शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना ‘सिबिल’ ची मागणी करणाऱ्या बॅंकांवर गुन्हे दाखल करा!

By संतोष येलकर | Updated: May 13, 2023 20:13 IST

उपमुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश : जिल्हयातील खरीप हंगामपूर्व नियोजनाचा घेतला आढावा

अकोला: पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअरची मागणी करु नये, असे रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे स्पष्ट आदेश असतांनाही, पीक कर्जासाठी ‘सिबिल’ची मागणी करुन शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत असेल; तर अशा संबंधित बॅंकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जिल्हा प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठकीत दूरदृष्यप्रणालीव्दारे (ऑनलाइन) ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष संगिता अढाऊ, आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिष पिंपळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनिल फाटकर, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, विभागीय कृषि सहसंचालक डॉ. किसनराव मुळे, डॉ. कांतप्पा खोत, उपवनसंरक्षक के. अर्जूना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, जैविक शेती मिशनचे डॉ. आरीफ शाह, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्यासह विविध विभागप्रमुख व तालुकास्तरीय अधिकारी आदी उपस्थित होते.पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडे ‘सिबिल’ची मागणी करणाऱ्या बॅंकांवर गुन्हे दाखल करा,असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याचे सांगत, कुठल्याच पीक कर्जासाठी ‘सिबील’ मागता येत नाही. याबाबत रिजर्व बँकेचे स्पष्ट आदेश आहेत, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील खरीप हंगामपूर्व नियोजनाचा आढावा उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी घेतला. बैठकीच्या प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किरवे यांनी जिल्हयातील यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचे सादरीकरण केले.

जलयक्त शिवार; गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची कामे सुरु करा!

जलयुक्त शिवार २.० ची कामे प्राधान्याने हाती घ्या व प्राधान्याने पूर्ण करा. या योजनेतील नाले, जलाशयांत तयार झालेला गाळ काढण्याचीही कामे पूर्ण करा. जलयुक्त शिवार योजनेसाठी रिमोट सेंसिंगद्वारे आराखडा तयार करण्यात येत आहे. हे आराखडे तयार करतांना त्यात स्थानिक लोप्रतिनिधींनीचा सहभाग घेवून, जलयुक्त शिवार व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेची कामे सुरु करा, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगीतले.

टॅग्स :Farmerशेतकरी