शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

वणवा रोखण्यासाठी वन विभागाचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 12:28 IST

एक विशेष व्हॅन तयार करून त्याद्वारे जंगल क्षेत्रातील गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्यामुळे प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण होत असल्याने प्रादेशिक वन विभागाने जंगलात लागणारे वणवे रोखण्यासाठी एक विशेष व्हॅन तयार करून त्याद्वारे जंगल क्षेत्रातील गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याच माध्यमातून जंगलात वणवा लागला तरी त्यावर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी ही जागृती महत्त्वाची ठरत आहे.क्षेत्र पातूर व बार्शीटाकळी तालुक्यात येत असून, त्यानंतर अकोट तालुक्यातही बराच भाग जिल्ह्यातील जंगल क्षेत्रात आहे. या जंगलांमध्ये आग लागण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्यापासून वन्य जीवांना मोठा धोका दरवर्षीय असतो. यासोबतच वणव्यामुळे प्रदूषणातही वाढ होत असल्याने झाडांचे मोठे नुकसान होते. हे रोखण्यासाठीच प्रादेशिक वन विभागाने आता कंबर कसली असून, एक विशेष पथक आणि विशेष व्हॅनद्वारे वणवा प्रभावित क्षेत्र तसेच गावांमध्ये या पथकाद्वारे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.त्यामुळे कोणत्याही जंगलात आग लागल्यास त्याची माहिती तातडीने मिळून लवकरच आगीवर नियंत्रण मिळविण्यात येत आहे.

पातूर व बार्शीटाकळी तालुक्यात जागृतीपातूर व बार्शीटाकळी तालुक्यात जंगलाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, या ठिकाणावरील गावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे या जंगल क्षेत्रात आग लागल्यास ग्रामस्थांकडून तातडीने माहिती पोहोचविण्यात येते. यावरून आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यास वन विभागाला मदत होत असल्याने जंगल क्षेत्रातील गावांमध्ये सुरू असलेली जनजागृती वणवा रोखण्यासाठी मोलाची ठरत आहे.

प्रदूषण रोखण्याचे मोठे प्रयत्नजंगलात लागणाºया मोठ्या प्रमाणातील वणव्यांमुळे वन्य जीवाला झळ पोहोचण्याचा मोठा धोका आहे. याचेच परिणाम प्रदूषणाच्या माध्यमातून भोगावे लागणार आहे. त्यामुळे वणव्यावर नियंत्रण मिळवून प्रदूषण होणार नाही, याची पूर्णत: खबरदारी प्रादेशिक वन विभागाकडून घेण्यात येत आहे. वन विभागाच्या या विशेष आणि अनोख्या उपक्रमामुळे वणव्यावर नियंत्रण मिळविण्यात येत आहे.

जंगलातील वणवा ज्यांच्यामुळे लागतो, त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी एक विशेष पथक आणि व्हॅन तयार करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून वणवा प्रभावित भागामध्ये रोजच जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे काही ग्रामस्थांमध्ये आता जागृती येत असून, वणवा रोखण्यासाठी या ग्रामस्थांनीच आता मदत करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वन विभागाचे प्रयत्न फळाला येत असल्याचे वास्तव आहे.- विजय माने,उपवनसंरक्षक,प्रादेशिक वन विभाग, अकोला.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलAkolaअकोला