शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

पारस दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबांना पाच लाखांची मदत घोषित ! गिरीश महाजन यांची माहिती

By संतोष येलकर | Updated: April 10, 2023 20:20 IST

सर्व जखमींवर शासन खर्चातून होणार उपचार.

अकोला: अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे टिनपत्राच्या सभामंडपावर कडूनिंबाचे झाड कोसळून सात भाविक ठार झाल्याची घटना रविवारी अकोला जिल्हयातील बाळापूर तालुक्यात पारस येथील बाबुजी महाराज संस्थान येथे घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, या दुर्घटनेतील सात मृतकांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य शासनाने घोषित केली आहे. तसेच जखमींवर शासन खर्चातून उपचार करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी येथे दिली.

अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पारस येथील दुर्घटनेतील जखमींची भेट घेवून त्यांच्या प्रकृती विचारपूस करीत जखमी रुग्णांवर सुरु असलेल्या उपचाराची गिरीश महाजन यांनी आरोग्य यंत्रणांसह संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पारस येथील दुर्घटना अतिशय गंभीर असून, या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सात भाविकांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत शासनाने घोषित केली असून, दुर्घटनेतील २४ जखमींवर शासन खर्चातून उपचार सुरु आहेत.

मृतकांच्या कुटुंबियांना शासन निकषानुसार मदत जाहीर करण्यात आली असून, जखमींपैकी फ्रॅक्चर आणि अन्य गंभीर दुखापत असलेल्या जखमींना मदत करण्याचा प्रयत्न असून, जखमीपैकी गंभीर असलेल्या एका रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी लवकरच धोक्याबाहेर येणार असल्याचे महाजन यांनी सांगीतले. मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे सभामंडपावर झाड कोसळल्याने ही दुर्घटना घडली असून, गावकऱ्यांनी हातभार लावून मदतकार्य करण्यात आले, असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिष पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ.मिनाक्षी गजभिये, माजी महापौर अर्चना मसने, अकोल्याचे तहसीलदार सुनील पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

....................................विरोधकांकडून विनाकारण

कुरापती काढण्याचे काम सुरु !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिग्री’च्या मुद्दयांसह इतर मुद्दयांवर विरोधकांकडून विनाकारण कुरापती काढण्याचे काम सुरु असल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला. डिग्री पाहून जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला निवडून दिले नाही तर त्यांचे काम पाहून निवडून दिले, असे महाजन यांनी यावेळी सांगीतले.

टॅग्स :AccidentअपघातAkolaअकोलाDeathमृत्यू