शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

राज्यात १०० दिवसात एसटीला २ हजार कोटींचे आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 12:59 IST

- सचिन राऊत अकोला : कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळलेली असतानाच लॉकडाऊनपासून ते आतापर्यंत १०० दिवसांमध्ये एसटीला राज्यात तब्बल ...

- सचिन राऊत

अकोला : कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळलेली असतानाच लॉकडाऊनपासून ते आतापर्यंत १०० दिवसांमध्ये एसटीला राज्यात तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच कारणामुळे राज्य परिवहन महामंडळात असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाचेही मोठे वांधे झाले आहेत.राज्य परिवहन महामंडळाच्या दररोजच्या हजारो फेºयांच्या माध्यमातून राज्यातील सर्व बस डेपोचे तब्बल २१ कोटी रुपयांचे सर्वसाधारण उत्पन्न होते; मात्र २० मार्चनंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कोरोनाच्या भीतीमुळे बंद करण्यात आल्याने एसटीची चाके १०० दिवसांपासून थांबलेली आहेत. त्यामुळे हजारो अधिकारी व कर्मचारी घरीच बसून असल्याने महामंडळाला दिवसाला तब्बल २१ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यानुसार गत १०० दिवसांच्या कालावधीत एसटी महामंडळाला तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. याच कारणामुळे अधिकारी व कर्मचाºयांचे वेतन देण्यासही एसटीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे; मात्र तरीही एसटी महामंडळाच्या मंत्र्यासह अधिकारी व कर्मचाºयांनी खचून न जाता कोरोनाला लढा देत मालवाहतुकीच्या क्षेत्रात पाउल टाकले. या माध्यमातून त्यांनी उत्पन्न गोळा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहेस मात्र मालवाहतुकीतून येणारे उत्पन्न हे खारीचा वाटा उचलणारे असल्याने सध्या तरी एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाºयांना याच अडचणींचा आणखी काही दिवसा सामना करावा लागणार असल्याची माहिती आहे. गत १०० दिवसांच्या कालावधीत एसटीने २ हजार २०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन केले आहे; मात्र आता काही जिल्ह्यात एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.विनाकारणच्या खर्चाला कात्रीराज्य परिवहन महामंडळाने विनाकारण होणाºया खर्चाला आता कात्री लावणे सुरू केले आहे. त्यामुळे अधिकाºयांच्या रजा व भत्ते बंद केल्यानंतर आता विविध सुविधाही कमी करण्यात येत आहे. एसी तसेच इतर हायफाय खर्च कमी करून एसटी महामंडळ आर्थिक तोट्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी अधिकाºयांनीही खांद्याला खांदा लावून साथ देण्याचे आवाहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून करण्यात येत आहे.

रुग्णवाहिका, मालवाहतुकीचा आधारराज्य परिवहन महामंडळाचे खर्च भागविण्याचेही वांधे सध्या सुरू आहेत; मात्र राज्यातील सर्वात प्रथम अकोला जिल्ह्यातून एसटीने मालवाहतुकीस प्रारंभ करून उत्पन्न मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याच माध्यमातून आतापर्यंत १ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न एसटी महामंडळाला प्राप्त झालेले आहे; मात्र हे उत्पन्न प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत अत्यल्प असल्याने एसटीची चाके पुन्हा रस्त्यावर येण्याचीच प्रतीक्षा आहे. त्यानंतरच एसटीची आर्थिक घडी सुरळीत चालणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटी