शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पहिल्या दिवशी सरकारी खरेदी केंद्रांवर सोयाबीन, उडिदाचा दाणाही नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 12:31 IST

पहिल्या दिवशी (शुक्रवारी) जिल्ह्यातील सरकारी खरेदी केंद्रांवर सोयाबीन व उडिदाचा दाणाही खरेदी करण्यात आला नाही.

अकोला : सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’द्वारे जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांवर शुक्रवार, ८ नोव्हेंबरपासून हमीदराने उडीद व सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात आली; मात्र खरेदीच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सातही केंद्रांवर सोयाबीन व उडीद विक्रीसाठी एकही शेतकरी आला नाही. शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने खरेदीच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी) जिल्ह्यातील सरकारी खरेदी केंद्रांवर सोयाबीन व उडिदाचा दाणाही खरेदी करण्यात आला नाही.आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यात अकोला, अकोट, तेल्हारा, पातूर, वाडेगाव, पारस व मूर्तिजापूर इत्यादी सात खरेदी केंद्रांवर उडीद व सोयाबीनची हमीदराने खरेदी सुरू करण्यात आली. आॅनलाइन नोंदणी केलेल्या व एसएमएस पाठविण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि उडीद संबंधित केंद्रांवर खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये अकोला, अकोट व मूर्तिजापूर या तीन केंद्रांवर विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमार्फत आणि तेल्हारा, पातूर, पारस व वाडेगाव या चार केंद्रांवर जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत उडीद व सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात आली. ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांवर हमीदराने सोयाबीन व उडिदाची खरेदी सुरू करण्यात आली; मात्र खरेदीच्या पहिल्या दिवशी सातही केंद्रांवर एकाही शेतकºयाने सोयाबीन व उडीद विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर आणला नाही. त्यामुळे खरेदीच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सरकारी खरेदी केंद्रांवर सोयाबीन व उडिदाचा दाणाही खरेदी करण्यात आला नाही.सोयाबीन, उडिदाचे असे आहेत हमीदर व बाजारातील दर!‘नाफेड’मार्फत सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर सोयाबीन प्रतिक्विंटल ३ हजार ७१० रुपये व उडीद प्रतिक्विंटल ५ हजार ७०० रुपये हमीदराने खरेदी करण्यात येत आहे. बाजारात सोयाबीन प्रतिक्विंटल १ हजार ८०० ते ३ हजार ७०० रुपये आणि उडीद प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार ५०० रुपये दराने खरेदी करण्यात येत आहे.३२२ शेतकºयांना ‘एसएमएस’; पण केंद्रांवर आणला नाही शेतमाल!हमीदराने उडीद व सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यातील सातही खरेदी केंद्रांवर दोन हजार शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. त्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी १ हजार २५१ शेतकºयांनी आणि उडीद खरेदीसाठी ७४९ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १५७ सोयाबीन उत्पादक शेतकºयांना व १६५ उडीद उत्पादक शेतकºयांना शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आणण्याचे ‘एसएमएस’ ७ नोव्हेंबरपर्यंत पाठविण्यात आले. ‘एसएमएस’ पाठविण्यात आलेल्या एकाही शेतकºयाने खरेदीच्या पहिल्या दिवशी खरेदी केंद्रांवर शेतमाल आणला नाही.खरेदी केंद्रांवर शुकशुकाट!जिल्ह्यात हमीदराने उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नाफेडमार्फत सात खरेदी केंदे्र सुरू करण्यात आली; परंतु खरेदीच्या पहिल्या दिवशी एकाही केंद्रावर शेतकºयांना सोयाबीन व उडीद विक्रीसाठी आणला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सातही खरेदी केंद्रांवर शुकशुकाट दिसत होता.सोयाबीन भिजले-सडले; विक्रीसाठी आणणार कोठून?यंदाच्या पावसाळ्यात प्रारंभी पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यात मूग, उडिदाचे पीक बुडाले. त्यानंतर गत महिनाभरापासून अवकाळी पावसाचा कहर सुरूच असल्याने अवकाळी पावसाच्या तडाख्यात कापणीला आलेले आणि कापणी झालेले सोयाबीन भिजले असून, अनेक शेतात सोयाबीन सडले आहे. त्यामुळे शेतकरी हमीदराच्या केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी आणणार तरी कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी