शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

अपु-या जलसाठय़ामुळे मत्स्य व्यवसाय धोक्यात!

By admin | Updated: September 20, 2016 00:30 IST

बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती; अल्प पावसामुळे मस्त्य बीज खराब होण्याचा धोका.

नीलेश शहाकार बुलडाणा, दि. १९ : शासन विविध सुविधा व अनुदान देत असल्यामुळे शेतकरी आता शेतीसोबतच मत्स्योत्पादनाकडेही वळले आहेत. मात्र यावर्षी जलाशयांमध्ये कमी जलसाठा असल्यामुळे आगामी काळात मत्स्य व्यवसाय धोक्यात आला आहे. गोड्यापाण्यातील मत्स्योत्पादनाचा व्यवसाय पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. मात्र बर्‍याच जलाशयात अद्यापही पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. अपुर्‍या पावसामुळे मस्त्य बीज खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.जिल्ह्यामध्ये १३ हजार ६९५ हेक्टर क्षेत्र मत्स्योत्पादनासाठी अनुकूल आहे. शिवाय ४४0 कि.मी. लांबीचे नदीचे पात्रदेखील मत्स्य व्यवसायासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायासाठी जिल्ह्यात जिल्हा योजनेंतर्गत निरनिराळे कार्यक्रम राबविले जातात. यामुळे मत्स्य व्यवसायातून आता जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पर्यायी जोडधंदा मिळाला असून, २0१५-१६ मध्ये २५0५ मे. टन भूजल मत्स्योत्पादन जिल्ह्यात झाले आहे.जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाकरिता जिल्हा योजनेंतर्गत निरनिराळे कार्यक्रम राबविले जातात. मच्छीमार युवकांना प्रशिक्षण, अवरुद्ध पाण्यातील मत्स्य संवर्धन, मच्छीमार साधनांच्या खरेदीवर अर्थ सहाय्य, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना भाग भांडवल, मच्छीमारांना विमा उतरविण्यासाठी अनुदान इत्यादी योजनांचा यात सहभाग आहे. जिल्ह्यामध्ये काही तालुक्यात पाटबंधारे प्रकल्पाखाली मत्स्य बीज निर्मित केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात येथून कटला, रोहू, मृगळ, साप्रनस, ग्रासकार्य, सिल्हर कार्य आदी जातीच्या मत्स्य बीजांची निर्मिती करण्यात येते. ही मत्स्य बीज जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांना तलावात सोडण्यासाठी पुरविण्यात येतात. हे मत्स्य बीज मोठे झाल्यानंतर मच्छीमार संस्थांना विकली जातात. मच्छीमार सहकारी संस्था ही बिजे तलावात सोडून त्यांचे संगोपन करतात व मोठी झाल्यावर विकतात. यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात भर पडते. तालुका              मत्स्योत्पादन अनुकूल जलाशय (हेक्टर)जळगाव जामोद         १६४संग्रामपूर                     ९९चिखली                   १0५0 बुलडाणा                  १६३५ देऊळगाव राजा        २३0३मेहकर                    ३२१४सिंदखेड राजा             ७0८लोणार                    १0४४खामगाव                 १७७८शेगाव                        ६६.५0 मलकापूर                   २९मोताळा                 १५५0नांदुरा                       ५५मस्त्यबिजांना धोकाबुलडाणा जिल्ह्यात ४२४ तळे, सरोवर व नद्यांतील पाण्यामुळे मत्स्य उत्पादनाचा पारंपरिक व्यवसाय सुरू आहे. या अंतर्गत गोडे पाण्यातील मत्स्य व्यवसायासाठी ७ हजार ७८७.६ हेक्टर जलक्षेत्र आले आहे. गोडे पाण्यातील मत्स्योत्पादनाचा हा व्यवसाय पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे; मात्र बर्‍याच जलाशयाला अद्यापही पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसायाला धोका निर्माण झाला आहे. अपुर्‍या पावसामुळे मस्त्य बीज खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.