शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन केवळ भूलथापा - आशिष देशमुख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 18:40 IST

पाच महिन्यांपासून ज्या राज्यात कृषी मंत्री नाही, त्या राज्यातील शेतकºयांची अवस्था काय असेल, असा प्रश्न उपस्थित करीत स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन केवळ भूलथापा आहे, असे मत भाजपला सोडचिठ्ठी देणारे आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.

अकोला: शेतकऱ्यांच्या पिकाला सरकार हमीभाव देत नाही. कृषिप्रधान देशाचा कणा असलेल्या शेतकºयांच्या समस्या समजून घेतल्या जात नाही. पाच महिन्यांपासून ज्या राज्यात कृषी मंत्री नाही, त्या राज्यातील शेतकºयांची अवस्था काय असेल, असा प्रश्न उपस्थित करीत स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन केवळ भूलथापा आहे, असे मत भाजपला सोडचिठ्ठी देणारे आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. शेतकरी जागर मंचच्यावतीने आयोजित २३ आक्टोबर रोजी कासोधा परिषदेच्या जगजागृतीसाठी ते शनिवारी अकोल्यात आले होते. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कृष्णा अंधारे, प्रशांत गावंडे, बबनराव चौधरी, पुंडलिकराव अरबट, दत्ता देशमुख, अशोक पटोकार, डॉ. जाधव, रवी अरबट, गजानन हरणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अकोल्यात माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात पहिली कासोधा परिषद पार पडली. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या घटनेला दहा महिने उलटून गेले, तरी काहीही झाले नाही. त्यामुळे अकोल्यात दुसरी कासोधा परिषद २३ आॅक्टोबर रोजी घेतली जात आहे. यासाठी यशवंत सिन्हा पुन्हा येणार आहेत. सोबतच भाजपचे माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कुमार केतकर, दिनेश त्रिवेदी, संजय सिंग, आमदार बच्चू कडू, शंकर अण्णा धोंडगे, रविकांत तुपकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती येथे दिली गेली. अकोला जिल्ह्यातील उगवा, भांबेरी, कुटासा, सौंदळा येथील शेतकºयांमध्ये जनजागृती करण्यासाठी देशमुख अकोल्यात शनिवारी आले होते. जिल्ह्यातील कानाकोपºयात जनजागृती करण्याचे कार्य शेतकरी जागर मंच करीत आहे. भाजपने कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. उलटपक्षी महागाई वाढवून रोजगार हिरावून नेला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला जबर फटका सहन करावा लागणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिपला चांगले दिवस आहेत, असे मतही देशमुख यांनी व्यक्त केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAshish Deshmukhआशीष देशमुख