शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पारस दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबांना पाच लाखांची मदत घोषित ! गिरीश महाजन यांची माहिती

By संतोष येलकर | Updated: April 10, 2023 20:20 IST

सर्व जखमींवर शासन खर्चातून होणार उपचार.

अकोला: अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे टिनपत्राच्या सभामंडपावर कडूनिंबाचे झाड कोसळून सात भाविक ठार झाल्याची घटना रविवारी अकोला जिल्हयातील बाळापूर तालुक्यात पारस येथील बाबुजी महाराज संस्थान येथे घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, या दुर्घटनेतील सात मृतकांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य शासनाने घोषित केली आहे. तसेच जखमींवर शासन खर्चातून उपचार करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी येथे दिली.

अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पारस येथील दुर्घटनेतील जखमींची भेट घेवून त्यांच्या प्रकृती विचारपूस करीत जखमी रुग्णांवर सुरु असलेल्या उपचाराची गिरीश महाजन यांनी आरोग्य यंत्रणांसह संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पारस येथील दुर्घटना अतिशय गंभीर असून, या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सात भाविकांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत शासनाने घोषित केली असून, दुर्घटनेतील २४ जखमींवर शासन खर्चातून उपचार सुरु आहेत.

मृतकांच्या कुटुंबियांना शासन निकषानुसार मदत जाहीर करण्यात आली असून, जखमींपैकी फ्रॅक्चर आणि अन्य गंभीर दुखापत असलेल्या जखमींना मदत करण्याचा प्रयत्न असून, जखमीपैकी गंभीर असलेल्या एका रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी लवकरच धोक्याबाहेर येणार असल्याचे महाजन यांनी सांगीतले. मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे सभामंडपावर झाड कोसळल्याने ही दुर्घटना घडली असून, गावकऱ्यांनी हातभार लावून मदतकार्य करण्यात आले, असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिष पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ.मिनाक्षी गजभिये, माजी महापौर अर्चना मसने, अकोल्याचे तहसीलदार सुनील पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

....................................विरोधकांकडून विनाकारण

कुरापती काढण्याचे काम सुरु !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिग्री’च्या मुद्दयांसह इतर मुद्दयांवर विरोधकांकडून विनाकारण कुरापती काढण्याचे काम सुरु असल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला. डिग्री पाहून जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला निवडून दिले नाही तर त्यांचे काम पाहून निवडून दिले, असे महाजन यांनी यावेळी सांगीतले.

टॅग्स :AccidentअपघातAkolaअकोलाDeathमृत्यू