शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

भाजपचे नेते ‘धडा’ घेणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 11:01 IST

फोर-जी प्रकरणात अभय कुणाला ?, करवाढीच्या मुद्यावरही तोंडघशी

- राजेश शेगोकार

अकोला : अकोल्याचे गेल्या दोन दशकांचे राजकारण पाहता भाजपाने एकहाती वर्चस्व निर्माण केल्याचे स्पष्ट होते. महापालिकेत एकहाती सत्ता आणल्याने भाजपाच्या बाहूमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला अन् लोकसभेतील विजयाने या आत्मविश्वासचे रूपांतर अतिआत्मविश्वासात झाल्याने विधानसभा निवडणूक आम्ही एकतर्फी जिंकू, असे दावे जाहीरपणे केले जाऊ लागले; मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला विजयासाठी कुंथावे लागले हे स्पष्ट झाले. खरे तर ही स्थिती म्हणजे भाजपाच्या विरोधात वाढल असलेल्या नाराजीचे प्रतिक होते मात्र त्याचा अंदाज पक्षाला आला नाही त्यामुळेच  जिल्हा परिषदेत मिशन ३५ राबवून नवीन पाईप लाईन टाकण्याचेही स्वप्न सुद्धा दिवास्वप्न  ठरले. भाजपासाठी खरे तर हा धक्काच आहे मात्र त्याही पेक्षा भाजपाच्या प्रतिमेला महापालिकेतील अनेक घोळांमुळे धक्के बसत आहेत. महापालिकेत सुरू असलेला सावळा गोंधळ नेत्यांकडूनही बेदखल होत असेल तर भाजपा ‘धडा घेणार तरी कशावरून असा प्रश्न उपस्थित होणे सहाजीकच आहे.    महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आल्यानंतर पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन अकोलेकरांना मिळेल अशी अपेक्षा नागरिकांची होती. सुरवातीचे काही दिवस विकास कामांच्या नियोजन व भूमिपूजनात गेल्यावर ही अपेक्षा फलद्रुप होत असल्याचा आनंदही अनेकांना झाल्या मात्र नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर एक-एका प्रकरणात महापालिकेतील भाजपाच्या सत्तेची लक्तरे वेशीवर टांगल्या जाऊ लागली. हे सर्व आता उगाळण्याचे कारण इतकेच की सरत्या आठवडयात मालमत्ता करवाढ अन् फोर-जी केबल कंपनीच्या बेताल कारभारावर महापालिका तोंडघशी पडल्याचे समोर आले आहे.  गेल्या दोन वर्षांपासून शहराच्या कानाकोपºयात खोदकाम करून भूमिगत केबल टाकू न धुमाकूळ घालणाºया मोबाइल कंपन्यांचे पितळ उघडे पडले मात्र या निमित्ताने खरे तर महापालिकाच उघडी पडली आहे.  एवढा सारा सावळा गोंधळ  प्रशासन व सत्ताधारी भाजपच्या संमतीशिवाय होऊ शकतो यावर विश्वास तरी कोण ठेवणार?  केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या समोर झालेल्या बैठकीत  केबल कंपनीचे अधिकारी अनधिकृत केबल प्रकरणी ‘व्हेंडर’कडून चूक झाल्याचे मान्य करतात मात्र पुढे काहीच होत नाही. तो व्हेंडर सत्ताधाºयांचा नातेवाईक लागुन गेला की काय?असाच प्रकार शौचालय बांधकामांचा ‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत वैयक्तिक  शौचालयांची उभारणी करताना महापालिकेने ‘जिओ टॅगिंग’ला पायदळी तुडवित सर्व निकष, नियमांना धाब्यावर बसविले. त्यामुळे आता  ‘जिओ टॅगिंग’न करताच बांधण्यात आलेल्या १९ हजारपेक्षा जास्त वैयक्तिक शौचालयांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. कहर म्हणजे मनपाने आजवर २९ कोटींचे देयक अदा केल्याची माहिती आहे. या गोंधळाचा निकाल लागत नाही तोच न्यायालयाने महापालिकेची करवाढच नियमबाहय ठरवून आणखी एक झटका दिला आहे.  मनपाने २०१५-१६ मध्ये ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करीत सुधारित करवाढीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर करून तो मंजूर केला होता. या करवाढीला अकोल्यातून मोठा विरोध झाला. सत्ताधारी पक्षाचेही नगरसेवक नाराज होते तर शिवसेना, काँग्रेस, भारिप-बमसंने आंदोलने करून या विरोधात नाराजी व्यक्त केली होती मात्र भाजपाने विकासाच्या बागुलबुवा उभा करत केवळ बहूमताच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबून करवाढ जनतेच्या माथी मारली ही करवाढच न्यायालयात रद्द झाली. महापालिका प्रशासनाने २००२ ते २०१७ या कालवधीत लागू केलेल्या जुन्या दरानुसार कर आकारणी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मनपाला दिले आहेत त्यामुळे आता महापालिकेला बॅकफुटवर यावे लागले आहे.     एकीकडे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंची सर्व सत्ता भाजपाला देणाºया अकोलेकरांच्या विश्वालाच अशा प्रकरणांमुळे तडा जात असल्याचे नेत्यांच्या लक्षात तरी कधी येणार ?

 

भाजपासाठी  हा धक्काच

विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाला विजयासाठी कुंथावे लागले हे स्पष्ट झाले. खरे तर ही स्थिती म्हणजे भाजपाच्या विरोधात वाढत असलेल्या नाराजीचे प्रतिक होते मात्र त्याचा अंदाज पक्षाला आला नाही त्यामुळेच  जिल्हा परिषदेत मिशन-३५ राबवून नवीन पाईप लाईन टाकण्याचेही स्वप्न सुद्धा दिवास्वप्न  ठरले. भाजपासाठी खरे तर हा धक्काच आहे मात्र त्याही पेक्षा भाजपाच्या प्रतिमेला महापालिकेतील अनेक घोळांमुळे धक्के बसत आहेत. महापालिकेत सुरू असलेला सावळा गोंधळ नेत्यांकडूनही बेदखल होत असेल तर भाजपा ‘धडा घेणार तरी कशावरून असा प्रश्न उपस्थित होणे सहाजीकच आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाBJPभाजपा