शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अकोलेकरांच्या वाट्याला पाच नवीन गाड्या

By admin | Updated: July 11, 2014 00:34 IST

नव्याने सुरू करण्यात येणार्‍या गाड्यांपैकी ५ गाड्या अकोलेकरांच्या वाट्याला येणार आहेत;

अकोला : नव्यानेच सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प मंगळवारी संसदेत सादर केला. हायटेक बाबींचा अंतर्भाव असलेल्या या अर्थसंकल्पात भुसावळ-वर्धादरम्यान तिसरा ट्रॅक (रेल्वे मार्ग) निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली. नव्याने सुरू करण्यात येणार्‍या गाड्यांपैकी ५ गाड्या अकोलेकरांच्या वाट्याला येणार आहेत; मात्र स्थानिक खासदारांनी केंद्रात रेटून धरलेली अकोला-खंडवा गेजपरिवर्तनाची मागणी मान्य न झाल्याने अकोलेकरांचा भ्रमनिरास झाला आहे. नव्याने सुरू करण्यात येणार्‍या गाड्यांमध्ये २७ नवीन, ५ प्रिमियम, ५ जनसाधारण, ८ पॅसेंजर, २ एमईएमयू, ५ डीईएमयू, ६ संपूर्ण वातानुकूलित आणि ११ गाड्यांचा विस्तार करण्यात येणार आहे. लवकरच नव्याने सुरू होणार्‍या गाड्यापैकी नागपूर-पुणे, नागपूर-मुंबई (संपूर्ण वातानुकूलित), मुंबई-काजीपेठ, हापा-बिलासपूर आणि नांदेड-बिकानेर या पाच गाड्या अकोलेकरांच्या वाट्याला येणार आहेत. या मार्गावर गाड्यांचे आवागमन वाढले असल्याने भुसावळ ते वर्धादरम्यान आणखी एक तिसरा रेल्वे मार्ग निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अकोला-खंडवा, खामगाव-जालना, अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ, वर्धा-यवतमाळ-नांदेड, वाशिम-आदिलाबाद या सर्व प्रकल्पांशी अकोलेकरांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे या प्रकल्पांना यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात हिरवी झेंडी मिळेल अशी आशा वैदर्भीयांना होती. स्थानिक खासदारांनी अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनाचा मुद्दा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे रेटूनदेखील धरला होता; मात्र मंगळवारी सादर करण्यात आलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात कुठलाच प्रकल्पाबाबत घोषणा न झाल्याने अकोलेकरांचा भ्रमनिरास झाला आहे.