शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

युवतींनी शिक्षणासोबत कौशल्याचे प्रशिक्षण घ्यावे - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 17:14 IST

अकोला : आपल्यातील कला गुणांना वाव देण्यास योग्य संधी मिळावी असा रोजगार प्राप्त करण्यासाठी युवक - युवतीनी शिक्षणासोबत विविध कौशल्याचे प्रशिक्षण घ्यावे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देकौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन २९ जानेवारी रोजी राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय येथे करण्यात आले होते.या रोजगार मेळाव्यासाठी ६ स्थानिक व दोन बाहेरच्या अशा एकूण ८ कंपन्या आल्या होत्या. या कंपन्याच्या माध्यमातून ३०६ युवतींना रोजगार मिळणार आहे.

अकोला : महाविद्यालयीन शिक्षणानंतर युवकांना ध्यास नोकरीचा लागतो , आजच्या स्पर्धेच्या युगात रोजगार प्राप्तीसाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते असा असंख्य तरुणांचा अनुभव आहे. तरीही आपल्यातील कला गुणांना वाव देण्यास योग्य संधी मिळावी असा रोजगार प्राप्त करण्यासाठी युवक - युवतीनी शिक्षणासोबत विविध कौशल्याचे प्रशिक्षण घ्यावे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.स्वयंरोजगाराच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन २९ जानेवारी रोजी राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय येथे करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका, राधादेवी गोयनका महिला महाविदयालयाचे प्राचार्य देवेंद्र व्यास, खंडेलवाल ज्वेलर्सचे नितीन खंडलेवाल, पॅडसन्स इंडस्ट्रीजच्या अपुर्वा पडगीलवार, आर. के.टेक्नॉलाजीच्या रेखा अरंविद देठे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाचे सहाय्यक संचालक दत्ता ठाकरे, एल. आय. सी.चे शाखा व्यवस्थापक निखील देशपांडे, निर्माण स्कॅन्स प्रायव्हेट लिमीटेडचे गणेश देशमुख, ओझोनचे दिपक दानडे, आश्लेषा पॉवरचे अखिलेश बोरा यांची प्रमुख उपस्थिती होती. देशातील एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोकसंख्या ही चाळीशीच्या आत आहे. तसेच देशाची ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे. स्त्री शक्तीला योग्य व्यासपिठ मिळाले तर देशाच्या विकासासाठी हि स्त्रीशक्ती कामी येवू शकते हा विचार करून देशाच्या बांधणीसाठी काम करीत असतांना स्त्रीयांनी शिक्षणासोबत कौशल्य निर्माण करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. प्रशिक्षण घेतांना प्रशिक्षणाचा सर्व खर्च शासन करणार आहे. याचा लाभ युवतींनी घ्यावा असेही ते म्हणाले. मोबाईलचा वापर कमी करावा हे पथ्य पाळावे असे ते म्हणाले.८ कंपन्यांमध्ये मिळणार ३०६ युवतींना रोजगारया रोजगार मेळाव्यासाठी खंडेलवाल ज्वेलर्स, अश्लेषा पॉवर कंट्रोल, निर्माण स्कॅन्स , आर.के.टेक्नॉलाजी , ओझोन मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पीटल, एल. आय. सी. अशा एकूण ६ स्थानिक व धूत ट्रान्समिशन, औरंगाबाद व रुबीकॉन फॉर्म्युुलेशन औरंगाबाद या दोन बाहेरच्या अशा एकूण ८ कंपन्या आल्या होत्या. या कंपन्याच्या माध्यमातून ३०६ युवतींना रोजगार मिळणार आहे. या मेळाव्याचा ५०० हून अधिक युवतीनी लाभ घेतला. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आर. डी. जी. महाविदयालयाच्या डॉ. उषा वानखडे व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अजय चव्हाणसह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरStudentविद्यार्थी