शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आणखी पाच शेतक-‍यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 3, 2015 02:36 IST

पश्‍चिम वर्‍हाडातील दोन शेतक-‍यांसह एका शेतमजुराने संपवली जीवनयात्रा.

अकोला : दोन शेतकर्‍यांसह एका शेतमजुराने आत्महत्याच्या केल्याच्या घटना पश्‍चिम वर्‍हाडात गुरूवारी घडल्या. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे जिवनयात्रा संपविणार्‍या या शेतकर्‍यांमध्ये एक वाशिम जिल्ह्यातील, तर दोघे बुलडाणा जिल्ह्यातील आहेतवर्धेतील दोन आणि नगरमधील एकाचा समावेश आहे.. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ खुर्द येथील अंबादास पांडुरंग निर्मळ (वय ४५) हे २९ मार्च रोजी शेगाव येथे जात असल्याचे सांगून घरून निघून गेले होते. ३0 मार्च रोजी त्यांनी शेगाव परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. निर्मळ यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांच्याकडे पतसंस्थेचे कर्ज थकीत होते. नापिकी आणि कर्जामुळे ते आर्थिक विंवचनेत होते. दुसर्‍या एका घटनेत, वाशिम जिल्ह्यातील येवता बंदी येथील एका ५५ वर्षिय शेतकर्‍याने गुरूवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. सततचे आजारपण आणि नापिकीला कंटाळून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. अरुण लक्ष्मण बोनके हे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काळे येथील शेतमजूर गणपत संपत लाहुडकर (वय ५५) यांनी गुरूवारी आत्महत्या केली. ते शेती ठोक्याने घेवून करीत होते. यावर्षी शेतीत लावलेला खर्चसुध्दा निघणे कठीण झाले. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या शेतमजुराने हिंगणा शिवारातील एका शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.