शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने दुष्काळ घोषित करण्यातच धन्यता मानली - जयंत पाटील यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 12:46 IST

अकोला: राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडला असताना, सरकारने दुष्काळ घोषित करण्यातच धन्यता मानली असून, कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केला.

अकोला: राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडला असताना, सरकारने दुष्काळ घोषित करण्यातच धन्यता मानली असून, कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केला.अकोला दौऱ्यावर आले असता, पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारने दुष्काळ घोषित करण्यातच धन्यता मानली; परंतु कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. बोंडअळीच्या प्रादुर्भावाने पीक नुकसान भरपाईपोटी सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा पुरेसा लाभ शेतकºयांना मिळाला नसून, तोकडी मदत दिली जात आहे, असे सांगत सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतरही राज्यात शेतकºयांच्या आत्महत्या थांबल्या नाही, असा आरोप पाटील यांनी केला. वाढत्या महागाईत सामान्य माणूस अडकला असून, बेरोजगारीत बेसुमार वाढ झाल्याने, सरकारप्रती समाजात अस्वस्थता आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, डॉ. संतोष कोरपे, डॉ. आशा मिरगे उपस्थित होत्या.सरकारने आश्वासने पूर्ण केली नाही!राज्यात वेगवेगळ्या समाजाला सरकारने दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम सरकारने हाती घेतला; मात्र या कार्यक्रमातर्गंत बेसुमार कामे झाल्याने, त्याचा उपयोग झाला नाही, असेही त्यांनी सांगितले.सर्वच प्रश्नांवर विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठविणार!‘मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र’ अशा घोषणा सरकारकडून करण्यात आल्या; मात्र राज्यात कोणतीही गुंतवणूक झाली नाही. यासह राज्यातील सर्वच प्रश्नांवर विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठविणार असल्याचा इशारा जयंत पाटील यांनी दिला.अधिवेशन गुडाळण्याचा सरकारचा डाव!राज्य विधिमंडळाचे दोन आठवड्याचे हिवाळी अधिवेशन एक आठवड्याने वाढविण्याची मागणी आम्ही सरकारकडे कली; मात्र अधिवेशन वाढविण्याची सरकारची भूमिका नसल्याने, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप पाटील यांनी केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारण