शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आईच्या पार्थिवाला चार मुलींनी दिला चिताग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:17 IST

मुलगा नसलेल्या वृद्धेला चार मुलींनीची चिताग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

- गोवर्धन गावंडे  लोकमत न्यूज नेटवर्कहिवरखेड : मुलगा नसला तर अंत्यविधी कोण करेल, असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडतो; मात्र हिवरखेड येथील एका मुलगा नसलेल्या वृद्धेला चार मुलींनीची चिताग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.हिवरखेड येथील वॉर्ड क्र. २ मध्ये राहणाऱ्या माया दिवाकर पिंजरकर यांचे अल्पश: आजाराने २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांना चार मुली आहेत. यापैकी तीन मुली विवाहित तर एक मुलगी अविवाहित आहे. यामध्ये शीतल रवींद्र दाभाडे, तेल्हारा भारती छोटू बाळापुरे, पाथर्डी, दिव्या सागर लोणकर, पुलगाव, अविवाहित विधी दिवाकर पिंजरकर आदींचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून माया पिंजरकर ह्या आजारी होत्या. मुलगा नसल्याने आपला अंत्यविधी कसा होईल, अशी चिंता होती. त्यांनी मोठी मुलगी शीतल रवींद्र दाभाडे व त्यांच्या शेजारी राहणारे राजेंद्र लोखंडे यांना आपली शेवटची इच्छा बोलून दाखविली की, माझा अंत्यविधी माझ्या मुलींनी करावा. आईची इच्छा पूर्ण करण्याच्या निर्धार करून चारही मुलींनी २५नोव्हेंबर रोजी अंत्यविधी पार पाडला.यावेळी चारही मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देऊन स्मशानभूमीत जाऊन पूर्ण अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण केले. मुलींनी आईचा अंत्यविधीचा पूर्ण सोपस्कार पार पाडून नवी दिशा देण्याचे काम केले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक