शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सरकारी बगिच्याच्या विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी भाजप-सेनेमध्ये चढाओढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 10:32 IST

दोन्ही पक्षांनी प्रसिद्धीपत्रके काढून सरकारी बगिच्याच्या विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे दिसून आले.

अकोला: सरकारी बगिच्याचा विकास करण्यात येत आहे. या विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी भाजप-शिवसेनेमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सरकारी बगिच्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा कार्यक्रम झटपट आटोपून घेतला तर सरकारी बगिच्याचे सौंदर्यीकरण व विकास कामांसाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी एक कोटी रुपयांचा निधी दिल्याचा दावा शनिवारी भाजपने केला आहे.दोन्ही पक्षांनी प्रसिद्धीपत्रके काढून सरकारी बगिच्याच्या विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे दिसून आले. सध्या या दोन्ही पक्षांमध्ये लोकप्रतिनिधींचे निधी वाटप, विकासकामांबद्दल चांगलाच कलगीतुरा रंगत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सरकारी बगिचा डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मालकीचा आहे. या बगिच्याच्या सौंदर्यीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शनिवारी कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य व आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार नितीन देशमुख, आमदार विप्लव बाजोरिया यांच्या नेतृत्वात शिवसेनेने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा फलक झटपट लावण्यात आला. नामकरणाला कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा आमदार बाजोरिया यांनी केला, तसेच बगिच्याच्या विकासासाठी ५0 लाख रुपयांचा निधी देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नामकरणाच्या या मुद्यावर आता भाजप-शिवसेनेतील राजकारण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे सरकारी बगिच्याच्या सौंदर्यीकरणासाठी आमदार शर्मा यांनी आतापर्यंत एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून बगिच्याचा विकास करण्यात येत आहे; मात्र काही राजकारणी प्रसिद्धीसाठी उद्यान विकासाचे श्रेय स्वत: लाटून घेत आहेत, असा टोला आमदार गोवर्धन शर्मा यांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचा नामोल्लेख न करता लगावला आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेष निधी आणला. शहरातील रस्त्यांसोबत उद्यानासाठीदेखील निधी उपलब्ध करून दिल्याचा दावा भाजपने करीत, सरकारी बगिच्याच्या विस्तारीकरणासोबत सकाळी आपले आरोग्य नीट राहावे, यासाठी बगिच्यात फिरणाऱ्यांसाठी वॉकिंग ट्रॅक तयार केला. पथदिवे, वृक्षारोपण करून ओसाड पडलेल्या सरकारी बगिच्याचा विकास केल्याचा दावा भाजपने केला आहे. सरकारी बगिच्याच्या विकासकामांचे श्रेय लाटण्याच्या मुद्यावरून भाजप-सेनेमध्ये चांगलेच राजकारण पेटले आहे.

सरकारी बगिच्याचा विकास करण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी एक कोटी रुपयांचा निधी दिला. बगिच्याचा विकास कोणाच्या निधीतून होत आहे, हे जनतेला माहीत आहे; परंतु काही राजकारणी विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, हे चुकीचे आहे. बगिच्याला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास आमचा विरोध नाही; परंतु कायदेशीर पद्धतीने नाव द्यावे. -गोवर्धन शर्मा, आमदार.परिसरातील युवकांनी सरकारी बगिच्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेकडे केली होती. त्यानुसार आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेमध्ये हा प्रस्ताव मांडला. त्याला मंजुरी मिळाली. कृषी विद्यापीठाच्या परवानगीनेच बगिच्याला नाव देण्यात आले. -नितीन देशमुख, आमदार तथा जिल्हा प्रमुख शिवसेना. 

टॅग्स :AkolaअकोलाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा