शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

स्वातंत्र्यानंतर प्रथमच पिंपळडोळी ते पांढुर्णा धावली बस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 15:32 IST

अकोला : पातूर तालुक्यातील पांढुर्णा या गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच राज्य परिवहन महामंडळाची बस फेरी सुरू करण्यात आली.

अकोला : पातूर तालुक्यातील पांढुर्णा या गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच राज्य परिवहन महामंडळाची बस फेरी सुरू करण्यात आली. या फेरीच्या शुभारंभप्रसंगी शनिवारी राज्याचे गृहराज्यमंत्री ना. डॉ. रणजित पाटील व आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासह अनेक मान्यवरांनी पिंपळडोळी ते पांढुर्णा असा बस प्रवास करून ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित केला.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पिंपळडोळी ते पांढुर्णा या ठिकाणी नवीन रस्त्याचे लोकार्पण व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस सेवेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी पालकमंत्र्यांनी भाषणात सांगितले, की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच या गावात एसटी बस सेवा सुरू झाली असून, पुलांची व रस्त्यांची रुंदी कमी असल्यामुळे गावात बस जाऊ शकत नव्हती; मात्र वन विभागाकडे पाठपुरावा करून रस्त्याची आणि पुलांची रुंदी वाढून घेतली व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २ कोटी ७२ लाख रुपये पाच किलोमीटर अंतरासाठी निधी उपलब्ध करून दिला. यामुळे एसटी बस सेवा सुरू झाली आहे. आरोग्य, शेती, शिक्षण आणि गावातील इतर सुविधांसाठी ही बस सेवा नक्कीच लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, माजी आ. नारायण गव्हाणकर, माजी आमदार वसंतराव खोटरे, विभाग नियंत्रक, रा.प.म. चेतना खिरवाडकर आणि गावच्या सरपंच लक्ष्मी सुभाष शेळके, स्मिता सुतवणे, अरविंद पिसोळे, संजय आकोन, विश्वास बच्चे, पुंडलिकराव आखरे, श्रीकांत भराटे, सुभाष जैन, रावसाहेब देशमुख, सदाशिव चौहान, गजानन ठाकरे, प्रभू राठोड, सुखनंदन डाखोरे, रवींद्र मरतळकर, अजय लांडे, गोपाल महल्ले, संजय चौधरी व नरेश खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलstate transportएसटी