शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा तातडीने मदत द्या, स्थायी समितीत ठराव मंजूर

By संतोष येलकर | Updated: September 2, 2022 18:11 IST

जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत ठराव मंजूर

अकोला : संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे;मात्र रब्बी हंगाम तोंडावर आला असला तरी, पीक नुकसानीची मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही . त्यामुळे संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदतीचा दिलासा द्यावा, आशा मागणीचा ठराव शुक्रवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले.

यंदाच्या पावसाळ्यात जुलै व ऑगस्टमध्ये जिल्ह्यात कधी संततधार पाऊस तर कधी अतिवृष्टी झाली. पाऊस आणि नदी व नाल्यांना पूर आल्याने जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी  दुपटीने मदत देण्याची  घोषणा शासनाकडून करण्यात आली.परंतु पोळा गेला रब्बी हंगाम तोंडावर आला असला तरी, पिकांच्या नुकसानीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.त्यामुळे संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने तातडीने पीक नुकसानीच्या मदतीचा दिलासा तातडीने द्यावा, अशी मागणी सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी सभेत केली.त्यानुसार यासंदर्भात सभेत ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव तातडीने शासनाकडे पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले.जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपाध्यक्ष सावित्री राठोड, सभापती सम्राट डोंगरदिवे, स्फूर्ती गावंडे,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पीक कर्जासाठी "सीबील"ची अट नको!

रिझर्व्ह बँनकमार्फत बँकांना प्राप्त झालेल्या पत्रानुसार पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना "सीबील" ची अट लावण्यात आली आहे;मात्र पीक कर्जासाठी सीबीलची अट नसावी, अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली.

किती शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे केले?

पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या, त्यानुसार किती शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले, अशी विचारणा जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेता गोपाल दातकर यांनी कृषी विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांना सभेत केली. 

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोला