शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

बियाणे बाजारात आतापर्यंत पाच टक्केच खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 14:31 IST

अकोला : यावर्षी दमदार मान्सूनचे भाकीत वर्तविण्यात आले असून, या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊसही जोरात झाला; पण अद्याप शेतकºयांनी अपेक्षेनुसार बियाणे खरेदी सुरू केली नाही. शनिवारी बियाणे बाजाराचा आढावा घेतला असता आतापर्यंत किरकोळ बियाण्यांची विक्री केवळ पाच टक्केच झाल्याचे समोर आले.

ठळक मुद्देयावर्षी शेतकरी पहिला दमदार १०० मि.मी. पाऊस पडल्यावरच बियाणे खरेदीला सुरुवात करतील, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवित आहेत.काही प्रमाणात सधन शेतकºयांनी बियाणे खरेदी केली. अल्पभूधारक शेतकºयांनी मात्र बाजाराकडे पाठ फिरविली आहे.

अकोला : यावर्षी दमदार मान्सूनचे भाकीत वर्तविण्यात आले असून, या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊसही जोरात झाला; पण अद्याप शेतकºयांनी अपेक्षेनुसार बियाणे खरेदी सुरू केली नाही. शनिवारी बियाणे बाजाराचा आढावा घेतला असता आतापर्यंत किरकोळ बियाण्यांची विक्री केवळ पाच टक्केच झाल्याचे समोर आले. याअगोदर बियाणे खरेदीला इतका उशीर कधीच झाला नसल्याचे बियाणे कंपन्या वर्तुळातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेतकºयांच्या हातात पैसा नाही, हे यामागील एक कारण असले, तरी मान्सूनचे चित्र स्पष्ट झाल्याशिवाय शेतकरी पेरणीसाठीची तिफण बाहेर काढणार नसल्याचे कृषी तज्ज्ञही शक्यता वर्तवित आहेत, असे चित्र संपूर्ण राज्यासह विदर्भातील आहे.यावर्षी मान्सूनचे अनुकूल भाकीत बघता खासगी कंपन्यांसह महाबीजने बाजारात बियाणे आणले; पण मागच्या वर्षीचा अनुभव बघता शेतकरी सध्याच बियाणे खरेदी करायला तयार नाहीत. मागच्या वर्षी शेतकºयांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. मूग, उडिदाचे पीक हातचे गेले. सोयाबीनचे उत्पादन प्रचंड घटले. विषम हवामानामुळे कापसावर बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी शेतकरी पहिला दमदार १०० मि.मी. पाऊस पडल्यावरच बियाणे खरेदीला सुरुवात करतील, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवित आहेत.विदर्भातील ४९ लाख हेक्टरपैकी खरिपाचे सर्वात जास्त ३२ लाख हेक्टरच्यावर क्षेत्र पश्चिम विदर्भात आहे. पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती हे पाच जिल्हे येतात. या पाच जिल्ह्यांत अकोल्याची बियाणे बाजारपेठ मोठी असून, अनेक प्रकारच्या बियाणे खरेदीसाठी येथे शेतकरी येतात. येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे व महाराष्टÑ राज्य बियाणे महमंडळाचे (महाबीज) मुख्यालय आहे. कृषी विद्यापीठाचे व महाबीजचे बियाणे शेतकरी खरेदी करतात; पण यावर्षी अनुदानावरील बीजोत्पादनासाठीच्या परमिटवरील बियाणे काही प्रमाणात शेतकºयांनी खरेदी केले. बीजोत्पादनासाठीच्या बियाण्यांची मर्यादा एक एकर असून, सोयाबीनची ३० किलोची गोणी १,३५० रुपयांना आहे. काही प्रमाणात सधन शेतकºयांनी बियाणे खरेदी केली. अल्पभूधारक शेतकºयांनी मात्र बाजाराकडे पाठ फिरविली आहे. आतापर्यंत केवळ पाच टक्के किरकोळ बियाणे विक्री झाली.- किरकोळ बियाणे विक्री आतापर्यंत केवळ पाच टक्के झाली, असे चित्र यापूर्वी कधी बघितले नाही. यापूर्वी जून रोजी ८ तारखेपर्यंत बियाणे संपून जात होते. आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.दिनेशभाई शाह,कृषी निविष्ठा अभ्यासक,अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती