शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा UNGA मध्ये मोठा आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
6
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
7
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
8
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
9
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
10
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
11
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
12
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
13
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
14
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
15
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
16
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
17
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
18
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
20
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका

स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन केवळ भूलथापा - आशिष देशमुख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 18:40 IST

पाच महिन्यांपासून ज्या राज्यात कृषी मंत्री नाही, त्या राज्यातील शेतकºयांची अवस्था काय असेल, असा प्रश्न उपस्थित करीत स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन केवळ भूलथापा आहे, असे मत भाजपला सोडचिठ्ठी देणारे आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.

अकोला: शेतकऱ्यांच्या पिकाला सरकार हमीभाव देत नाही. कृषिप्रधान देशाचा कणा असलेल्या शेतकºयांच्या समस्या समजून घेतल्या जात नाही. पाच महिन्यांपासून ज्या राज्यात कृषी मंत्री नाही, त्या राज्यातील शेतकºयांची अवस्था काय असेल, असा प्रश्न उपस्थित करीत स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन केवळ भूलथापा आहे, असे मत भाजपला सोडचिठ्ठी देणारे आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. शेतकरी जागर मंचच्यावतीने आयोजित २३ आक्टोबर रोजी कासोधा परिषदेच्या जगजागृतीसाठी ते शनिवारी अकोल्यात आले होते. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कृष्णा अंधारे, प्रशांत गावंडे, बबनराव चौधरी, पुंडलिकराव अरबट, दत्ता देशमुख, अशोक पटोकार, डॉ. जाधव, रवी अरबट, गजानन हरणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अकोल्यात माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात पहिली कासोधा परिषद पार पडली. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या घटनेला दहा महिने उलटून गेले, तरी काहीही झाले नाही. त्यामुळे अकोल्यात दुसरी कासोधा परिषद २३ आॅक्टोबर रोजी घेतली जात आहे. यासाठी यशवंत सिन्हा पुन्हा येणार आहेत. सोबतच भाजपचे माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कुमार केतकर, दिनेश त्रिवेदी, संजय सिंग, आमदार बच्चू कडू, शंकर अण्णा धोंडगे, रविकांत तुपकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती येथे दिली गेली. अकोला जिल्ह्यातील उगवा, भांबेरी, कुटासा, सौंदळा येथील शेतकºयांमध्ये जनजागृती करण्यासाठी देशमुख अकोल्यात शनिवारी आले होते. जिल्ह्यातील कानाकोपºयात जनजागृती करण्याचे कार्य शेतकरी जागर मंच करीत आहे. भाजपने कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. उलटपक्षी महागाई वाढवून रोजगार हिरावून नेला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला जबर फटका सहन करावा लागणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिपला चांगले दिवस आहेत, असे मतही देशमुख यांनी व्यक्त केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAshish Deshmukhआशीष देशमुख