाली नाही. यासह राज्यातील सर्वच प्रश्नांवर विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठविणार असल्याचा इशारा जयंत पाटील यांनी दिला.अधिवेशन गुडाळण्याचा सरकारचा डाव!राज्य विधिमंडळाचे दोन आठवड्याचे हिवाळी अधिवेशन एक आठवड्याने वाढविण्याची मागणी आम्ही सरकारकडे कली; मात्र अधिवेशन वाढविण्याची सरकारची भूमिका नसल्याने, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप पाटील यांनी केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारण