शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या पेरणीसाठी आर्थिक बजेट कोलमडले

By admin | Updated: June 1, 2017 01:36 IST

बँकांनी हात आखडले; शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : सध्या खरीप हंगामाची तयारी शेतकरी करीत असून, शेती मशागतीसह बियाणे, खते विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे; मात्र बँकांनी हात आखडता घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तेल्हारा तालुक्यातील जनतेचे आर्थिक व्यवहार करण्याचे मुख्य शहर म्हणजे तेल्हारा. तालुक्यातील दहीगाव, माळेगाव, हिवरखेड, भांबेरी, तळेगाव बाजार या मोठ्या गावांसह लहान ग्रामीण भागातून नागरिकांची दैनंदिन कामे करण्याकरिता तालुक्याच्या ठिकाणी धाव घेतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे बँक. कारण गेल्या सहा महिन्यांपासून जनतेने आपल्या भविष्यातील कामकाजाचा आधीच आढावा घेऊन गुंतवणूक करून ठेवलेले पैसे पूर्णपणे मिळत नसल्याने त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कारण ९/११ च्या नोटाबंदीनंतर प्रचंड प्रमाणात पैशांचा तुटवडा पडल्याने बँक आणि खातेदार यांच्यात तणाव निर्माण होत आहेत. लग्न, वस्तू खरेदी याकरिता लागणारा पैसा हा एकरकमी मिळत नसल्याने रोज थोडे थोडे पैसे काढून स्वत:च्या घरीच पैसे जमा करण्यावर नागरिकांनी पसंती दर्शविली आहे. त्यामुळे जुन्या काळातील लोकांना घरी पैसा जमा करण्याची जुनी पद्धत पुढे येत असल्याची आठवण होत आहे. लवकरच मृग नक्षत्राचे आगमन होत असून, शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. कारण बागायती शेतकरी १ जूनपासूनच कपाशीची लागवण करीत असल्याने त्याकरिता लागणारे बियाणे विकत आणणे गरजेचे आहे. त्यातही नामांकित असलेल्या पऱ्हाटीच्या कंपनीचे बियाणे उधारीवर मिळत नसल्याने नगदी घ्यावे लागेल. ते प्रचंड महाग असल्याने व त्यातही बँकांमधून केवळ २ ते ४ हजार रुपये मिळत असल्याने त्याचा समन्वय साधणे कठीण जात आहे. ज्या बँकांमध्ये आपले पैसे आहेत, त्या घरातील एक व्यक्ती रोज तेल्हारा येथील बँकांमध्ये पैसे काढण्याकरिता येत आहेत. त्यामुळे बँकांच्या व्यवहारात प्रचंड प्रमाणात वाढ झाली. पेरणीचे दिवस अगदी जवळ आले असून, बियाणे, खत, पेरणी, मजुरांची मजुरी तसेच दैनंदिन गरजा भागविण्याकरिता स्वकष्टाच्या कमाईतून कमावलेला पैसा बँकेत न ठेवता व वेळेवर पूर्ण पैसे मिळत नसल्याने घरीच पैसे जमा करून ठेवण्यावर जनतेचा कल असल्याचे दिसून येत आहे. दैनिक अल्पबचत ठेवीच्या माध्यमातून रोज मिळणाऱ्या दीडशे रुपये मजुरीमधील ५० रुपये गुंतवणूक करणे गरजेचे होते; परंतु बँकेमधून पूर्ण पैसे मिळणार की नाही मिळणार, त्यापेक्षा घरीच पैसे जमा केलेले बरे.- गजानन न. मोडोकार,शेतमजूर, रायखेड.पेरणीचे दिवस जवळ आले असून, कपाशीचे बियाणे, ज्वारी, उडीद, मूग, सोयाबीन यांच्या खरेदीकरिता लागणारा पैसा कसा गोळा करायचा.- उमेश व. धरमकर,शेतकरी, दहीगाव अवताडे.