शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत आर्थिक अपहार; शिवसेना आमदारांच्या खात्याचा गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 16:58 IST

पीक कर्जाची उचल करून शासनाला कोट्यवधी रुपयांनी गंडविल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी उजेडात आणला आहे.

अकोला: पीक कर्जाच्या रकमेची उचल न केलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यांचा गैरवापर करून त्यांच्या नावाने पीक कर्जाची उचल करून शासनाला कोट्यवधी रुपयांनी गंडविल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी उजेडात आणला आहे. पातूर तालुक्यातील चान्नी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या तत्कालीन अधिकाºयांनी शिवसेनेच्या आमदारांसह या भागातील अनेक शेतकºयांच्या नावाने शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत आ. नितीन देशमुख यांनी केला.पातूर तालुक्यातील चान्नी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या तत्कालीन अधिकाºयांनी या परिसरातील शेतकºयांच्या नावाने पीक कर्जाची उचल करणे, थकीत रकमेचा भरणा न करता संबंधित शेतकºयांची नावे कर्जमाफीच्या यादीमध्ये समाविष्ट करणे आणि त्यानंतर शासनाकडून मिळालेल्या कर्जमाफीची रक्कम पुन्हा परस्पर हडप करणे अशा गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांचा खुद्द या बँकेचे खातेदार शिवसेना आ. नितीन देशमुख यांनी भंडाफोड केला. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील तत्कालीन अधिकाºयांनी शेतकºयांच्या नावाचा तसेच बँक खात्यांचा दुरुपयोग करून शासनाला कोट्यवधी रुपयांनी कसा चुना लावला. याचा पाढाच आयोजित पत्रकार परिषदेत आ. देशमुख यांनी वाचला. आ. देशमुख यांनी १३ मे २०१३ रोजी या बँकेतून एक लाख रुपये कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड २० मार्च २०१७ रोजी करण्यात आली. त्यानंतर बँकेने कर्जाची परतफेड केल्यानंतर कर्ज खाते बंद करणे क्रमप्राप्त होते. तसे न करता कालांतराने आमदार देशमुख यांच्या खात्यातून ७७ हजार ४०७ रुपयांच्या कर्जाची परस्पर पुन्हा उचल करण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच आ. देशमुख यांनी यासंदर्भात बँकेकडे २८ एप्रिल २०२० रोजी तक्रार केली असता आ. देशमुख यांच्या बँक खात्याचा दुरुपयोग करीत तत्कालीन बँक अधिकाºयांनी ७७ हजार ४०७ रुपयांची अफरातफर केल्याचा प्रकार विद्यमान बँक अधिकाºयांच्या निदर्शनास आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याची माहिती आ. नितीन देशमुख यांनी दिली. यावेळी सेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जि. प. सदस्य गोपाल दातकर, अकोला तालुका प्रमुख विकास पागृत, शहर प्रमुख (पूर्व) अतुल पवनीकर, उमेश जाधव, बबलू देशमुख व युवा सेना उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे उपस्थित होते.

शेतकरी अस्तित्वात नाही; तरीही पीक कर्जाचे पुनर्गठनबँकेतील तत्कालीन अधिकाºयांनी प्रकाश ओंकार जावळे रा. उमरा पांगरा या शेतकºयांच्या नावाने ९८ हजार रुपयांचे कर्ज घेतले. पीक कर्जाचे खाते पात्र नसताना चुकीचे पुनर्गठन केले. तसेच उचल केलेली रक्कम दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळती केली. चौकशीअंती प्रकाश ओंकार जावळे नामक शेतकरीच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या भागातील मोतीराम संपत मावळकर यांच्या मृत्यूनंतर बँकेने त्यांना मिळालेली पीक विम्याची ३६ हजार रुपयांची रक्कम परस्पर अदा केली. हा व्यवहार बँकेतील दस्तऐवजामध्ये कोठेही आढळून आला नाही. 

टॅग्स :Akolaअकोलाbankबँकfraudधोकेबाजी