शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

‘गुड बोला, गोड बोला’ पण सत्य तेच बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 15:36 IST

नागरिकांच्या समस्या सोडविताना खूप गोड बोलूनही समस्या सुटत नसतील, तर त्याचा काय फायदा, वर्षातील ३६५ दिवस वेगवेगळ्या स्वरूपात बोलणाऱ्या माणसांनी गुड तर बोलावेच; पण त्याआधी सत्य बोलावे.

अकोला: मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोशल मीडियावरून नातेवाईक, पक्षातील कार्यकर्त्यांसह ओळखीच्या लोकांचे ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’चे असंख्य मेसेज येतात. संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकासोबत चांगले बोलावे, गोड बोलावे असे घरातील कर्ते पुरुष सांगतात. राजकारणात वावरताना सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविताना खूप गोड बोलूनही समस्या सुटत नसतील, तर त्याचा काय फायदा, वर्षातील ३६५ दिवस वेगवेगळ्या स्वरूपात बोलणाऱ्या माणसांनी गुड तर बोलावेच; पण त्याआधी सत्य बोलावे. खोट्यांच्या दुनियेत सत्य बोलण्याची गरज आहे. कारण गोड बोलून काम साधण्याच्या प्रवृत्ती पाहता आता सत्य बोलण्याची वेळ आली आहे.भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी, दसरा, मकर संक्रांतीसह विविध सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्वांशीच गोड बोलण्याची प्रथा असून, गोड बोलण्याबरोबरच पाय जमिनीवर ठेवून सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. आजकाल गोड व खोटे बोलून काम साधणाºयांची मोठी फळी निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांच्या समस्या निकाली काढण्याला मी प्राधान्य देतो. त्यावेळी केवळ गोड बोलून कसे होणार, नागरिकांची समस्या मार्गी लागली पाहिजे. समस्या सुटत नसेल आणि फक्त गोड बोलून त्या व्यक्तीची बोळवण केली जात असेल, तर त्या गोड संवादाला अर्थ राहत नाही. त्यामुळेच ‘गुड बोला, गोड बोला’ पण सत्य तेच बोला, हे आवर्जून सांगावेसे वाटते.कोणाचे आपसात कितीही वैर असले, तरी त्यास तिळगूळ दिल्यास वैर संपते. कोणी स्तुती अथवा निंदा केली तर मनाला लावून न घेता त्याचे मोठ्या मनाने स्वागत केले पाहिजे, हेच भारतीय संस्कृतीचे संस्कार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाLokmat Eventलोकमत इव्हेंटSanjay Dhotreसंजय धोत्रे