शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अकोल्यात जमाव बंदीचा पहिल्या दिवशीच फज्जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 18:29 IST

Prohibation Order in Akola सार्वजिनक ठिकणी नागरिकांची गर्दी कायम असून, ‘फिजीकल डिस्टन्सिंग’ आणि मास्कचा वापर होत नसल्याचे वास्तव समोर आले.

ठळक मुद्देपाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.पहिल्याच दिवशी मंगळवारी अकोला शहरात कानाडोळा करण्यात आला.

अकोला: जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता कहर लक्षात घेता, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून जमाव बंदी लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला; मात्र पहिल्याच दिवशी (मंगळवारी) जमाव बंदी अंमलबजाणीचा अकोला शहरात फज्जा उडाला. शहरात सार्वजिनक ठिकणी होणारी नागरिकांची गर्दी कायम असून, ‘फिजीकल डिस्टन्सिंग’ आणि मास्कचा वापर होत नसल्याचे वास्तव समोर आले.

फेब्रुवारी महिन्यात गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ झाली. त्यानुषंगाने जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अकोला शहरासह जिल्ह्यात २८ फेब्रुवारीपर्यंत जमाव बंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १५ फेब्रुवारी रोजी दिला. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतू जमाव बंदी आदेशाच्या अंमलबजावणीकडे पहिल्याच दिवशी (मंगळवारी) अकोला शहरात कानाडोळा करण्यात आला. शहरातील जनता भाजी बाजार, मध्यवर्ती बसस्थानक, टाॅवर रोड, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आदी भागात रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकणी नागरिकांची गर्दी कायम असून, फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन आणि मास्कचा वापर नागरिकांकडून होत नसल्याचे वास्तव आढळून आले. तसेच जमाव बंदी आदेशाची अंमलबजावणी आणि करोना संसर्ग संसर्ग नियंत्रीत करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कारवाइ करण्याच्या कामाकडेही संबंधित यंत्रणांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याने, जमाव बंदीचा पहिल्या दिवशीच फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक