शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

बंडू गिरी हत्याकांड प्रकरणातील पाच साक्षीदार फितूर!

By admin | Updated: May 13, 2014 20:55 IST

उमरीचे माजी सरपंच बंडू गिरी हत्याकांडातील सात साक्षीदारांपैकी पाच साक्षीदार फितूर झाले आहेत.

अकोला: उमरीचे माजी सरपंच बंडू गिरी हत्याकांडातील सात साक्षीदारांपैकी पाच साक्षीदार फितूर झाले आहेत. बंडू गिरी हत्याकांडाची सुनावणी सोमवारपासून दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. सावदेकर यांच्या न्यायालयात सुरू झाली; परंतु हत्याकांडातील महत्त्वाचे दुवे समजणारे साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील हवाच निघून गेली आहे. उमरीतील माजी सरपंच महेंद्र ऊर्फ बंडू गिरी ऊर्फ पुरी गोसावी यांची विदर्भ वाईनबारवर २७ सप्टेंबर २0१३ रोजी बारच्या खरेदी-विक्रीच्या वादातून सुभाष ऊर्फ पिंटू पंुडलिक इंगळे (३५), बाळू ऊर्फ ज्ञानेश्वर पांडुरंग वानखडे व संदीप वानखडे यांनी डोक्यात व पाठीवर पहार घातली आणि त्यांची हत्या केली. ३0 सप्टेंबर रोजी सिव्हिल लाईन पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली होती. तीन आरोपींपैकी संदीप वानखडे याची जामिनावर मुक्तता झाली. सुभाष ऊर्फ पिंटू इंगळे व बाळू वानखडे हे दोन आरोपी अद्यापही कारागृहात आहेत. पोलिसांनी हत्याकांडात वापरलेली पहार जप्त केली होती. यासोबतच आरोपींनी वाशिम येथील एका कापड दुकानातून कपडे व एका फूटवेअर दुकानातून चप्पल खरेदी केली होती. पोलिसांनी या दोन्ही दुकानदारांना साक्षीदार बनविले. तसेच मृतक बंडू गिरीची पत्नी, भाऊ आणि लोणाग्रा, मोठी उमरीतील गायत्री नगरातील दोघांना प्रत्यक्ष साक्षीदार व आणखी एकास साक्षीदार बनविले. सुनावणीदरम्यान सातपैकी पाच साक्षीदार फितूर झाल्याने हत्याकांड प्रकरणाचे महत्त्वच संपले आहे. दोन प्रत्यक्ष साक्षीदारांनीसुद्धा कानाला हात लावल्याने सरकार पक्षाची अडचण वाढली आहे. उर्वरित तीन साक्षीदारांनीसुद्धा सरकार पक्षाने विचारलेल्या प्रश्नांना काहीच उत्तरे दिली नाहीत. मृतक बंडू गिरी यांच्या पत्नीनेसुद्धा आपल्याला पतीचा अपघात झाल्याचा फोन आला होता. त्यांचा खून झाला की नाही झाला, याबाबत आपल्याला माहीत नसल्याचे न्यायालयाला सांगितल्याने प्रकरण आरोपींच्या पथ्थ्यावर पडले आहे.