शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

शेतकऱ्यांना खते, बियाणे घरपोच देणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 10:11 IST

कृषी विभाग बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके, शेतकºयांच्या घरपोच देणार आहे.

- राजरत्न सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खरीप हंगाम तोंडावर आला असून, पुढच्या महिन्यात रोहिणी नक्षत्राला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची घालमेल सुरू आहे. टाळेबंदी वाढल्यास काय करावे, असा विचार त्यांच्या मनात सुरू आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास कृषी विभाग बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके, शेतकºयांच्या घरपोच देणार आहे. त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे.देशात लावलेल्या टाळेबंदीला ३५ दिवस पूर्ण होत आहेत; परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने टाळेबंदी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच अनुषंगाने शेतकºयांना बी-बियाणे, खते थेट घरी पोहोचता येतील का, यावर कृषी विभागाचे मंथन सुरू आहे. राज्यात १ कोटी ३२ लाख हेक्टरवर विविध पिकांची पेरणी केली जाते. यामध्ये सोयाबीन आणि कापूस ही दोन पिके सर्वात जास्त घेतली जातात. या दोन पिकांचे राज्यात जवळपास ८० लाख हेक्टर क्षेत्र आहे विदर्भात कापसाचे क्षेत्र १८ लाख हेक्टर आहे तर तेवढेच क्षेत्र सोयाबीनचे आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने यावर्षी ४ लाख २५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची तजवीज केली आहे. तथापि, यातील किती बियाणे उगवणशक्ती परिणामकारक ठरतात, यावर सर्व अवलंबून आहे. यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने नांदेड -४४ आणि पीकेव्ही हायब्रीड २ या बियाण्याची जवळपास ८० हजार पाकिटे तयार ठेवली आहेत. ही बियाणे शेतकरी बचत गटामार्फत शेतकºयापर्यंत पोहोचविता येईल का, याचे नियोजन सुरू आहे. असे असले तरी खासगी कंपन्यांचे बियाणे शेतकºयांपर्यंत कसे पोहोचता येईल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.या दृष्टीनेही विचार होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रत्येक गावातील रासायनिक खतांची मागणी नोंदवून त्या गावात खताचा ट्रक पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शेतकºयांना आगोदर पैसे भरून मागणी नोंदवावी लागणार आहे. बियाणे घरपोच पोहोचविण्यासाठीचे नियोजन सुरू आहे; परंतु शेतकºयांना वेगवेगळ्या कंपन्यांचे बियाणे हवे असते. त्यांची ही मागणी बघून बचत गटामार्फत घरपोच बियाणे पोहोचविण्यावर विचार सुरू आहे.

 बियाणे खरेदी करताना गर्दी होऊ नये, फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जावे, यासाठी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कृषी अधिकाºयांची बैठक घेतली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाजीपाला, फळे बचत गटामार्फत पोहोचविण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर बियाणे, कीटकनाशके, शेतकºÞयांना घरपोच करण्यात येणार आहेत.

टाळेबंदी वाढल्यास रासायनिक खते शेतकºयांना घरपोच पोहोचविण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी शेतकºयांना अगोदर पैसे भरून मागणी नोंदवावी लागेल. बियाणे शेतकरी बचत गटामार्फत पोहोचविण्यासाठीचे नियोजन सुरू आहे.- सुभाष नागरे, संचालक, बियाणे,खते, पुणे.सुरक्षित अंतर! 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी