शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख ६० हजार रुपये द्या आणि मुलीसाेबत लग्न करून घेऊन जा; फसवणूक करणारी टाेळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 11:24 IST

Crime News राहुल विजय पाटील (२८) हा तीन ते चार वर्षांपासून लग्नासाठी मुली बघत हाेता. मात्र, मनासारखी मुलगी मिळत नसल्याने ताे हैराण झाला हाेाता.

ठळक मुद्देलग्नाचे आमिष देत त्यांना लुटणाऱ्या टाेळीचा डाबकी राेड पाेलिसांनी शुक्रवारी पर्दाफाश केला.फसवणूक झालेला वर मुलगा नंदुरबार जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.

अकाेला : जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्याच्या विविध शहरांतील ज्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत त्यांना सुंदर मुलींचे फाेटाे दाखवून, त्यांची भेटही घालून देऊन लग्नाचे आमिष देत त्यांना लुटणाऱ्या टाेळीचा डाबकी राेड पाेलिसांनी शुक्रवारी पर्दाफाश केला. या प्रकरणातील तीन ते चार जणांना अटक करण्यात आली आहे. फसवणुकीचा हा दुसरा असाच प्रकार असल्याची माहिती उघडकीस आली असून, फसवणूक झालेला वर मुलगा नंदुरबार जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी येथील रहिवासी राहुल विजय पाटील (२८) हा तीन ते चार वर्षांपासून लग्नासाठी मुली बघत हाेता. मात्र, मनासारखी मुलगी मिळत नसल्याने ताे हैराण झाला हाेाता. अशातच त्याचे चुलत काका शेगाव येथे आले असता त्यांची ओळख पातूर येथील सुदाम तुळशिराम करवते ऊर्फ योगेश याच्याशी झाली. त्याने मोबाइल नंबर दिला. त्यानंतर सुदामसोबत चर्चा झाली असता सुदामने काही मुलींचे फोटो पाठविले व यातून मुलगी पसंत करण्याचे सांगितले. मुलगी पसंत येताच मुलीच्या वडिलांना एक लाख ६० हजार रुपये द्या आणि मुलीसाेबत लग्न करून तिला घेऊन जा, असे सांगितले. त्यानुसार १० डिसेंबर २०२० रोजी पाटील हे सहपरिवार पातूर बसस्टँडवर आले. ठरल्याप्रमाणे मुलीच्या मामासाेबत सुदामची भेट झाली. सुदाम या सर्वांना डाबकी रेल्वे गेट परिसरात घेऊन आला. तेथे एक मुलगी दाखविली. मात्र, ती मुलगी पसंत न आल्याने दुसऱ्या मुलीला अन्नपूर्ण माता मंदिराजवळ दाखविले. ही मुलगी पसंत आल्यानंतर मुलाकडच्यांनी तिच्या घरी बोलणी करण्यासाठी जाण्याचा आग्रह केला. मात्र, कोरोनामुळे जाता येणार नसल्याचे सांगितले, तसेच या मुलीसाेबत लग्न करायचे असेल तर पातूर रोडवरील महालक्ष्मी माता मंदिरात लग्न करा आणि मुलीला घेऊन जाण्याचे सांगितले. महालक्ष्मी माता मंदिर येथे लग्न करून दिल्यानंतर सुदामने त्यांच्याकडून एक लाख ६० हजार रुपये घेतली व निघून गेले. त्यानंतर वर हा मुलीसह नंदुरबारला जाण्यासाठी निघाला असता, प्रभात किड्स शाळेजवळ दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्याशी वाद घालत गावातील मुलींना पैसे देऊन घेऊन जात असल्याची आरडाओरड केली. त्यानंतर नवरी गाडीतून उतरली आणि आलेल्या युवकाच्या दुचाकीवर बसून निघून गेली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पाेलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ५०४, ३४ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अशाच एका प्रकरणात डाबकी राेड पाेलीस तपास करीत असताना हे दुसरे प्रकरण घडले, त्यामुळे पाेलिसांनी या टाेळीच्या मुसक्या आवळल्या असून, आणखी काही आराेपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 

दुसरा प्रकार घडताच टाेळी अटकेत

जाे प्रकार नंदुरबार येथील युवकासाेबत घडला तसाच प्रकार यापूर्वी एका युवकासाेबत घडला हाेता. त्यांचा प्रेमविवाह असल्याचे भासवून रजिस्ट्री करण्यासाठी दोघांनाही तहसील कार्यालयात शुक्रवारी बोलाविले. मात्र, तेथे त्यांचे बिंग फुटले आणि डाबकी रोड पोलिसांनी त्यांना पकडले. पकडण्यात आलेल्या आरोपीला राहुल विजय पाटील याने ओळखले. मात्र, त्याचे नाव सुदाम तुळशिराम करवते ऊर्फ योगेश नसल्याचे समोर आले. हे नाव त्याने बनावट सांगितले होते. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला