शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांची गांधीगिरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 13:46 IST

अकोला: कायदा मोडणाºयावर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी हतबल झालेल्या रेल्वे पोलिसांनी कारवाईचे शस्त्र न उगारता, धाकदपट न करता बेशिस्त आॅटोरिक्षा चालक, दुचाकी चालकांविरुद्ध गांधीगिरीचा मार्ग पत्करला.

अकोला: कायदा मोडणाºयावर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी हतबल झालेल्या रेल्वे पोलिसांनी कारवाईचे शस्त्र न उगारता, धाकदपट न करता बेशिस्त आॅटोरिक्षा चालक, दुचाकी चालकांविरुद्ध गांधीगिरीचा मार्ग पत्करला. पोलिसांच्या कारवाईलाही न जुमानणाºया आॅटोरिक्षा चालक, दुचाकी चालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि रेल्वे स्टेशनवरील वाहनतळावर बेशिस्तीत वाहने उभी न करण्याची विनंती पोलिसांनी त्यांना केली.रेल्वेस्थानकावरील आॅटोरिक्षा आणि दुचाकी चालक बेशिस्त पद्धतीने, वाट्टेल त्या ठिकाणी वाहने उभी करतात. त्यामुळे प्रवाशांना तर त्रास होतोच, वाहतुकीलाही अडथळा होतो. रेल्वे स्टेशन परिसरात वाहनतळ उपलब्ध असतानाही त्याचा वाहनचालक त्याचा वापर करीत नाही आणि वाहने रेल्वेस्थानकासमोरील रस्त्यावर उभे करतात. बºयाच वेळा या बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने कारवाई केल्या जाते. दंडही वसूल केला जातो; परंतु पोलिसांच्या कारवाईलाही वाहन चालक जुमानत नसल्याचे पाहून, पोलिसांनी त्यांची कामाची पद्धत बदलली. रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त आॅटोरिक्षा, दुचाकी उभी करणाºया चालकांवर कारवाई करण्याऐवजी, गांधीगिरी मार्गाने त्यांना गुलाबपुष्प देऊन पुन्हा बेशिस्तपणे वाहने उभी न करता, वाहनतळावरच वाहने उभी करण्याची विनंती पोलिसांच्यावतीने करण्यात आली. हा गांधीगिरीचा उपक्रम आरपीएफ पोलीस निरीक्षक विनोदकुमार लांजेवार, रेल्वे स्टेशन अधीक्षक ब्रिजेश कुमार, वाणिज्य प्रबंधक एम. बी. निकम, कर्मचारी विजय इंगळे यांनी राबविला. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानकPoliceपोलिस