शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

युवतींनी शिक्षणासोबत कौशल्याचे प्रशिक्षण घ्यावे - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 17:14 IST

अकोला : आपल्यातील कला गुणांना वाव देण्यास योग्य संधी मिळावी असा रोजगार प्राप्त करण्यासाठी युवक - युवतीनी शिक्षणासोबत विविध कौशल्याचे प्रशिक्षण घ्यावे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देकौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन २९ जानेवारी रोजी राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय येथे करण्यात आले होते.या रोजगार मेळाव्यासाठी ६ स्थानिक व दोन बाहेरच्या अशा एकूण ८ कंपन्या आल्या होत्या. या कंपन्याच्या माध्यमातून ३०६ युवतींना रोजगार मिळणार आहे.

अकोला : महाविद्यालयीन शिक्षणानंतर युवकांना ध्यास नोकरीचा लागतो , आजच्या स्पर्धेच्या युगात रोजगार प्राप्तीसाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते असा असंख्य तरुणांचा अनुभव आहे. तरीही आपल्यातील कला गुणांना वाव देण्यास योग्य संधी मिळावी असा रोजगार प्राप्त करण्यासाठी युवक - युवतीनी शिक्षणासोबत विविध कौशल्याचे प्रशिक्षण घ्यावे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.स्वयंरोजगाराच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन २९ जानेवारी रोजी राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय येथे करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका, राधादेवी गोयनका महिला महाविदयालयाचे प्राचार्य देवेंद्र व्यास, खंडेलवाल ज्वेलर्सचे नितीन खंडलेवाल, पॅडसन्स इंडस्ट्रीजच्या अपुर्वा पडगीलवार, आर. के.टेक्नॉलाजीच्या रेखा अरंविद देठे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाचे सहाय्यक संचालक दत्ता ठाकरे, एल. आय. सी.चे शाखा व्यवस्थापक निखील देशपांडे, निर्माण स्कॅन्स प्रायव्हेट लिमीटेडचे गणेश देशमुख, ओझोनचे दिपक दानडे, आश्लेषा पॉवरचे अखिलेश बोरा यांची प्रमुख उपस्थिती होती. देशातील एकूण लोकसंख्येच्या ६० टक्के लोकसंख्या ही चाळीशीच्या आत आहे. तसेच देशाची ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे. स्त्री शक्तीला योग्य व्यासपिठ मिळाले तर देशाच्या विकासासाठी हि स्त्रीशक्ती कामी येवू शकते हा विचार करून देशाच्या बांधणीसाठी काम करीत असतांना स्त्रीयांनी शिक्षणासोबत कौशल्य निर्माण करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. प्रशिक्षण घेतांना प्रशिक्षणाचा सर्व खर्च शासन करणार आहे. याचा लाभ युवतींनी घ्यावा असेही ते म्हणाले. मोबाईलचा वापर कमी करावा हे पथ्य पाळावे असे ते म्हणाले.८ कंपन्यांमध्ये मिळणार ३०६ युवतींना रोजगारया रोजगार मेळाव्यासाठी खंडेलवाल ज्वेलर्स, अश्लेषा पॉवर कंट्रोल, निर्माण स्कॅन्स , आर.के.टेक्नॉलाजी , ओझोन मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पीटल, एल. आय. सी. अशा एकूण ६ स्थानिक व धूत ट्रान्समिशन, औरंगाबाद व रुबीकॉन फॉर्म्युुलेशन औरंगाबाद या दोन बाहेरच्या अशा एकूण ८ कंपन्या आल्या होत्या. या कंपन्याच्या माध्यमातून ३०६ युवतींना रोजगार मिळणार आहे. या मेळाव्याचा ५०० हून अधिक युवतीनी लाभ घेतला. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आर. डी. जी. महाविदयालयाच्या डॉ. उषा वानखडे व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे अजय चव्हाणसह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरStudentविद्यार्थी