शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
4
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
5
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
6
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
7
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
8
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
9
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
10
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
11
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
12
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
13
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
14
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
15
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
16
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
17
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
18
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
19
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
20
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट

‘गुड बोला, गोड बोला’ पण सत्य तेच बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 15:36 IST

नागरिकांच्या समस्या सोडविताना खूप गोड बोलूनही समस्या सुटत नसतील, तर त्याचा काय फायदा, वर्षातील ३६५ दिवस वेगवेगळ्या स्वरूपात बोलणाऱ्या माणसांनी गुड तर बोलावेच; पण त्याआधी सत्य बोलावे.

अकोला: मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोशल मीडियावरून नातेवाईक, पक्षातील कार्यकर्त्यांसह ओळखीच्या लोकांचे ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’चे असंख्य मेसेज येतात. संक्रांतीच्या दिवशी प्रत्येकासोबत चांगले बोलावे, गोड बोलावे असे घरातील कर्ते पुरुष सांगतात. राजकारणात वावरताना सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविताना खूप गोड बोलूनही समस्या सुटत नसतील, तर त्याचा काय फायदा, वर्षातील ३६५ दिवस वेगवेगळ्या स्वरूपात बोलणाऱ्या माणसांनी गुड तर बोलावेच; पण त्याआधी सत्य बोलावे. खोट्यांच्या दुनियेत सत्य बोलण्याची गरज आहे. कारण गोड बोलून काम साधण्याच्या प्रवृत्ती पाहता आता सत्य बोलण्याची वेळ आली आहे.भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी, दसरा, मकर संक्रांतीसह विविध सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्वांशीच गोड बोलण्याची प्रथा असून, गोड बोलण्याबरोबरच पाय जमिनीवर ठेवून सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. आजकाल गोड व खोटे बोलून काम साधणाºयांची मोठी फळी निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांच्या समस्या निकाली काढण्याला मी प्राधान्य देतो. त्यावेळी केवळ गोड बोलून कसे होणार, नागरिकांची समस्या मार्गी लागली पाहिजे. समस्या सुटत नसेल आणि फक्त गोड बोलून त्या व्यक्तीची बोळवण केली जात असेल, तर त्या गोड संवादाला अर्थ राहत नाही. त्यामुळेच ‘गुड बोला, गोड बोला’ पण सत्य तेच बोला, हे आवर्जून सांगावेसे वाटते.कोणाचे आपसात कितीही वैर असले, तरी त्यास तिळगूळ दिल्यास वैर संपते. कोणी स्तुती अथवा निंदा केली तर मनाला लावून न घेता त्याचे मोठ्या मनाने स्वागत केले पाहिजे, हेच भारतीय संस्कृतीचे संस्कार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाLokmat Eventलोकमत इव्हेंटSanjay Dhotreसंजय धोत्रे