शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

शेतकऱ्यांना खते, बियाणे घरपोच देणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 10:11 IST

कृषी विभाग बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके, शेतकºयांच्या घरपोच देणार आहे.

- राजरत्न सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खरीप हंगाम तोंडावर आला असून, पुढच्या महिन्यात रोहिणी नक्षत्राला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची घालमेल सुरू आहे. टाळेबंदी वाढल्यास काय करावे, असा विचार त्यांच्या मनात सुरू आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास कृषी विभाग बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके, शेतकºयांच्या घरपोच देणार आहे. त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे.देशात लावलेल्या टाळेबंदीला ३५ दिवस पूर्ण होत आहेत; परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने टाळेबंदी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच अनुषंगाने शेतकºयांना बी-बियाणे, खते थेट घरी पोहोचता येतील का, यावर कृषी विभागाचे मंथन सुरू आहे. राज्यात १ कोटी ३२ लाख हेक्टरवर विविध पिकांची पेरणी केली जाते. यामध्ये सोयाबीन आणि कापूस ही दोन पिके सर्वात जास्त घेतली जातात. या दोन पिकांचे राज्यात जवळपास ८० लाख हेक्टर क्षेत्र आहे विदर्भात कापसाचे क्षेत्र १८ लाख हेक्टर आहे तर तेवढेच क्षेत्र सोयाबीनचे आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने यावर्षी ४ लाख २५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची तजवीज केली आहे. तथापि, यातील किती बियाणे उगवणशक्ती परिणामकारक ठरतात, यावर सर्व अवलंबून आहे. यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने नांदेड -४४ आणि पीकेव्ही हायब्रीड २ या बियाण्याची जवळपास ८० हजार पाकिटे तयार ठेवली आहेत. ही बियाणे शेतकरी बचत गटामार्फत शेतकºयापर्यंत पोहोचविता येईल का, याचे नियोजन सुरू आहे. असे असले तरी खासगी कंपन्यांचे बियाणे शेतकºयांपर्यंत कसे पोहोचता येईल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.या दृष्टीनेही विचार होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रत्येक गावातील रासायनिक खतांची मागणी नोंदवून त्या गावात खताचा ट्रक पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शेतकºयांना आगोदर पैसे भरून मागणी नोंदवावी लागणार आहे. बियाणे घरपोच पोहोचविण्यासाठीचे नियोजन सुरू आहे; परंतु शेतकºयांना वेगवेगळ्या कंपन्यांचे बियाणे हवे असते. त्यांची ही मागणी बघून बचत गटामार्फत घरपोच बियाणे पोहोचविण्यावर विचार सुरू आहे.

 बियाणे खरेदी करताना गर्दी होऊ नये, फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जावे, यासाठी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कृषी अधिकाºयांची बैठक घेतली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाजीपाला, फळे बचत गटामार्फत पोहोचविण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर बियाणे, कीटकनाशके, शेतकºÞयांना घरपोच करण्यात येणार आहेत.

टाळेबंदी वाढल्यास रासायनिक खते शेतकºयांना घरपोच पोहोचविण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी शेतकºयांना अगोदर पैसे भरून मागणी नोंदवावी लागेल. बियाणे शेतकरी बचत गटामार्फत पोहोचविण्यासाठीचे नियोजन सुरू आहे.- सुभाष नागरे, संचालक, बियाणे,खते, पुणे.सुरक्षित अंतर! 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी