शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अकाेला शहरासाठी जिगाव प्रकल्पातून २४ दलघमी जलसाठा आरक्षित

By आशीष गावंडे | Updated: June 21, 2024 21:41 IST

आ.सावरकर यांचा पत्रव्यवहार; महापालिकेला माेठा दिलासा

अकोला: शासनाने वान धरणातील पाणी आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महापालिकेने ‘अमृत अभियान’च्या टप्पा-२ अंतर्गत पाणीपुरवठा याेजनेसाठी तयार केलेला ७३६ कोटींचा ‘डीपीआर’ रखडला हाेता. शासनाच्या सुकाणू समितीने पाण्याचा पर्यायी स्रोत शोधण्याचे निर्देश दिल्यानंतर मनपाने बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव धरणातून पाणी आरक्षणासाठी धावाधाव सुरू केली हाेती. अखेर विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाने जिगाव प्रकल्पातून २४.१३ दलघमी जलसाठ्याच्या आरक्षणावर २० जून राेजी शिक्कामाेर्तब केले. यासंदर्भात भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पत्रव्यवहार केला हाेता. शासनाच्या निर्णयामुळे महापालिकेला माेठा दिलासा मिळाला आहे. 

अकोलेकरांना दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी ‘अमृत अभियान’ अंतर्गत केंद्र व राज्य शासनाने सन २०१७ मध्ये ११० कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता. या निधीतून हद्दवाढ़ क्षेत्र वगळता शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांचे सुमारे ४४५ किमीचे जाळे बदलणे तसेच आठ जलकुंभ उभारण्याचा समावेश होता. संबंधित कंत्राटदाराने आठपैकी सात जलकुंभांचे काम पूर्ण केले असून आठवा जलकुंभ अद्यापही उभारला नाही. यादरम्यान, मनपाने ‘अमृत अभियान’च्या टप्पा-२ अंतर्गत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी नागपूर येथील पुराणिक ब्रदर्स एजन्सीची नियुक्ती केली. २०१७ मध्ये मनपाने शहराची सन २०५५ पर्यंतची संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून वान धरणातून २४ दलघमी जलसाठ्याचे आरक्षण निश्चित केले होते. तेल्हारा येथील शेतकऱ्यांचा विराेध पाहता तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारच्या कालावधीत पाणी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती कायम असताना मनपाच्या निर्देशानुसार पुराणिक ब्रदर्स एजन्सीने वान धरणातील २४ दलघमी पाणी आरक्षण गृहीत धरून तब्बल ७३६ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार केला हाेता. या अहवालाला राज्याच्या तांत्रिक समितीने मंजुरी दिली हाेती. परंतु या धरणातील प्रस्तावित पाणी आरक्षणाला तत्कालीन शासनाने स्थगिती दिली असतानाही ‘डीपीआर’ तयार करण्याच्या मनपाच्या भूमिकेवर सुकाणू समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित करीत पाण्याचा पर्यायी स्रोत शोधण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले हाेते.

मनपाने दिला ४८ दलघमीचा प्रस्तावसुकाणू समितीच्या निर्देशानंतर मनपा प्रशासनाने बुलढाणा जिल्ह्यातील नांदूरा तालुक्यात असलेल्या ‘जिगाव’ प्रकल्पातून ४८ दलघमी पाणी आरक्षणाचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे सादर केला हाेता. परंतु आरक्षणाच्या मुद्यावर पाटबंधारे बाेट ठेवत हा प्रस्ताव बाजूला सारला. अखेर या संदर्भात आ.रणधीर सावरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर शासनाने २४.१३ दलघमीच्या जलसाठ्याला मंजूरी दिली.

‘जिगाव’ प्रकल्पाचे काम अर्धवटबुलढाणा जिल्ह्यातील ‘जिगाव’ प्रकल्पाला १९९६ मध्ये शासनाकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. यानंतर २७ वर्ष उलटूनही प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी किती कालावधी लागेल याबाबत निश्चिती नाही. अशावेळी शासनाने आरक्षित केलेल्या पाण्याचा वापर महापालिका कधी करणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Waterपाणी