शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

सरकारी बगिच्याच्या विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी भाजप-सेनेमध्ये चढाओढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 10:32 IST

दोन्ही पक्षांनी प्रसिद्धीपत्रके काढून सरकारी बगिच्याच्या विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे दिसून आले.

अकोला: सरकारी बगिच्याचा विकास करण्यात येत आहे. या विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी भाजप-शिवसेनेमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सरकारी बगिच्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा कार्यक्रम झटपट आटोपून घेतला तर सरकारी बगिच्याचे सौंदर्यीकरण व विकास कामांसाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी एक कोटी रुपयांचा निधी दिल्याचा दावा शनिवारी भाजपने केला आहे.दोन्ही पक्षांनी प्रसिद्धीपत्रके काढून सरकारी बगिच्याच्या विकास कामांचे श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे दिसून आले. सध्या या दोन्ही पक्षांमध्ये लोकप्रतिनिधींचे निधी वाटप, विकासकामांबद्दल चांगलाच कलगीतुरा रंगत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सरकारी बगिचा डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मालकीचा आहे. या बगिच्याच्या सौंदर्यीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शनिवारी कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य व आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार नितीन देशमुख, आमदार विप्लव बाजोरिया यांच्या नेतृत्वात शिवसेनेने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा फलक झटपट लावण्यात आला. नामकरणाला कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा आमदार बाजोरिया यांनी केला, तसेच बगिच्याच्या विकासासाठी ५0 लाख रुपयांचा निधी देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नामकरणाच्या या मुद्यावर आता भाजप-शिवसेनेतील राजकारण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे सरकारी बगिच्याच्या सौंदर्यीकरणासाठी आमदार शर्मा यांनी आतापर्यंत एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून बगिच्याचा विकास करण्यात येत आहे; मात्र काही राजकारणी प्रसिद्धीसाठी उद्यान विकासाचे श्रेय स्वत: लाटून घेत आहेत, असा टोला आमदार गोवर्धन शर्मा यांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचा नामोल्लेख न करता लगावला आहे. आमदार गोवर्धन शर्मा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेष निधी आणला. शहरातील रस्त्यांसोबत उद्यानासाठीदेखील निधी उपलब्ध करून दिल्याचा दावा भाजपने करीत, सरकारी बगिच्याच्या विस्तारीकरणासोबत सकाळी आपले आरोग्य नीट राहावे, यासाठी बगिच्यात फिरणाऱ्यांसाठी वॉकिंग ट्रॅक तयार केला. पथदिवे, वृक्षारोपण करून ओसाड पडलेल्या सरकारी बगिच्याचा विकास केल्याचा दावा भाजपने केला आहे. सरकारी बगिच्याच्या विकासकामांचे श्रेय लाटण्याच्या मुद्यावरून भाजप-सेनेमध्ये चांगलेच राजकारण पेटले आहे.

सरकारी बगिच्याचा विकास करण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी एक कोटी रुपयांचा निधी दिला. बगिच्याचा विकास कोणाच्या निधीतून होत आहे, हे जनतेला माहीत आहे; परंतु काही राजकारणी विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, हे चुकीचे आहे. बगिच्याला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास आमचा विरोध नाही; परंतु कायदेशीर पद्धतीने नाव द्यावे. -गोवर्धन शर्मा, आमदार.परिसरातील युवकांनी सरकारी बगिच्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेकडे केली होती. त्यानुसार आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेमध्ये हा प्रस्ताव मांडला. त्याला मंजुरी मिळाली. कृषी विद्यापीठाच्या परवानगीनेच बगिच्याला नाव देण्यात आले. -नितीन देशमुख, आमदार तथा जिल्हा प्रमुख शिवसेना. 

टॅग्स :AkolaअकोलाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा