शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन केवळ भूलथापा - आशिष देशमुख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 18:40 IST

पाच महिन्यांपासून ज्या राज्यात कृषी मंत्री नाही, त्या राज्यातील शेतकºयांची अवस्था काय असेल, असा प्रश्न उपस्थित करीत स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन केवळ भूलथापा आहे, असे मत भाजपला सोडचिठ्ठी देणारे आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.

अकोला: शेतकऱ्यांच्या पिकाला सरकार हमीभाव देत नाही. कृषिप्रधान देशाचा कणा असलेल्या शेतकºयांच्या समस्या समजून घेतल्या जात नाही. पाच महिन्यांपासून ज्या राज्यात कृषी मंत्री नाही, त्या राज्यातील शेतकºयांची अवस्था काय असेल, असा प्रश्न उपस्थित करीत स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन केवळ भूलथापा आहे, असे मत भाजपला सोडचिठ्ठी देणारे आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. शेतकरी जागर मंचच्यावतीने आयोजित २३ आक्टोबर रोजी कासोधा परिषदेच्या जगजागृतीसाठी ते शनिवारी अकोल्यात आले होते. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कृष्णा अंधारे, प्रशांत गावंडे, बबनराव चौधरी, पुंडलिकराव अरबट, दत्ता देशमुख, अशोक पटोकार, डॉ. जाधव, रवी अरबट, गजानन हरणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अकोल्यात माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात पहिली कासोधा परिषद पार पडली. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकºयांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. या घटनेला दहा महिने उलटून गेले, तरी काहीही झाले नाही. त्यामुळे अकोल्यात दुसरी कासोधा परिषद २३ आॅक्टोबर रोजी घेतली जात आहे. यासाठी यशवंत सिन्हा पुन्हा येणार आहेत. सोबतच भाजपचे माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कुमार केतकर, दिनेश त्रिवेदी, संजय सिंग, आमदार बच्चू कडू, शंकर अण्णा धोंडगे, रविकांत तुपकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती येथे दिली गेली. अकोला जिल्ह्यातील उगवा, भांबेरी, कुटासा, सौंदळा येथील शेतकºयांमध्ये जनजागृती करण्यासाठी देशमुख अकोल्यात शनिवारी आले होते. जिल्ह्यातील कानाकोपºयात जनजागृती करण्याचे कार्य शेतकरी जागर मंच करीत आहे. भाजपने कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. उलटपक्षी महागाई वाढवून रोजगार हिरावून नेला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला जबर फटका सहन करावा लागणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भारिपला चांगले दिवस आहेत, असे मतही देशमुख यांनी व्यक्त केले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAshish Deshmukhआशीष देशमुख