शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

‘गुड बोला, गोड बोला’ पण सत्य तेच बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 15:36 IST

नागरिकांच्या समस्या सोडविताना खूप गोड बोलूनही समस्या सुटत नसतील, तर त्याचा काय फायदा, वर्षातील ३६५ दिवस वेगवेगळ्या स्वरूपात बोलणाऱ्या माणसांनी गुड तर बोलावेच; पण त्याआधी सत्य बोलावे.

अकोला: मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोशल मीडियावरून नातेवाईक, पक्षातील कार्यकर्त्यांसह ओळखीच्या लोकांचे ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’चे असंख्य मेसेज येतात. संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकासोबत चांगले बोलावे, गोड बोलावे असे घरातील कर्ते पुरुष सांगतात. राजकारणात वावरताना सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविताना खूप गोड बोलूनही समस्या सुटत नसतील, तर त्याचा काय फायदा, वर्षातील ३६५ दिवस वेगवेगळ्या स्वरूपात बोलणाऱ्या माणसांनी गुड तर बोलावेच; पण त्याआधी सत्य बोलावे. खोट्यांच्या दुनियेत सत्य बोलण्याची गरज आहे. कारण गोड बोलून काम साधण्याच्या प्रवृत्ती पाहता आता सत्य बोलण्याची वेळ आली आहे.भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी, दसरा, मकर संक्रांतीसह विविध सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्वांशीच गोड बोलण्याची प्रथा असून, गोड बोलण्याबरोबरच पाय जमिनीवर ठेवून सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. आजकाल गोड व खोटे बोलून काम साधणाºयांची मोठी फळी निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांच्या समस्या निकाली काढण्याला मी प्राधान्य देतो. त्यावेळी केवळ गोड बोलून कसे होणार, नागरिकांची समस्या मार्गी लागली पाहिजे. समस्या सुटत नसेल आणि फक्त गोड बोलून त्या व्यक्तीची बोळवण केली जात असेल, तर त्या गोड संवादाला अर्थ राहत नाही. त्यामुळेच ‘गुड बोला, गोड बोला’ पण सत्य तेच बोला, हे आवर्जून सांगावेसे वाटते.कोणाचे आपसात कितीही वैर असले, तरी त्यास तिळगूळ दिल्यास वैर संपते. कोणी स्तुती अथवा निंदा केली तर मनाला लावून न घेता त्याचे मोठ्या मनाने स्वागत केले पाहिजे, हेच भारतीय संस्कृतीचे संस्कार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाLokmat Eventलोकमत इव्हेंटSanjay Dhotreसंजय धोत्रे