शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

पारस दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबांना पाच लाखांची मदत घोषित ! गिरीश महाजन यांची माहिती

By संतोष येलकर | Updated: April 10, 2023 20:20 IST

सर्व जखमींवर शासन खर्चातून होणार उपचार.

अकोला: अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे टिनपत्राच्या सभामंडपावर कडूनिंबाचे झाड कोसळून सात भाविक ठार झाल्याची घटना रविवारी अकोला जिल्हयातील बाळापूर तालुक्यात पारस येथील बाबुजी महाराज संस्थान येथे घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, या दुर्घटनेतील सात मृतकांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य शासनाने घोषित केली आहे. तसेच जखमींवर शासन खर्चातून उपचार करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी येथे दिली.

अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पारस येथील दुर्घटनेतील जखमींची भेट घेवून त्यांच्या प्रकृती विचारपूस करीत जखमी रुग्णांवर सुरु असलेल्या उपचाराची गिरीश महाजन यांनी आरोग्य यंत्रणांसह संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पारस येथील दुर्घटना अतिशय गंभीर असून, या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सात भाविकांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत शासनाने घोषित केली असून, दुर्घटनेतील २४ जखमींवर शासन खर्चातून उपचार सुरु आहेत.

मृतकांच्या कुटुंबियांना शासन निकषानुसार मदत जाहीर करण्यात आली असून, जखमींपैकी फ्रॅक्चर आणि अन्य गंभीर दुखापत असलेल्या जखमींना मदत करण्याचा प्रयत्न असून, जखमीपैकी गंभीर असलेल्या एका रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी लवकरच धोक्याबाहेर येणार असल्याचे महाजन यांनी सांगीतले. मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे सभामंडपावर झाड कोसळल्याने ही दुर्घटना घडली असून, गावकऱ्यांनी हातभार लावून मदतकार्य करण्यात आले, असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिष पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ.मिनाक्षी गजभिये, माजी महापौर अर्चना मसने, अकोल्याचे तहसीलदार सुनील पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

....................................विरोधकांकडून विनाकारण

कुरापती काढण्याचे काम सुरु !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिग्री’च्या मुद्दयांसह इतर मुद्दयांवर विरोधकांकडून विनाकारण कुरापती काढण्याचे काम सुरु असल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला. डिग्री पाहून जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला निवडून दिले नाही तर त्यांचे काम पाहून निवडून दिले, असे महाजन यांनी यावेळी सांगीतले.

टॅग्स :AccidentअपघातAkolaअकोलाDeathमृत्यू