शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

वणवा रोखण्यासाठी वन विभागाचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 12:28 IST

एक विशेष व्हॅन तयार करून त्याद्वारे जंगल क्षेत्रातील गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्यामुळे प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण होत असल्याने प्रादेशिक वन विभागाने जंगलात लागणारे वणवे रोखण्यासाठी एक विशेष व्हॅन तयार करून त्याद्वारे जंगल क्षेत्रातील गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याच माध्यमातून जंगलात वणवा लागला तरी त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी ही जागृती महत्त्वाची ठरत आहे.क्षेत्र पातूर व बार्शीटाकळी तालुक्यात येत असून, त्यानंतर अकोट तालुक्यातही बराच भाग जिल्ह्यातील जंगल क्षेत्रात आहे. या जंगलांमध्ये आग लागण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्यापासून वन्य जीवांना मोठा धोका दरवर्षीय असतो. यासोबतच वणव्यामुळे प्रदूषणातही वाढ होत असल्याने झाडांचे मोठे नुकसान होते. हे रोखण्यासाठीच प्रादेशिक वन विभागाने आता कंबर कसली असून, एक विशेष पथक आणि विशेष व्हॅनद्वारे वणवा प्रभावित क्षेत्र तसेच गावांमध्ये या पथकाद्वारे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.त्यामुळे कोणत्याही जंगलात आग लागल्यास त्याची माहिती तातडीने मिळून लवकरच आगीवर नियंत्रण मिळविण्यात येत आहे.

पातूर व बार्शीटाकळी तालुक्यात जागृतीपातूर व बार्शीटाकळी तालुक्यात जंगलाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, या ठिकाणावरील गावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे या जंगल क्षेत्रात आग लागल्यास ग्रामस्थांकडून तातडीने माहिती पोहोचविण्यात येते. यावरून आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यास वन विभागाला मदत होत असल्याने जंगल क्षेत्रातील गावांमध्ये सुरू असलेली जनजागृती वणवा रोखण्यासाठी मोलाची ठरत आहे.

प्रदूषण रोखण्याचे मोठे प्रयत्नजंगलात लागणाºया मोठ्या प्रमाणातील वणव्यांमुळे वन्य जीवाला झळ पोहोचण्याचा मोठा धोका आहे. याचेच परिणाम प्रदूषणाच्या माध्यमातून भोगावे लागणार आहे. त्यामुळे वणव्यावर नियंत्रण मिळवून प्रदूषण होणार नाही, याची पूर्णत: खबरदारी प्रादेशिक वन विभागाकडून घेण्यात येत आहे. वन विभागाच्या या विशेष आणि अनोख्या उपक्रमामुळे वणव्यावर नियंत्रण मिळविण्यात येत आहे.

जंगलातील वणवा ज्यांच्यामुळे लागतो, त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी एक विशेष पथक आणि व्हॅन तयार करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून वणवा प्रभावित भागामध्ये रोजच जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे काही ग्रामस्थांमध्ये आता जागृती येत असून, वणवा रोखण्यासाठी या ग्रामस्थांनीच आता मदत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वन विभागाचे प्रयत्न फळाला येत असल्याचे वास्तव आहे.- विजय माने,उपवनसंरक्षक,प्रादेशिक वन विभाग, अकोला.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलAkolaअकोला