शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मळसूर येथे अग्नितांडव; पाच घरांसह दोन गोठे पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2022 18:42 IST

Fire at Malsur; पातूर तालुक्यातील मळसूर येथे भर दुपारच्या सुमारास आग लागली.

मळसूर : पातूर तालुक्यातील मळसूर येथे दि. १७ मे रोजी लागलेल्या भीषण आगीत पाच घरांसह दोन गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या आगीत पाचपैकी तीन घरे खाक झाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.

सध्या उन्हाचा पारा ४५ पार झाला असून, वाढलेल्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच पातूर तालुक्यातील मळसूर येथे भर दुपारच्या सुमारास आग लागली. आगीने पेट धरत पाच घरांना कवाट्यात घेत रौद्ररूप धारण केले होते. या आगीत संदीप नारायण तायडे, किशोर नारायण तायडे, नंदा नारायण तायडे यांचे घर जळून खाक झाले तर, त्यांच्या शेजारी असलेल्या पुरुषोत्तम तायडे, रमेश तुकाराम राखोंडे यांच्या गोठ्यातील शेती उपयोगी साहित्यही जळून खाक झाले. तसेच आगीच्या लोटाने पुन्हा पेट धरत शेजारीच असलेले गोविंदा सुखदेव राखोंडे, सखाराम सुखदेव राखोंडे यांच्या घराचेही नुकसान झाले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ग्रामस्थांनी समयसूचकता बाळगत गोठ्यातील गुरे, घरातील नागरिक व मूल्यवान वस्तू, टॅक्टर बाहेर काढले होते. दरम्यान, या आगीत अन्नध्यान्य, कपडे, साहित्यांसह लाखोंचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी ढोरे तलाठी इचे व नळकांडे गावचे सरपंच पोलीस पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्याची प्रत पातूर तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यात असून, नुकसानग्रस्त नागरिकांना मदत देण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाfireआग