शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

बदलीसाठी पाच पर्यायांमुळे पोलिसांच्या मनसुब्यावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 12:53 IST

एकाच उपविभागात राहण्यासाठीचा खटाटोप करणाºया पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी यापूर्वी तीन ठिकाणचे पर्याय मागण्यात येत होते; मात्र आता पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाच पर्यायी ठिकाणांचा फॉर्म्युला अवलंबविल्याचे समजते. एकाच उपविभागात राहण्यासाठीचा खटाटोप करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. एकाच उपविभागात तसेच एकाच ठाण्यात अनेक वर्षांपासून ठाण मांडून असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांवर आता मर्जीचे ठिकाण सोडण्याची वेळ येणार असल्याचे संकेत आहेत.अकोला पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणावरून १५ टक्के बदल्या करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यापूर्वी या बदल्या करताना पोलीस कर्मचाऱ्यांना तीन पर्यायी ठिकाणे मागण्यात येत होती. त्यामुळे काही पोलीस कर्मचारी त्याच उपविभागात राहून त्यांना हवी तशा प्रकारची ड्युटी करीत होते; मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षक गावकर यांनी पाच पर्याय मागविले होते. त्याचप्रमाणे आता पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनीसुद्धा पाच पर्यायी ठिकाणांचा फॉर्म्युला अवलंबल्याचे समजते. त्यामुळे अनेक वर्षांपासून ठाण मांडलेल्या तसेच संलग्नच्या नावे एकाच उपविभागात राहण्यासाठी प्रयत्न करणाºया पोलीस कर्मचाºयांचे मनसुबे उधळले जाणार असल्याची चर्चा आहे. या पाच पर्यायी कारणामुळे संबंधित कर्मचाºयाला उपविभागाच्या बाहेर ड्युटी करण्याचे काम पडणार असल्याचे निश्चित आहे. याच कारणामुळे अनेकांची आता पाचावर धारण बसली आहे. ही बदली प्रक्रिया शासनाच्या आदेशानंतर पूर्ण करण्यात येत असून, अकोला पोलीस दलातील ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाºयांच्या बदल्या होणार आहेत.अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचारी तिथेच!काही पोलीस अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील कर्मचारी हे त्यांना हव्या असलेल्या ठिकाणीच ड्युटी करीत असल्याचे वास्तव आहे.काही अधिकाºयाच्या मर्जीतील कर्मचाºयांना त्यांच्याच अधीनस्त ठेवण्यासाठी ते अधिकारीच प्रयत्न करीत असल्याचे समजते.त्यामुळे नवीन दमाचे तसेच प्रामाणिक असलेल्या पोलीस कर्मचाºयांना काम करण्याची संधी मिळत नसल्याचेही वास्तव आहे.

गोपनीय सेटिंगबदल्यांसाठी काही जणांनी नेहमीप्रमाणे सेटिंग लावली आसल्याचे बोलले जात आहे; मात्र पोलीस बदली प्रक्रियेत पोलीस अधीक्षक यांनी स्वत: लक्ष केंद्रित केल्याने संबंधितांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली असल्याचे समजते.अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात काही कर्मचारी तब्बल सहा ते सात वर्षांपासून कार्यरत आहेत, तर हेच कर्मचारी यापूर्वी अकोट शहर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस