शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

राज्यात आणखी पाच शेतक-‍यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 3, 2015 02:36 IST

पश्‍चिम वर्‍हाडातील दोन शेतक-‍यांसह एका शेतमजुराने संपवली जीवनयात्रा.

अकोला : दोन शेतकर्‍यांसह एका शेतमजुराने आत्महत्याच्या केल्याच्या घटना पश्‍चिम वर्‍हाडात गुरूवारी घडल्या. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे जिवनयात्रा संपविणार्‍या या शेतकर्‍यांमध्ये एक वाशिम जिल्ह्यातील, तर दोघे बुलडाणा जिल्ह्यातील आहेतवर्धेतील दोन आणि नगरमधील एकाचा समावेश आहे.. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ खुर्द येथील अंबादास पांडुरंग निर्मळ (वय ४५) हे २९ मार्च रोजी शेगाव येथे जात असल्याचे सांगून घरून निघून गेले होते. ३0 मार्च रोजी त्यांनी शेगाव परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. निर्मळ यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांच्याकडे पतसंस्थेचे कर्ज थकीत होते. नापिकी आणि कर्जामुळे ते आर्थिक विंवचनेत होते. दुसर्‍या एका घटनेत, वाशिम जिल्ह्यातील येवता बंदी येथील एका ५५ वर्षिय शेतकर्‍याने गुरूवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. सततचे आजारपण आणि नापिकीला कंटाळून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. अरुण लक्ष्मण बोनके हे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काळे येथील शेतमजूर गणपत संपत लाहुडकर (वय ५५) यांनी गुरूवारी आत्महत्या केली. ते शेती ठोक्याने घेवून करीत होते. यावर्षी शेतीत लावलेला खर्चसुध्दा निघणे कठीण झाले. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या या शेतमजुराने हिंगणा शिवारातील एका शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.